शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'बांगलादेशातील गोंधळामागे पाकिस्तानची ISI', शेख हसीना यांच्या मुलाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 08:51 IST

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात गोंधळाचे वातावरण सुरू आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीही देश सोडला आहे.

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात मोठा गोंधळ सुरू आहे. नोकरीतील आरक्षणावरुन निदर्शने, जाळपोळ झाली. दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही देश सोडला आहे. बांगलादेशातील सत्तापालटानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात पोहोचलेल्या शेख हसीना यांच्या मुलाने पाकिस्तानवर मोठा दावा केला आहे. बांगलादेशातील अराजकतेसाठी त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला जबाबदार धरले आहे.

शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांनी बांगलादेशात अशांतता पसरवल्याबद्दल आयएसआयला जबाबदार धरले असून त्यात पाकिस्तानचा हात असल्याचे म्हटले आहे. शेख हसीना बांगलादेशात परतण्याच्या शक्यतेबद्दल बोलताना ते म्हणाले की, बांगलादेशात लोकशाही बहाल होताच आई आपल्या देशात परतेल. ती नक्कीच पुनरागमन करेल पण ती निवृत्त नेते म्हणून परतणार की सक्रिय नेता म्हणून हे अद्याप ठरलेले नाही.

'शेख मुजीबुर रहमान यांचे कुटुंबीय त्यांच्या लोकांना आणि त्यांच्या पक्ष अवामी लीगला सोडणार नाहीत. अवामी लीग हा बांगलादेशातील सर्वात मोठा आणि जुना पक्ष आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत आपण आपल्या लोकांकडे पाठ फिरवू शकत नाही. बांगलादेशमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना झाल्यानंतर ती नक्कीच आपल्या देशात परतणार आहे, असंही ते म्हणाले. 

सजीब वाजेद जॉय यांनी आपली आई शेख हसीना यांच्या सुरक्षेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे आभार मानले आणि बांगलादेशमध्ये लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी दबाव आणण्याची विनंती केली. 'माझ्या आईच्या सुरक्षेसाठी मी भारत सरकारचा मनापासून आभारी आहे, असे जॉय म्हणाले. मी पंतप्रधान मोदींचा ऋणी आहे. भारताला पूर्वेकडील भागात स्थैर्य हवे असेल तर त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायावर दबाव आणावा लागेल. बांगलादेशातील 'इंडिया आऊट' मोहिमेबद्दल बोलताना जॉय म्हणाले की, भारतविरोधी शक्ती खूप सक्रिय आहेत आणि अवामी लीगला सत्तेतून बेदखल करून, आयएसआय आता बांगलादेशला पाहिजे तितकी शस्त्रे पुरवू शकते, असंही ते म्हणाले. 

तीव्र विरोधानंतर वक्फ बाेर्ड विधेयक जेपीसीकडे; विरोधी पक्षांसोबतच सरकारमधील तेलुगू देसमचीही मागणी; जनता दलाने दिला पाठिंबा

'भारताने दबाव आणला पाहिजे'

सजीब वाजेद जॉय म्हणाले, शेख हसीना बांगलादेशला परतणार नाही हे खरे आहे. पण गेल्या दोन दिवसात बरेच काही बदलले आहे. आता आम्ही आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते करू. आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही. अवामी लीग हा भारताचा सहयोगी असल्याचे सांगून जॉय म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून बांगलादेशातील अवामी लीगच्या नेत्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे. यासोबतच त्यांनी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नवीन अंतरिम सरकारला देशात कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत ठेवण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान