शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ब्रिक्समध्ये पंतप्रधान मोदींच्या हाती मोठं यश, चीनच्या धरतीवरुन पाच देशांचा पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 16:19 IST

ब्रिक्स घोषणापत्रात सांगण्यात आलं आहे की, 'जगात कुठेही, कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला मंजूर नाही. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही'.

बीजिंग, दि. 4 - ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठं यश मिळालं आहे. ब्रिक्सच्या घोषणापत्रात सर्व प्रकारच्या दहशतवाद्याचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी थेट पाकिस्तानचं नाव घेण्यात आलेलं नाही, मात्र पाकिस्तानच्या जमिनीवर उभ्या असलेल्या दहशतवादी संघटनांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.  भारतासाठी हे एक मोठं यश आहे. कारण घोषणापत्रात जे काही लिहिण्यात येतं त्यावर बिक्स देशांची सहमती असते. भारताने याआधी अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणा-या समर्थनाचा निषेध केला आहे. ब्रिक्स देशांच्या पाठिंब्यामुळे भारताचा दावा मजबूत झाला आहे. 

या घोषणापत्रात सांगण्यात आलं आहे की, 'जगात कुठेही, कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला मंजूर नाही. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही'. यावेळी लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि तालिबानी यांचा स्पष्ट उल्लेख करत निषेध करण्यात आला आहे. यामध्ये अल-कायदा, हक्कानी आणि इसिसचाही उल्लेख होता. 

'दहशतवादाला समर्थन देणा-यांना उत्तर देण्यासाठी भाग पाडणं गरजेचं आहे. दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्वतरावर मदत गरजेची आहे. तसंत दहशतवादी संघटनांना होणारी आर्थिक मदतही थांबवली पाहिजे', असंही घोषणापत्रात सांगण्यात आलं आहे.

 

ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शांतता आणि विकासासाठी सहकार्याचं आवाहन केलं आहे. 'शांती आणि विकासासाठी ब्रिक्स देशांनी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. मोदींनी यावेळी बोलताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनकडून त्यांना मिळणारा आश्रय यासंबंधी थेट उल्लेख केला नसला, तरी त्यांच्या या वक्तव्याने अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचं तज्ञ सांगत आहेत. 

दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी, 'आम्हा पाच देशांमध्ये मतभेद असले तरी आमचा विकास त्याच गतीने आणि त्याच कारणांमुळे होत आहे.आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकजुटीने आवाज उठवत, समस्यांवरही एकत्रितपणे मार्ग काढला पाहिजे', असं आवाहन केलं. 

मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - - विकासासाठी ब्रिक्स देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि इनोव्हेशनची आवश्यकता आहे. शांती आणि विकासासाठी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं.- आम्ही गरिबी हटवण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहोत. ज्यामुळे आरोग्य, स्वच्छता, तांत्रिक कौशल्य, अन्न सुरक्षा, लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकेल.- ब्रिक्सच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या एनडीबीने देशांच्या दिर्घकालीन विकासासाठी कर्ज देण्यास सुरुवात केली पाहिजे.-  आम्ही काळ्या पैशाविरोधात लढा पुकारला आहे. स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. भारत गरिबीशी लढा देत आहे. पुढील दशक अत्यंत महत्वाचं असणार आहे. ब्रिक्स देशांवर बदलाची जबाबदारी आहे. - भारत एक तरुण देश आहे, आणि हीच आमची ताकद आहे. भारतातील 80 कोटी तरुण आमची ताकद आहेत. स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने पुढील दशक अत्यंत महत्वाचं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान