शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भारत-UAE 21व्या शतकाचा नवा इतिहास लिहित आहे; PM मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 22:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या UAE दौऱ्यावर आहेत. यावेळी अबुधाबीमध्ये पंतप्रधानांनी 'अहलान मोदी' कार्यक्रमाला संबोधित केले.

PM Narendra Modi At Abu Dhabi: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या UAE दौऱ्यावर आहेत. UAE ची राजधानी अबुधाबीमध्ये पंतप्रधानांनी 'अहलान मोदी' कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पीएम मोदींनी भारत आणि UAE च्या विकासावर भाष्य केले. 'आज भारत आणि यूएई मिळून 21व्या शतकाचा नवा इतिहास लिहित आहे. भारताची ओळख नव्या कल्पना आणि नवनवीन शोधांनी होत आहे. आज भारत पर्यटन स्थळ म्हणूनदेखील ओळखला जातोय. भारतात जी डिजिटल क्रांती झाली आहे, ते तुम्हा सर्वांना माहीत आहे. जगभरातून याचे कौतुक झाले, आता तुम्हालाही याचा फायदा घेता येईल,' असं मोदी यावेळी म्हणाले. 

तत्पूर्वी, पीएम मोदींनी अबुधाबीमध्ये हिंदू मंदिरासाठी जमीन दिल्याबद्दल यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे आभार मानले. पंतप्रधान यूएईला पोहोचताच दोन्ही नेत्यांमध्ये विस्तृत चर्चा झाली. अबुधाबीतील BAPS मंदिर हे राष्ट्रपतींच्या भारताप्रती असलेल्या आत्मीयतेचे आणि UAE च्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

पीएम मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...

-आजचा सशक्त भारत प्रत्येक पावलावर आपल्या लोकांच्या पाठीशी उभा आहे. गेल्या 10 वर्षात तुम्ही पाहिले आहे की, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना जिथे-जिथे समस्यांचा सामना करावा लागला, तिथे भारत सरकारने त्वरीत पावले उचलली. युक्रेन, सुदान, येमेन आणि इतर संकटांमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर काढले आहे आणि त्यांना भारतात आणले. जगाच्या विविध भागात स्थायिक झालेल्या आणि काम करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी सरकार अहोरात्र काम करत आहे.

-भारत आणि यूएई मिळून 21व्या शतकाचा नवा इतिहास लिहित आहे. यासाठी तुम्हा सर्वांचा मोठा पाठिंबा आहे, तुम्ही येथे करत असलेल्या कष्टातून भारतालाही ऊर्जा मिळत आहे. तुम्ही सर्वजण भारत आणि UAE मधील विकास आणि मैत्री मजबूत करत राहा. आज भारत आणि UAE मिळून जगाचा विश्वास मजबूत करत आहे. भारताने अतिशय यशस्वी G20 शिखर परिषद आयोजित केल्याचेही तुम्ही सर्वांनी पाहिले. यामध्ये आम्ही यूएईला भागीदार म्हणून आमंत्रित केले. आज जग भारताकडे विश्वबंधू म्हणून पाहत आहे. जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा तेथे पोहोचणाऱ्या पहिल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

-UAE ने भारताच्या सहकार्याने कार्ड सिस्टमला जीवन असे नाव दिले आहे. लवकरच UAE मध्ये UPI देखील लॉन्च होणार आहे. यामुळे UAE आणि भारतीय खात्यांमध्ये अखंड व्यवहार करता येतील. भारताच्या वाढत्या क्षमतेने जगाला आशा निर्माण केली. आज भारताची ओळख नव्या कल्पना आणि नवनवीन शोधांनी निर्माण होत आहे. आम्ही 50 कोटी लोकांना बँकिंगशी जोडले, लोकांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या, खेड्यापाड्यातील आणि ग्रामीण भागातील लोकांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही 1.5 लाखांहून अधिक आरोग्य मंदिरे बांधली. ज्यांनी भारताला भेट दिली, त्यांना माहिती आहे की भारतात किती वेगाने बदल होतोय.

-भारताचे यश हे प्रत्येक भारतीयाचे यश आहे. 10 वर्षात भारत 11व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतून जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला. माझा प्रत्येक भारतीयाच्या क्षमतेवर एवढा विश्वास आहे की, त्या आधारावर मी गॅरेंटी देत आहे. इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत आपला भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपला भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे. भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला. भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला ध्वज रोवला आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे, हे प्रत्येक भारतीयाचे ध्येय आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत