शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान यांच्या पहिल्या भाषणात मोदींच्या स्वप्नांची झलक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 09:08 IST

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी देशाला पहिल्यांदाच संबोधित केले.

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी देशाला पहिल्यांदाच संबोधित केले. यावेळी त्यांच्या भाषणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियान आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रभाव दिसून आला. स्वच्छतेला धर्माशी जोडत इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानमध्ये स्वच्छता अभियान सुरु करण्यात येईल आणि 50 लाख कमी बजेटमधील घरे बांधली जातील.  

स्वच्छता म्हणजे एकप्रकारे निम्मा धर्म आहे. संपूर्ण पाकिस्तानात स्वच्छता अभियान राबविले पाहिजे, कारण पाकिस्तान स्वच्छता आणि सुंदरतेच्या मुद्यावरुन युरोपीयन देशांशी सामना करु शकेल, असे इम्रान खान म्हणाले.  याचबरोबर, पंतप्रधान यांच्या बंगल्यात 524 कर्मचारी, 80 गाड्या आणि 33 बुलेट प्रूफ गाड्या आहेत. याशिवाय हेलिकॉप्टर आणि विमान आहे. तसचे, मुख्यमंत्री, गव्हर्नर, कमिश्नर यांच्याकडे मोठे-मोठे बंगले आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतर देशातील गरीब जनतेच्या डोक्यावर छप्पर नसल्याची नाराजी व्यक्त करत पाकिस्तानमधील नागरिकांना 50 लाख कमी बजेटमधील घरे बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचेही यावेळी इम्रान खान यांनी सांगितले.  दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवून 'स्वच्छ भारत स्वस्थ भारत'चा नारा दिला आहे. तसेच, देशातील प्रत्येक गरीब जनतेला घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवाज योजना सुरु केली आहे. 

इम्रान खान यांनी गेल्या शनिवारी पाकिस्तानच्या 22 व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. काळ्या रंगाची शेरवानी परिधान केलेल्या इम्रान यांनी उर्दूतून शपथ घेतली. काँग्रेस नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासह अनेक माजी आणि विद्यमान क्रिकेटपटू या सोहळ्याला उपस्थित होते.

जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, पक्षाकडे बहुमत नव्हते. शुक्रवारी सहयोगी पक्षांच्या मदतीने या पक्षाने आपले मताधिक्य संसदेत दाखवले. यावेळी इम्रान खान यांना 176 मते मिळाली तर पाकिस्तान मुस्लीम लीगचे उमेदवार शाहबाज शरीफ यांना 96 मते मिळाली. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी