शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

वंदे भारत मिशनअंतर्गत विदेशातून विमानाचं उड्डाण, श्रीनगरला होणार लँडींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 12:36 IST

वंदे भारत मिशन अंतर्गत दिल्ली आणि कलकत्ता येथे विदेशातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे मायभूमीत आगमन होणार आहे. सिंगापूर, ढाका आणि रियाद येथून भारतातील या शहरांमध्ये विमानांचे लँडिंग होणार आहे

नवी दिल्ली - देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारने काही शिथिलता दिल्याने विशेष रेल्वे, बससेवा सुरु करण्यात आली आहे. केवळ, विविध राज्यात आणि जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांची घरवापसी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विदेशात फसलेल्या नागरिकांनाही मायदेशी आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने वंदे भारत मिशन अंतर्गत विदेशात अडकलेल्या भारतीयांना मायभूमीत आणण्यास सुरुवात केली आहे. 

वंदे भारत मिशन अंतर्गत दिल्ली आणि कलकत्ता येथे विदेशातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे मायभूमीत आगमन होणार आहे. सिंगापूर, ढाका आणि रियाद येथून भारतातील या शहरांमध्ये विमानांचे लँडिंग होणार आहे. यापूर्वी गुरुवारी एअर इंडियाच्या दोन विमानातून ३६३ भारतीयांना मायदेशात आणण्यत आले आहे. एअर इंडियाच्या माहितीनुसार, आज विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन आज ५ विमाने भारतात येत आहेत. त्यामध्ये, सिंगापूर ते दिल्ली, रियाद, सौदी अरेबिया ते कोझीकोड, ढाका ते दिल्ली, बहरीन ते कोच्ची आणि युएई ते चेन्नई या ५ विमानांचा समावेश आहे. 

आत्तापर्यंत एअर इंडियाच्या दोन विमानांच्या उड्डाणाद्वारे ३६३ प्रवाशांना भारतात वापस आणण्यात आले आहे. या सर्वच प्रवाशांना केरळ सरकारने १४ दिवस क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, वंदे भारत मिशन अंतर्गत विदेशातील १२ देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायभूमीत आणण्यात येणार आहे. तर, अमेरिकेतून भारतात येण्याची प्रक्रिया ९ मे पासून सुरु होणार आहे. भारतात आल्यानंतर या सर्वच नागरिकांना क्वारंटाईन राहणे बंधनकारक असणार आहे.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाMumbaiमुंबईPuneपुणेpassengerप्रवासीcorona virusकोरोना वायरस बातम्या