शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिष शेलारांचा यु-टर्न, आधी म्हणाले राजकारण सोडणार, आता म्हणाले, "आधी उद्धव ठाकरेंनी राजकीय ..."
2
"PM मोदींना संघ पर्याय शोधतोय; जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न  केला तरी...", संजय राऊत यांचा मोठा दावा
3
अजित पवार गटाचे १०-१५ आमदार शरद पवारांच्या संपर्कात? दादांच्या बैठकीत खलबते
4
Fact Check : निवडणूक निकालानंतर चंद्राबाबू नायडू यांनी घेतली नाही राहुल गांधींची भेट; हे आहे 'सत्य'
5
झकास! Bigg Boss OTT 3 ची तारीख समोर; अनिल कपूर म्हणाला, 'या शोसाठी...'
6
वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; म्हणाल्या, “आभार मानायला आले”
7
खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेरमध्ये प्राणघातक हल्ला
8
EPFO New Rule: ईपीएफओनं पैसे काढण्याचे नियम बनवले सोपे, आता क्लेमसाठी 'याची' गरज भासणार नाही
9
'नितीश कुमार यांच्यात नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल', भाजपची घोषणा
10
'कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचे पक्षविरोधी काम'; ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधवांचे पटोलेंना पत्र
11
BREAKING: मुंबईत पवई येथे पोलिसांवर जमावाकडून दगडफेक, तणावाचं वातावरण; अनेक जखमी
12
मायावतींमुळे उत्तर प्रदेशात टळली भाजपावरील मोठी नामुष्की, अन्यथा मिळाल्या असत्या केवळ इतक्या जागा
13
मोदी सरकारमध्ये 'किंगमेकर', आंध्रमध्ये 'किंग'! चंद्राबाबू १२ जूनला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
14
USA vs PAK : "पाकिस्तानविरूद्ध फक्त ३०-४० मिनिटं...", अमेरिकन कर्णधाराचा शेजाऱ्यांना इशारा
15
मारुतीचा प्रतिस्पर्ध्यांना आश्चर्याचा धक्का! ऑटोमॅटिक कारच्या किंमती घटविल्या; ग्राहकांची चांदी, पण कारण काय...
16
उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर सीएम योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावलं; घडामोडींना वेग
17
राजकारण्यांना काय सल्ला देशील? राहुल गांधींच्या प्रश्नावर किंग खानने दिलं 'हे' उत्तर
18
लोकसभेतील पराभवानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर? जाणून घ्या, व्हायरल व्हिडिओचे सत्य
19
आपल्याच लोकांकडून झाला दगाफटका? भाजपनं प्रत्येक जिल्ह्यातून मागवला अहवाल, आता थेट अ‍ॅक्शन!
20
फडणवीस तातडीने दिल्लीला निघाले; सत्तेबाहेर राहण्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या भूमिकेवर ठाम, मनात काय... 

भारताचं मोठं यश! कतार न्यायालयाने अर्ज स्वीकारला; 'त्या' आठ भारतीयांना मिळणार दिलासा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 10:22 AM

कतारने भारताच्या ८ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे

Qatar India: कतारच्या न्यायालयाने भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांचे अपील मान्य केले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर 2023 रोजी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. आता या प्रकरणात एक मोठे अपडेट आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाच्या माजी जवानाचे अपील स्वीकारले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. हे अपील भारत सरकारने दाखल केले होते.

कतारमधील न्यायालयाने गुरुवारी (२३ नोव्हेंबर) अपीलाची कागदपत्रे स्वीकारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालय अपीलाचा अभ्यास करत असून पुढील सुनावणी लवकरच अपेक्षित आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्यांच्या शेवटच्या साप्ताहिक ब्रीफिंगमध्ये सांगितले की भारताने या निर्णयाविरुद्ध आधीच अपील दाखल केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गेल्या वर्षी २५ ऑक्टोबर रोजी मीटू भार्गव नावाच्या महिलेने ट्विट केले होते की, भारतीय नौदलाचे आठ माजी अधिकारी कतारची राजधानी दोहा येथे ५७ दिवसांपासून बेकायदेशीर नजरकैदेत आहेत. मीतू भार्गव ही कमांडर पूर्णेंदू तिवारी यांची बहीण आहे. या अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. कतारच्या न्यूज वेबसाईट अल-जजीराच्या रिपोर्टनुसार, या अधिकाऱ्यांवर कतारच्या पाणबुडी प्रकल्पाशी संबंधित माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप आहे.

कतार सरकारने या माजी अधिकार्‍यांवर लावलेल्या आरोपांबाबत भारत सरकारकडून कोणतीही विशिष्ट माहिती सार्वजनिक केलेली नाही. नौदलातून निवृत्त झालेले हे सर्व अधिकारी दोहा येथील अल-दहरा कंपनीत काम करत होते. ही कंपनी तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा पुरवत असे. तसेच कतारच्या नौदलाला प्रशिक्षण आणि उपकरणे पुरवली. ही कंपनी ओमानच्या हवाई दलातील निवृत्त स्क्वाड्रन लीडर खामिस अल आझमी चालवत होते. गेल्या वर्षी या भारतीयांसोबत त्यालाही अटक करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये त्यांची सुटका झाली.

हे भारतीय कोण आहेत?

मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत- कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि राजेश.  या सर्व माजी अधिकाऱ्यांनी २० वर्षे भारतीय नौदलात सेवा बजावली होती. नौदलात असताना त्यांचा कार्यकाळ निर्दोष राहिला असून त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

टॅग्स :QatarकतारIndiaभारतindian navyभारतीय नौदल