शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 21:27 IST

'ऑपरेशन सिंदूर'नंतर अनेक देशात शिष्टमंडळ पाठवून पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचे उघड केले.

भारताने 'ऑपरेशन सिंदूर'चे यश आणि पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे सत्य जगासमोर उघड केले. भारताने ३३ देशांमध्ये सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवले. आता पाकिस्तानने भारताची पुन्हा भारताची कॉपी केल्याचं दिसतंय. 

पहलगाम हल्ल्यानंतर जगासमोर पाकिस्तानचे सत्य उघड झाले. दरम्यान , आता पाकिस्तानने सोमवारी अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये आपले शिष्टमंडळ पाठवले.

रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा

पाकिस्तान या देशांमध्ये जाऊन भारतीय सैन्याने त्यांचे हवाई तळ आणि लष्करी तळ कसे उद्ध्वस्त केले त्यांची बाजू मांडेल. खोटी माहिती देऊन जगाची सहानुभूती मिळवणे हे पाकिस्तानचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या निर्देशानुसार, एक उच्चस्तरीय बहुपक्षीय शिष्टमंडळ सोमवारपासून न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लंडन आणि ब्रुसेल्सला भेट देत आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिली.

नऊ सदस्यांच्या शिष्टमंडळात संघीय मंत्री मुसादिक मलिक, माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार आणि खुर्रम दस्तगीर खान, माजी मंत्री सय्यद फैसल अली सब्जवारी, शेरी रहमान, सिनेटर बुशरा अंजुम बट यांचा समावेश आहे. शिष्टमंडळात माजी परराष्ट्र सचिव - जलील अब्बास जिलानी आणि तेहमीना जंजुआ यांचाही समावेश आहे.

भारताने ३३ देशांना भेट देऊन फक्त पाकिस्तानचा पर्दाफाश केला नाही तर भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागेल असा संदेशही दिला. तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर अनेक देशांनी पाकिस्तानचा निषेध केला.

लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला. आता लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांनी बांगलादेशातील कट्टरपंथींसोबत हात मिळवणी केली आहे. भारतात दहशतवाद्यांचे नवे नेटवर्क उभं करून स्लीपर सेल बनवण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे. या दोन्ही दहशतवादी संघटना भारताने केलेल्या कारवाईनंतर आक्रमक झाल्या आहेत. या हल्ल्याचा बदला घेण्याची संधी ते शोधत आहेत. सध्या भारत-बांगलादेश यांच्यात संबंध ठीक नाहीत त्याचा पाकिस्तानी दहशतवादी फायदा घेण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर