शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'बांगलादेशातील गोंधळामागे पाकिस्तानची ISI', शेख हसीना यांच्या मुलाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 08:51 IST

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात गोंधळाचे वातावरण सुरू आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीही देश सोडला आहे.

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात मोठा गोंधळ सुरू आहे. नोकरीतील आरक्षणावरुन निदर्शने, जाळपोळ झाली. दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही देश सोडला आहे. बांगलादेशातील सत्तापालटानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात पोहोचलेल्या शेख हसीना यांच्या मुलाने पाकिस्तानवर मोठा दावा केला आहे. बांगलादेशातील अराजकतेसाठी त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला जबाबदार धरले आहे.

शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांनी बांगलादेशात अशांतता पसरवल्याबद्दल आयएसआयला जबाबदार धरले असून त्यात पाकिस्तानचा हात असल्याचे म्हटले आहे. शेख हसीना बांगलादेशात परतण्याच्या शक्यतेबद्दल बोलताना ते म्हणाले की, बांगलादेशात लोकशाही बहाल होताच आई आपल्या देशात परतेल. ती नक्कीच पुनरागमन करेल पण ती निवृत्त नेते म्हणून परतणार की सक्रिय नेता म्हणून हे अद्याप ठरलेले नाही.

'शेख मुजीबुर रहमान यांचे कुटुंबीय त्यांच्या लोकांना आणि त्यांच्या पक्ष अवामी लीगला सोडणार नाहीत. अवामी लीग हा बांगलादेशातील सर्वात मोठा आणि जुना पक्ष आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत आपण आपल्या लोकांकडे पाठ फिरवू शकत नाही. बांगलादेशमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना झाल्यानंतर ती नक्कीच आपल्या देशात परतणार आहे, असंही ते म्हणाले. 

सजीब वाजेद जॉय यांनी आपली आई शेख हसीना यांच्या सुरक्षेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे आभार मानले आणि बांगलादेशमध्ये लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी दबाव आणण्याची विनंती केली. 'माझ्या आईच्या सुरक्षेसाठी मी भारत सरकारचा मनापासून आभारी आहे, असे जॉय म्हणाले. मी पंतप्रधान मोदींचा ऋणी आहे. भारताला पूर्वेकडील भागात स्थैर्य हवे असेल तर त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायावर दबाव आणावा लागेल. बांगलादेशातील 'इंडिया आऊट' मोहिमेबद्दल बोलताना जॉय म्हणाले की, भारतविरोधी शक्ती खूप सक्रिय आहेत आणि अवामी लीगला सत्तेतून बेदखल करून, आयएसआय आता बांगलादेशला पाहिजे तितकी शस्त्रे पुरवू शकते, असंही ते म्हणाले. 

तीव्र विरोधानंतर वक्फ बाेर्ड विधेयक जेपीसीकडे; विरोधी पक्षांसोबतच सरकारमधील तेलुगू देसमचीही मागणी; जनता दलाने दिला पाठिंबा

'भारताने दबाव आणला पाहिजे'

सजीब वाजेद जॉय म्हणाले, शेख हसीना बांगलादेशला परतणार नाही हे खरे आहे. पण गेल्या दोन दिवसात बरेच काही बदलले आहे. आता आम्ही आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते करू. आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही. अवामी लीग हा भारताचा सहयोगी असल्याचे सांगून जॉय म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून बांगलादेशातील अवामी लीगच्या नेत्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे. यासोबतच त्यांनी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नवीन अंतरिम सरकारला देशात कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत ठेवण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान