शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 01:55 IST

महत्वाचे म्हणजे, भारत आणि अमेरिका यांच्यात परराष्ट्र नीतीवर महत्वाची चर्चा होत असतानाच, जयशंकर यांनी हे विधान केले आहे...

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारताने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे हल्ले झाले, तर भारत गप्प बसणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. ते सध्या चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून बुधवारी (२ जुलै २०२५) क्वाड परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जागतिक व्यासपीठावरून पाकिस्तानला फटकारले.

महत्वाचे म्हणजे, भारत आणि अमेरिका यांच्यात परराष्ट्र नीतीवर महत्वाची चर्चा होत असतानाच, जयशंकर यांनी हे विधान केले आहे. 

जगाने भारताची एकी बघितली -वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत क्वाड (QUAD) बैठकीनंतर, पत्रकारांसोबत बोलताना जयशंकर म्हणाले, यावेळी सर्व पक्षांच्या खासदारांनी भारताच्या जागतिक सहभागात एकजुटीने भाग घेतला.

...तेव्हा जगाला मजबूत राष्ट्रीय एकतेचा संदेश जातो -याला भारताची राजकीय विविधता, असे संबोधत जयशंकर म्हणाले, जेव्हा वेगवेगळ्या विचारसरणीचे नेते परदेशात एका स्वरात भारताची बाजू मांडतात, तेव्हा जगाला मजबूत राष्ट्रीय एकतेचा संदेश जातो. शशी थरूर, सुप्रिया सुळे, कनिमोई, रविशंकर प्रसाद, जय पांडा, संजय झा, सलमान खुर्शीद, अनिल शर्मा आणि गुलाम नबी आझाद यांसारख्या नेत्यांचा उल्लेख करत ते म्हणाले, हे सर्वजण एकत्रितपणे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत करतात.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानUSअमेरिकाTerrorismदहशतवाद