शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan : पाकच्या अडचणी वाढणार! नद्या सुकणार, पाण्याचं मोठं संकट कोसळणार; अभ्यासातून आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:42 IST

Pakistan : पाकिस्तानसमोर आता पाण्याचं आणखी एक मोठं संकट आले आहे. जर जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली, तर शतकाच्या अखेरीस हिंदू कुश हिमालयातील हिमनद्यांवरील बर्फ ७५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

Pakistan : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने 'सिंधू जल करार' स्थगित केला, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले. या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता पाकिस्तानसमोर आणखी एक मोठं पाणी संकट उभं राहण्याची शक्यता आहे.

एका नव्या अभ्यासानुसार, जर जागतिक तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली, तर शतकाच्या अखेरीस हिंदू कुश हिमालयातील हिमनद्यांमधील बर्फ सुमारे ७५ टक्क्यांनी वितळू शकतो. या पर्वतरांगांतील हिमनद्या अनेक मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहेत. त्यामुळे या नद्यांमधील पाण्याचा प्रवाह लक्षणीय प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, आधीच पाण्याच्या संकटाने त्रस्त असलेल्या पाकिस्तानच्या अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची चिन्हं आहेत. 

"आता वेळ आलीय..." रशियाचा मास्टरस्ट्रोक! भारताबाबत असं केले विधान, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं

या हिमनद्यांमधून पाणी मिळते आणि या नद्या दोन अब्ज लोकांच्या उपजीविकेचे साधन बनतात. एका नवीन अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. जर असे झाले तर काबूल, हेलमंड सारख्या नद्या कोरड्या पडतील. हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसाठी मोठा धक्का असेल. भारतासोबतच्या 'सिंधू जल' कराराअंतर्गत पाकिस्तानला आधीच अनेक नद्यांचे पाणी मिळते. अशा परिस्थितीत, जर हिंदू कुश पर्वतांचे हिमनदी वितळले तर काबूल नदीच्या प्रवाहावर परिणाम होईल. यामुळे पाकिस्तानचे थेट नुकसान होईल.

काबूल नदी हिंदूकुशच्या सांगलाख पर्वतरांगातून उगम पावते आणि नंतर पाकिस्तानातील ऐटक येथे सिंधू नदीला मिळते. ही सिंधूची सर्वात मोठी उपनदी आहे. 'सायन्स' या विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, जर देश पूर्व-औद्योगिक पातळीपासून तापमान वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित करू शकले तर हिमालय आणि काकेशस पर्वतरांगांमधील ४०-४५ टक्के हिमनदी बर्फ संरक्षित राहील. या शतकाच्या अखेरीस जर २.७ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली तर तर जागतिक स्तरावर हिमनदी बर्फाचा फक्त एक चतुर्थांश भाग टिकून राहील.

.... तरच सर्व प्रदेशांमध्ये काही हिमनदींचे बर्फ टिकून राहण्यास मदत

"मानवी समुदायांसाठी सर्वात महत्वाचे हिमनदी प्रदेश, जसे की युरोपियन आल्प्स, पश्चिम अमेरिका आणि कॅनडाच्या पर्वतरांगा आणि आइसलँड, विशेषतः वाईट परिणाम करतील. २ अंश सेल्सिअस तापमानात, या प्रदेशांचा जवळजवळ सर्व बर्फ कमी होऊ शकतो आणि २०२० च्या पातळीवर फक्त १०-१५ टक्के बर्फ शिल्लक राहील. स्कॅन्डिनेव्हियन पर्वतांचे भविष्य आणखी भयानक असू शकते, कारण या तापमानाच्या पातळीवर हिमनद्यांवर बर्फ शिल्लक राहणार नाही. २०१५ च्या पॅरिस कराराने ठरवलेल्या १.५ अंश सेल्सिअस लक्ष्यापर्यंत तापमान मर्यादित ठेवल्यास सर्व प्रदेशांमध्ये काही हिमनदींचे बर्फ टिकून राहण्यास मदत होईल, असे या अभ्यासात अधोरेखित केले आहे.

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या हिमनद्यांवरील पहिल्या संयुक्त राष्ट्र परिषदेसाठी जागतिक नेते ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे एकत्र येणार आहेत. यामध्ये ५० हून अधिक देश सहभागी होत आहेत, यात ३० देशांचे मंत्री किंवा उच्चस्तरीय अधिकारी यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWaterपाणीIndiaभारत