शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
3
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
4
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
5
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
6
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
7
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
8
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
9
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
10
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
11
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
12
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
13
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
14
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
16
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
17
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
19
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
20
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 15:35 IST

ब्रिक्समधील देश जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के आणि अर्थव्यवस्थेच्या ३० टक्के प्रतिनिधित्व करतात.

PM Modi in Brazil for BRICS Summit: पंतप्रधान मोदी १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलमधील डी जानेरो येथे पोहोचले आहेत. जगातील पाच प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी ब्रिक्स नावाची संघटना स्थापन केली, ज्यात नंतर आणखी काही देशांनाही सामील करण्यात आले. ब्रिक्समध्ये सामील असलेले देश ११ देश जगाच्या अर्थव्यवस्थेच्या ३० टक्के आहेत. दरम्यान, ब्रिक्स म्हणजे काय आणि तेभारतासाठी का महत्त्वाचे आहे? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

जगातील पाच प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी ब्रिक्स नावाची एक संघटना स्थापन केली आहे. संघटनेचे नाव ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या पाच देशांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या अनौपचारिक गटाचे नाव २००१ मध्ये विश्लेषक जिम ओ'नील यांनी ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या पहिल्या अक्षरांना एकत्र करून ठेवले होते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचाही या संघटनेत समावेश झाला, त्यानंतर या संघटनेचे नाव BRICS झाले.

आता इतके सदस्य देश BRICS मध्ये आहेत२०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाल्यानंतर, २०२४ मध्ये BRICS चा पुन्हा एकदा विस्तार झाला. यामध्ये सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया आणि UAE यांनाही पूर्ण सदस्य बनवण्यात आले. त्यानंतर, २०२५ मध्ये इंडोनेशियादेखील या संघटनेचे पूर्ण सदस्य बनले. याशिवाय, मलेशिया, बोलिव्हिया, बेलारूस, नायजेरिया, क्युबा, थायलंड, कझाकिस्तान, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम सारखे देश सदस्य देश म्हणून या संघटनेशी जोडले गेले आहेत. पाकिस्तानने अद्याप अधिकृतपणे ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी अर्ज केलेला नसला तरी, त्यांनी या संघटनेचे सदस्य होण्याची इच्छा अनेक वेळा व्यक्त केली आहे.

भारतासाठी का महत्त्वाचे ?भारताच्या जागतिक रणनीती आणि राजनैतिकतेसाठी ब्रिक्स खूप महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग हा राजनैतिक आणि आर्थिक रणनीतीला चालना देण्यासाठी खूप महत्वाचा आहे. पंतप्रधान मोदींची या शिखर परिषदेत उपस्थिती दर्शवते की, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका वाढत आहे. भारत आर्थिक सहकार्य, जागतिक शांतता आणि राजनैतिक संतुलन राखण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही सिद्ध होते. पुढील ब्रिक्स शिखर परिषद भारतात होणार असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती खूप महत्वाची आहे. 

पाश्चात्य देशांचे वर्चस्व खोडून काढणेविकासशील देशांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी आणि पाश्चात्य शक्तींच्या वर्चस्वाचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची स्थापना करण्यात आली. संघटनेचे उद्दिष्ट पारदर्शक आणि समावेशक, भेदभावरहित व्यापार व्यवस्था विकसित करणे आहे. याशिवाय, ब्रिक्समध्ये डॉलर व्यतिरिक्त एक समान चलन देखील चर्चेत आहे. अशा परिस्थितीत, जागतिक स्तरावर आपली पोहोच मजबूत करण्यासाठी भारत ब्रिक्ससारख्या जागतिक व्यासपीठांवर महत्वाचा आहे.

आर्थिक राजनैतिकतेसाठी फायदेशीरब्रिक्समध्ये समाविष्ट असलेले देश जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के आणि अर्थव्यवस्थेच्या ३० टक्के प्रतिनिधित्व करतात. अशा परिस्थितीत, भारत ब्रिक्सच्या माध्यमातून दक्षिणेकडील देशांशी आपले संबंध आणि द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करू शकतो. जागतिक स्तरावर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी या शिखर परिषदेत उपस्थिती खूप महत्वाची आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBrazilब्राझीलIndiaभारतrussiaरशियाchinaचीन