शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 10:54 IST

पहलगाम हल्ल्यासंदर्भात काय म्हणाला पाकिस्तान? जाणून घ्या...

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येते झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मिर दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल 'चिनाब ब्रिज'चे उद्घाटन केले आणि तो देशाला समर्पित केला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर थेट हल्ला चढवत, 'त्यांनी पहलगाममध्ये मानवता आणि काश्मिरीयत (काश्मीरची सांस्कृतिक ओळख) यावर अत्यंत निंदनीय हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांच्या या विधानानंतर पाकिस्तानचा अक्षरशः तिळपापड उडाला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "पाकिस्तान हा गरिबांची भाकरी आणि रोजगाराचाही शत्रू बनला आहे. तसेच, जो कुणी काश्मीरचा विकास रोखण्याचा प्रयत्न करेल, त्याला सर्वप्रथम नरेंद्र मोदीचा सामना करावा लागेल," असेही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या विधानावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत, "भारताच्या पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरसंदर्भात जी खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने केली आहेत, ती पाकिस्तान पूर्णपणे फेटाळतो," असे म्हटले आहे.

पहलगाम हल्ल्यासंदर्भात काय म्हणाला पाकिस्तान? -पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, "अशी विधाने म्हणजे जगाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून भरकटवण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः अशा भागात, जेथे लोकांसोबत योग्य  व्यवहार केला जात नाही. तसेच, भारतीय पंतप्रधानांनी पुन्हा एकदा कुठल्याही पुराव्यांशिवाय, पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोषी ठहरवले, यांचेही आम्हाला दुःख आहे."

पाकिस्तानने पुन्हा उपस्थित केला जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा -पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. "जम्मू आणि काश्मीर हा आंतरराष्ट्रीय वादग्रस्त भाग आहे. याचा अंतिम निकाल संयुक्त राष्ट्रांचा निर्णय आणि काश्मिरातील जनतेच्या इच्छेने लागेल. कोणताही दावा किंवा विधान हे सत्य बदलू शकत नाही. जेव्हा जम्मू काश्मिरात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले जात आहे, लोकांचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे, विनाकारण अटक केली जात आहे, जे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे. असे असताना भारतव्याप्त काश्मीरमध्ये (IOJK) होत असलेली विकासाची चर्चा खोटी वाटते." याशिवाय, "काश्मिरी लोकांचे हक्क आणि प्रतिष्ठेच्या लढाईत आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत उभे राहू," असेही पाकिस्तानने म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद