शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
2
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
3
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
4
विराट कोहली तर कसोटीतून निवृत्त झालाय! मग टीम इंडियाकडून १८ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात कोण उतरला?
5
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
6
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
7
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
8
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
9
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
10
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
11
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
12
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
13
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
14
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख
15
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत येणार; राम लल्लांचे दर्शन घेणार
16
पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू; नातेवाईकांनी फोडला टाहो, चाकणमधील घटना
17
अवघ्या ३१ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने केली होती आत्महत्या, गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकलेल्या बेड्या
18
Viral Video: ढोल- ताशाच्या तालावर महिलांचा हटके डान्स, थेट जमिनीवर लोळल्या; व्हिडीओ व्हायरल!
19
राहुल गांधींना धक्का, मानहानीच्या खटल्यात ती मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
20
पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर!

Pakistan : पाकच्या अडचणी वाढणार! नद्या सुकणार, पाण्याचं मोठं संकट कोसळणार; अभ्यासातून आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:42 IST

Pakistan : पाकिस्तानसमोर आता पाण्याचं आणखी एक मोठं संकट आले आहे. जर जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली, तर शतकाच्या अखेरीस हिंदू कुश हिमालयातील हिमनद्यांवरील बर्फ ७५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

Pakistan : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने 'सिंधू जल करार' स्थगित केला, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले. या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता पाकिस्तानसमोर आणखी एक मोठं पाणी संकट उभं राहण्याची शक्यता आहे.

एका नव्या अभ्यासानुसार, जर जागतिक तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली, तर शतकाच्या अखेरीस हिंदू कुश हिमालयातील हिमनद्यांमधील बर्फ सुमारे ७५ टक्क्यांनी वितळू शकतो. या पर्वतरांगांतील हिमनद्या अनेक मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहेत. त्यामुळे या नद्यांमधील पाण्याचा प्रवाह लक्षणीय प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, आधीच पाण्याच्या संकटाने त्रस्त असलेल्या पाकिस्तानच्या अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची चिन्हं आहेत. 

"आता वेळ आलीय..." रशियाचा मास्टरस्ट्रोक! भारताबाबत असं केले विधान, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं

या हिमनद्यांमधून पाणी मिळते आणि या नद्या दोन अब्ज लोकांच्या उपजीविकेचे साधन बनतात. एका नवीन अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. जर असे झाले तर काबूल, हेलमंड सारख्या नद्या कोरड्या पडतील. हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसाठी मोठा धक्का असेल. भारतासोबतच्या 'सिंधू जल' कराराअंतर्गत पाकिस्तानला आधीच अनेक नद्यांचे पाणी मिळते. अशा परिस्थितीत, जर हिंदू कुश पर्वतांचे हिमनदी वितळले तर काबूल नदीच्या प्रवाहावर परिणाम होईल. यामुळे पाकिस्तानचे थेट नुकसान होईल.

काबूल नदी हिंदूकुशच्या सांगलाख पर्वतरांगातून उगम पावते आणि नंतर पाकिस्तानातील ऐटक येथे सिंधू नदीला मिळते. ही सिंधूची सर्वात मोठी उपनदी आहे. 'सायन्स' या विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, जर देश पूर्व-औद्योगिक पातळीपासून तापमान वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित करू शकले तर हिमालय आणि काकेशस पर्वतरांगांमधील ४०-४५ टक्के हिमनदी बर्फ संरक्षित राहील. या शतकाच्या अखेरीस जर २.७ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली तर तर जागतिक स्तरावर हिमनदी बर्फाचा फक्त एक चतुर्थांश भाग टिकून राहील.

.... तरच सर्व प्रदेशांमध्ये काही हिमनदींचे बर्फ टिकून राहण्यास मदत

"मानवी समुदायांसाठी सर्वात महत्वाचे हिमनदी प्रदेश, जसे की युरोपियन आल्प्स, पश्चिम अमेरिका आणि कॅनडाच्या पर्वतरांगा आणि आइसलँड, विशेषतः वाईट परिणाम करतील. २ अंश सेल्सिअस तापमानात, या प्रदेशांचा जवळजवळ सर्व बर्फ कमी होऊ शकतो आणि २०२० च्या पातळीवर फक्त १०-१५ टक्के बर्फ शिल्लक राहील. स्कॅन्डिनेव्हियन पर्वतांचे भविष्य आणखी भयानक असू शकते, कारण या तापमानाच्या पातळीवर हिमनद्यांवर बर्फ शिल्लक राहणार नाही. २०१५ च्या पॅरिस कराराने ठरवलेल्या १.५ अंश सेल्सिअस लक्ष्यापर्यंत तापमान मर्यादित ठेवल्यास सर्व प्रदेशांमध्ये काही हिमनदींचे बर्फ टिकून राहण्यास मदत होईल, असे या अभ्यासात अधोरेखित केले आहे.

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या हिमनद्यांवरील पहिल्या संयुक्त राष्ट्र परिषदेसाठी जागतिक नेते ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे एकत्र येणार आहेत. यामध्ये ५० हून अधिक देश सहभागी होत आहेत, यात ३० देशांचे मंत्री किंवा उच्चस्तरीय अधिकारी यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWaterपाणीIndiaभारत