शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

आव्हानाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानचा सूर बदलला! आता विनवणी करत म्हणतायत "दोन्ही देशांच्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:46 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भारतीय हवाई दलाच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील दणदणीत कारवाईनंतर पाकिस्तानच्या नेतृत्वात आता शांततेचा सूर उमटू लागला आहे. नेहमीच आव्हानाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने आता आपले सूर बदलले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भुट्टो यांनी भारताच्या ‘रॉ’ आणि पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर संस्थांमध्ये थेट संवाद घडवण्याची शिफारस केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या एका ब्रीफिंगमध्ये बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले की, "पाकिस्तान अजूनही भारतासोबत दहशतवादाविरोधातील लढ्यात सहकार्य करू इच्छितो. आपल्याला अब्जावधी लोकांचे भविष्य दहशतवादी गटांच्या हातात देऊन चालणार नाही."

रॉ आणि आयएसआय एकत्र आले तर... 

बिलावल भुट्टो यांनी स्पष्टपणे म्हटले की, रॉ आणि आयएसआय जर एकत्र आले, तर भारत आणि पाकिस्तानमधील दहशतवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यांचे हे वक्तव्य पाकिस्तानच्या आतल्या असुरक्षिततेचा आणि ऑपरेशन सिंदूरच्या तडाख्याचा परिणाम मानले जात आहे.

शाहबाज शरीफ यांचीही चर्चा करण्याची तयारीपाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही अलीकडेच अझरबैजानमध्ये झालेल्या तुर्की-पाकिस्तान-अझरबैजान त्रिपक्षीय परिषदेत भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी म्हटले की, "काश्मीर, पाणी आणि दहशतवाद यासारखे सर्व प्रश्न दोन्ही देशांनी शांततेने आणि एकत्र बसून सोडवले पाहिजेत." याआधी, तेहरानमध्ये दिलेल्या विधानातही शरीफ यांनी भारताशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला मोठा धक्का‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची ६ लढाऊ विमाने, २ हाय व्हॅल्यू फायटर जेट, १० यूसीएव्ही, १ सी-१३०  मालवाहू विमान, तसेच अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे नष्ट केली. यामुळे पाकिस्तानची लष्करी ताकद आणि मनोबल दोन्ही मोठ्या प्रमाणात हादरले आहे.

टॅग्स :IndiaभारतIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर