शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 01:55 IST

महत्वाचे म्हणजे, भारत आणि अमेरिका यांच्यात परराष्ट्र नीतीवर महत्वाची चर्चा होत असतानाच, जयशंकर यांनी हे विधान केले आहे...

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारताने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे हल्ले झाले, तर भारत गप्प बसणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. ते सध्या चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून बुधवारी (२ जुलै २०२५) क्वाड परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जागतिक व्यासपीठावरून पाकिस्तानला फटकारले.

महत्वाचे म्हणजे, भारत आणि अमेरिका यांच्यात परराष्ट्र नीतीवर महत्वाची चर्चा होत असतानाच, जयशंकर यांनी हे विधान केले आहे. 

जगाने भारताची एकी बघितली -वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत क्वाड (QUAD) बैठकीनंतर, पत्रकारांसोबत बोलताना जयशंकर म्हणाले, यावेळी सर्व पक्षांच्या खासदारांनी भारताच्या जागतिक सहभागात एकजुटीने भाग घेतला.

...तेव्हा जगाला मजबूत राष्ट्रीय एकतेचा संदेश जातो -याला भारताची राजकीय विविधता, असे संबोधत जयशंकर म्हणाले, जेव्हा वेगवेगळ्या विचारसरणीचे नेते परदेशात एका स्वरात भारताची बाजू मांडतात, तेव्हा जगाला मजबूत राष्ट्रीय एकतेचा संदेश जातो. शशी थरूर, सुप्रिया सुळे, कनिमोई, रविशंकर प्रसाद, जय पांडा, संजय झा, सलमान खुर्शीद, अनिल शर्मा आणि गुलाम नबी आझाद यांसारख्या नेत्यांचा उल्लेख करत ते म्हणाले, हे सर्वजण एकत्रितपणे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत करतात.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानUSअमेरिकाTerrorismदहशतवाद