शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी मिझोरम- म्यानमार सीमेवर कडक पहारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 16:52 IST

म्यानमारमध्ये सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्राला कंटाळून भारतात येण्याच्या तयारीत असणा-या रोहिंग्यांना रोखण्यासाठी भारताने कडक पावले उचलली आहेत.

एेजाॅल, दि.१०-  म्यानमारमध्ये सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्राला कंटाळून भारतात येण्याच्या तयारीत असणा-या रोहिंग्यांना रोखण्यासाठी भारताने कडक पावले उचलली आहेत. एेजाॅल, सर्चिप आणि लुंगेई येथे आसाम रायफल्सच्या तीन तुकड्या तैनात केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली. एकाही रोहिंग्याला भारतात घुसता येऊ नये यासाठी मिझोरम आणि म्यानमार सीमेवर पहारा देण्यात येत आहे. आसाम रायफल्सच्या इतर पाच तुकड्या ही घुसखोरी रोखण्यासाठी आसाम, मणिपूर आणि नागालॅडमध्ये तैनात केल्याची माहिती या पोलिसाने दिली आहे.

म्यानमारमधील रोहिंग्याबहुल प्रांत मिझोरमपासून दूर असल्यामुळे ते मिझोरममध्ये प्रवेश करतील याबाबत शंकाच आहे, तसेच त्यांची संस्कृती, राहणी व इतर बाबीही मिझो लोकांपेक्षा पूर्ण वेगळ्या आहेत, असेही या अधिका-याने सांगितले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून राखिन प्रांतातून रोहिंग्या बांगलादेशच्या दिशेने पलायन करत आहेत. पाच लाख रोहिंग्या याआधीच बांगलादेशात प्रवेश करुन कॅम्पांमध्ये राहात आहेत. बांगलादेशने या लोकांना यूएनच्या मदतीने औषधे, स्वच्छतेच्या सोयी व अन्न पुरवले आहे. अजूनही रोहिंग्यांनी नेफ नदी ओलांडून बांगलादेशात जाणे सुरुच ठेवले आहे. कालच नेफ नदीत रोहिंग्यांची बोट उलटून १२ लोकांचे प्राण गेले होते. अशा प्रकारचे अपघात येथे वारंवार होत आहेत.

म्यानमारने मात्र रोहिंग्यांना परत सुरक्षित माघारी येण्यासाठी कोणतेही ठोस आश्वासन किंवा दिलासा दिलेला नाही. रोहिंग्या परत येऊ नयेत म्हणून त्यांच्य वाटेत सीमेवर भूसुरंगही म्यानमारने पेरले. याचा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत निषेध केला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भारतात जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असून रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारला पाठवण्याची मोहीम उघडण्यात येणार असल्याची माहिती संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हैदराबादच्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा पण परत पाठवू नका अशी भूमिका घेतली आहे.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्या