शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:23 IST

चीनच्या या निर्णयानं पाकिस्तानच्या भारताशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नांना फटका बसला आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट झाल्याचं दिसून आले होते. त्यानंतर पाकिस्ताननेचीनकडे सतत एक मागणी लावून धरली होती. ज्यात चीनकडून हायपरसोनिक मिसाइल आणि त्याला बनवण्याचं तंत्रज्ञान देण्याची मागणी केली होती. परंतु आता चीनने स्पष्ट शब्दात पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे. या मिसाईल आता निर्यात करण्यासाठी उपलब्ध नाहीत, याचा कुठलाही व्हर्जन अद्याप बनवला नाही जे दुसऱ्या देशांना देता येऊ शकते असं चीनने सांगितले आहे.

पाकिस्तानला का हवी मिसाईल?

भारत ज्यारितीने वेगाने आधुनिक तंत्रज्ञान आणि मिसाईल टेक्निक वाढवत आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानला चीनकडून मदत हवी होती. भारताने याआधीच HSTDV सारख्या मिसाईलची चाचणी केली आहे. ही प्रचंड वेगवान आणि आधुनिक मिसाईल आहे. त्यामुळे पाकिस्तान चीनच्या मागे हायपरसोनिक मिसाईल देण्याची मागणी करत होता परंतु चीनने त्यास नकार दिला आहे. चीनच्या नकारामागे २ प्रमुख कारणे सांगितली जातात. त्यात पहिले म्हणजे पाकिस्तानकडे उपलब्ध असणाऱ्या चिनी शस्त्रांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमकुवत होत आहे. दुसरे कारण म्हणजे पाकिस्तानला जर हे तंत्रज्ञान दिले तर ते पाश्चात्य देशांनाही देण्याची भीती चीनला आहे. पाकिस्तानला याआधीच चीनकडून लढाऊ विमाने आणि मिसाईल सिस्टम मिळाले आहे परंतु हायपरसोनिक मिसाइलसारखं संवेदनशील तंत्रज्ञान पाकला देणे चीनला विश्वासाचे वाटत नाही. 

हायपरसोनिक मिसाईल देशाबाहेर पाठवायची नाही

डिफेन्स वेबसाईटनुसार, चीन त्यांची इतर शस्त्रे जसं J10CE लढाऊ विमाने आणि HQ9 एअर डिफेन्स सिस्टमचे खास एक्सपोर्ट व्हर्जन बनवते परंतु हायपरसोनिक मिसाईल इतकी आधुनिक आणि संवेदनशील आहे जी त्याला बाहेर देशात पाठवायची नाही. जगातील संतुलन बिघडू शकणारी अतिशय आधुनिक आणि शक्तिशाली शस्त्रे इतर देशांना देऊ नयेत, असे चीनचे धोरण आहे. मात्र पाकिस्तानला चीनच्या मदतीने या मिसाईल खरेदी करायच्या आहेत आणि स्वत: बनवायच्या आहेत. परंतु चीनने नकार दिल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. 

चीनच्या या निर्णयानं पाकिस्तानच्या भारताशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नांना फटका बसला आहे. चीन हायपरसोनिक मिसाईल तंत्रज्ञान त्यांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा भाग मानते. विशेषत: अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांविरोधात हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे इतकी संवेदनशील माहिती पाकिस्तानसारख्या जवळच्या देशालाही त्यांना द्यायचे नाही जेणेकरून जागतिक स्तरावर दबाव आणि राजनैतिक तणाव वाढवता येईल. आणखी एक कारण म्हणजे, चीन सध्या या मिसाईलला अजून उत्तम आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर कुठल्याही अन्य देशाला ते ट्रान्सफर करण्यास तयार नाहीत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारत