शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 10:54 IST

पहलगाम हल्ल्यासंदर्भात काय म्हणाला पाकिस्तान? जाणून घ्या...

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येते झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मिर दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल 'चिनाब ब्रिज'चे उद्घाटन केले आणि तो देशाला समर्पित केला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर थेट हल्ला चढवत, 'त्यांनी पहलगाममध्ये मानवता आणि काश्मिरीयत (काश्मीरची सांस्कृतिक ओळख) यावर अत्यंत निंदनीय हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांच्या या विधानानंतर पाकिस्तानचा अक्षरशः तिळपापड उडाला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "पाकिस्तान हा गरिबांची भाकरी आणि रोजगाराचाही शत्रू बनला आहे. तसेच, जो कुणी काश्मीरचा विकास रोखण्याचा प्रयत्न करेल, त्याला सर्वप्रथम नरेंद्र मोदीचा सामना करावा लागेल," असेही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या विधानावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत, "भारताच्या पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरसंदर्भात जी खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने केली आहेत, ती पाकिस्तान पूर्णपणे फेटाळतो," असे म्हटले आहे.

पहलगाम हल्ल्यासंदर्भात काय म्हणाला पाकिस्तान? -पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, "अशी विधाने म्हणजे जगाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून भरकटवण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः अशा भागात, जेथे लोकांसोबत योग्य  व्यवहार केला जात नाही. तसेच, भारतीय पंतप्रधानांनी पुन्हा एकदा कुठल्याही पुराव्यांशिवाय, पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोषी ठहरवले, यांचेही आम्हाला दुःख आहे."

पाकिस्तानने पुन्हा उपस्थित केला जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा -पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. "जम्मू आणि काश्मीर हा आंतरराष्ट्रीय वादग्रस्त भाग आहे. याचा अंतिम निकाल संयुक्त राष्ट्रांचा निर्णय आणि काश्मिरातील जनतेच्या इच्छेने लागेल. कोणताही दावा किंवा विधान हे सत्य बदलू शकत नाही. जेव्हा जम्मू काश्मिरात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले जात आहे, लोकांचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे, विनाकारण अटक केली जात आहे, जे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे. असे असताना भारतव्याप्त काश्मीरमध्ये (IOJK) होत असलेली विकासाची चर्चा खोटी वाटते." याशिवाय, "काश्मिरी लोकांचे हक्क आणि प्रतिष्ठेच्या लढाईत आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत उभे राहू," असेही पाकिस्तानने म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद