शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी मिझोरम- म्यानमार सीमेवर कडक पहारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 16:52 IST

म्यानमारमध्ये सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्राला कंटाळून भारतात येण्याच्या तयारीत असणा-या रोहिंग्यांना रोखण्यासाठी भारताने कडक पावले उचलली आहेत.

एेजाॅल, दि.१०-  म्यानमारमध्ये सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्राला कंटाळून भारतात येण्याच्या तयारीत असणा-या रोहिंग्यांना रोखण्यासाठी भारताने कडक पावले उचलली आहेत. एेजाॅल, सर्चिप आणि लुंगेई येथे आसाम रायफल्सच्या तीन तुकड्या तैनात केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली. एकाही रोहिंग्याला भारतात घुसता येऊ नये यासाठी मिझोरम आणि म्यानमार सीमेवर पहारा देण्यात येत आहे. आसाम रायफल्सच्या इतर पाच तुकड्या ही घुसखोरी रोखण्यासाठी आसाम, मणिपूर आणि नागालॅडमध्ये तैनात केल्याची माहिती या पोलिसाने दिली आहे.

म्यानमारमधील रोहिंग्याबहुल प्रांत मिझोरमपासून दूर असल्यामुळे ते मिझोरममध्ये प्रवेश करतील याबाबत शंकाच आहे, तसेच त्यांची संस्कृती, राहणी व इतर बाबीही मिझो लोकांपेक्षा पूर्ण वेगळ्या आहेत, असेही या अधिका-याने सांगितले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून राखिन प्रांतातून रोहिंग्या बांगलादेशच्या दिशेने पलायन करत आहेत. पाच लाख रोहिंग्या याआधीच बांगलादेशात प्रवेश करुन कॅम्पांमध्ये राहात आहेत. बांगलादेशने या लोकांना यूएनच्या मदतीने औषधे, स्वच्छतेच्या सोयी व अन्न पुरवले आहे. अजूनही रोहिंग्यांनी नेफ नदी ओलांडून बांगलादेशात जाणे सुरुच ठेवले आहे. कालच नेफ नदीत रोहिंग्यांची बोट उलटून १२ लोकांचे प्राण गेले होते. अशा प्रकारचे अपघात येथे वारंवार होत आहेत.

म्यानमारने मात्र रोहिंग्यांना परत सुरक्षित माघारी येण्यासाठी कोणतेही ठोस आश्वासन किंवा दिलासा दिलेला नाही. रोहिंग्या परत येऊ नयेत म्हणून त्यांच्य वाटेत सीमेवर भूसुरंगही म्यानमारने पेरले. याचा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत निषेध केला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भारतात जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असून रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारला पाठवण्याची मोहीम उघडण्यात येणार असल्याची माहिती संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हैदराबादच्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा पण परत पाठवू नका अशी भूमिका घेतली आहे.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्या