शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी मिझोरम- म्यानमार सीमेवर कडक पहारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 16:52 IST

म्यानमारमध्ये सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्राला कंटाळून भारतात येण्याच्या तयारीत असणा-या रोहिंग्यांना रोखण्यासाठी भारताने कडक पावले उचलली आहेत.

एेजाॅल, दि.१०-  म्यानमारमध्ये सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्राला कंटाळून भारतात येण्याच्या तयारीत असणा-या रोहिंग्यांना रोखण्यासाठी भारताने कडक पावले उचलली आहेत. एेजाॅल, सर्चिप आणि लुंगेई येथे आसाम रायफल्सच्या तीन तुकड्या तैनात केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली. एकाही रोहिंग्याला भारतात घुसता येऊ नये यासाठी मिझोरम आणि म्यानमार सीमेवर पहारा देण्यात येत आहे. आसाम रायफल्सच्या इतर पाच तुकड्या ही घुसखोरी रोखण्यासाठी आसाम, मणिपूर आणि नागालॅडमध्ये तैनात केल्याची माहिती या पोलिसाने दिली आहे.

म्यानमारमधील रोहिंग्याबहुल प्रांत मिझोरमपासून दूर असल्यामुळे ते मिझोरममध्ये प्रवेश करतील याबाबत शंकाच आहे, तसेच त्यांची संस्कृती, राहणी व इतर बाबीही मिझो लोकांपेक्षा पूर्ण वेगळ्या आहेत, असेही या अधिका-याने सांगितले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून राखिन प्रांतातून रोहिंग्या बांगलादेशच्या दिशेने पलायन करत आहेत. पाच लाख रोहिंग्या याआधीच बांगलादेशात प्रवेश करुन कॅम्पांमध्ये राहात आहेत. बांगलादेशने या लोकांना यूएनच्या मदतीने औषधे, स्वच्छतेच्या सोयी व अन्न पुरवले आहे. अजूनही रोहिंग्यांनी नेफ नदी ओलांडून बांगलादेशात जाणे सुरुच ठेवले आहे. कालच नेफ नदीत रोहिंग्यांची बोट उलटून १२ लोकांचे प्राण गेले होते. अशा प्रकारचे अपघात येथे वारंवार होत आहेत.

म्यानमारने मात्र रोहिंग्यांना परत सुरक्षित माघारी येण्यासाठी कोणतेही ठोस आश्वासन किंवा दिलासा दिलेला नाही. रोहिंग्या परत येऊ नयेत म्हणून त्यांच्य वाटेत सीमेवर भूसुरंगही म्यानमारने पेरले. याचा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत निषेध केला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भारतात जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असून रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारला पाठवण्याची मोहीम उघडण्यात येणार असल्याची माहिती संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हैदराबादच्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा पण परत पाठवू नका अशी भूमिका घेतली आहे.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्या