शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 21:27 IST

'ऑपरेशन सिंदूर'नंतर अनेक देशात शिष्टमंडळ पाठवून पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचे उघड केले.

भारताने 'ऑपरेशन सिंदूर'चे यश आणि पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे सत्य जगासमोर उघड केले. भारताने ३३ देशांमध्ये सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवले. आता पाकिस्तानने भारताची पुन्हा भारताची कॉपी केल्याचं दिसतंय. 

पहलगाम हल्ल्यानंतर जगासमोर पाकिस्तानचे सत्य उघड झाले. दरम्यान , आता पाकिस्तानने सोमवारी अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये आपले शिष्टमंडळ पाठवले.

रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा

पाकिस्तान या देशांमध्ये जाऊन भारतीय सैन्याने त्यांचे हवाई तळ आणि लष्करी तळ कसे उद्ध्वस्त केले त्यांची बाजू मांडेल. खोटी माहिती देऊन जगाची सहानुभूती मिळवणे हे पाकिस्तानचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या निर्देशानुसार, एक उच्चस्तरीय बहुपक्षीय शिष्टमंडळ सोमवारपासून न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लंडन आणि ब्रुसेल्सला भेट देत आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिली.

नऊ सदस्यांच्या शिष्टमंडळात संघीय मंत्री मुसादिक मलिक, माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार आणि खुर्रम दस्तगीर खान, माजी मंत्री सय्यद फैसल अली सब्जवारी, शेरी रहमान, सिनेटर बुशरा अंजुम बट यांचा समावेश आहे. शिष्टमंडळात माजी परराष्ट्र सचिव - जलील अब्बास जिलानी आणि तेहमीना जंजुआ यांचाही समावेश आहे.

भारताने ३३ देशांना भेट देऊन फक्त पाकिस्तानचा पर्दाफाश केला नाही तर भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागेल असा संदेशही दिला. तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर अनेक देशांनी पाकिस्तानचा निषेध केला.

लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला. आता लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांनी बांगलादेशातील कट्टरपंथींसोबत हात मिळवणी केली आहे. भारतात दहशतवाद्यांचे नवे नेटवर्क उभं करून स्लीपर सेल बनवण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे. या दोन्ही दहशतवादी संघटना भारताने केलेल्या कारवाईनंतर आक्रमक झाल्या आहेत. या हल्ल्याचा बदला घेण्याची संधी ते शोधत आहेत. सध्या भारत-बांगलादेश यांच्यात संबंध ठीक नाहीत त्याचा पाकिस्तानी दहशतवादी फायदा घेण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर