शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 01:55 IST

महत्वाचे म्हणजे, भारत आणि अमेरिका यांच्यात परराष्ट्र नीतीवर महत्वाची चर्चा होत असतानाच, जयशंकर यांनी हे विधान केले आहे...

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारताने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे हल्ले झाले, तर भारत गप्प बसणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. ते सध्या चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून बुधवारी (२ जुलै २०२५) क्वाड परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जागतिक व्यासपीठावरून पाकिस्तानला फटकारले.

महत्वाचे म्हणजे, भारत आणि अमेरिका यांच्यात परराष्ट्र नीतीवर महत्वाची चर्चा होत असतानाच, जयशंकर यांनी हे विधान केले आहे. 

जगाने भारताची एकी बघितली -वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत क्वाड (QUAD) बैठकीनंतर, पत्रकारांसोबत बोलताना जयशंकर म्हणाले, यावेळी सर्व पक्षांच्या खासदारांनी भारताच्या जागतिक सहभागात एकजुटीने भाग घेतला.

...तेव्हा जगाला मजबूत राष्ट्रीय एकतेचा संदेश जातो -याला भारताची राजकीय विविधता, असे संबोधत जयशंकर म्हणाले, जेव्हा वेगवेगळ्या विचारसरणीचे नेते परदेशात एका स्वरात भारताची बाजू मांडतात, तेव्हा जगाला मजबूत राष्ट्रीय एकतेचा संदेश जातो. शशी थरूर, सुप्रिया सुळे, कनिमोई, रविशंकर प्रसाद, जय पांडा, संजय झा, सलमान खुर्शीद, अनिल शर्मा आणि गुलाम नबी आझाद यांसारख्या नेत्यांचा उल्लेख करत ते म्हणाले, हे सर्वजण एकत्रितपणे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत करतात.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानUSअमेरिकाTerrorismदहशतवाद