शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संबंध सुधारण्याची संधी भारतानं गमावली, आता शांतता अशक्य; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 09:38 IST

भारताने पाकिस्तानसोबतचे शांतता राखण्याची आणि मैत्रीचे संबंध सुधारण्याची संधी गमावली आहे.

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानसोबतचे शांतता राखण्याची आणि मैत्रीचे संबंध सुधारण्याची संधी गमावली आहे, आता शांतता अशक्य आहे असे वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी केलं आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार, खुर्रम यांनी सिनेटच्या बैठकीमध्ये हे वक्तव्य केलं आहे. 

सध्याच्या भारत सरकारने पाकिस्तानविरोधातील आपल्या शुत्रुता आणि विरोधी भूमिकेमुळं आता भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतीचे संबंध प्रस्तापित होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे त्यांनी वक्तव्य केलं आहे. ते पुढे म्हणाले की, भारतानं संधी गमावली आहे, पाकिस्तानमध्ये भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी राजकीय एकमत झालं होतं. पण भारताकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 

भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांनी सुंजवा येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानाला धमकी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत पाकिस्तानच्या खुर्रम यांनी हे वक्तव्य केलं आहे. सुंजवा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा भारतीय जवानासह एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. जानेवारी 2018 पासून दहशतवाद्यानं 200 पेक्षा आधिकवेळा सीमारेषेचा उल्लंघन केलं आहे. 

 दीड महिन्यात 20 पाकिस्तानी जवानांना भारतीय लष्करानं केलं ठार

 भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या मुसक्या आवळत आतापर्यंत 20 सैनिकांना ठार केलं आहे. पाकिस्तानच्या अनेक चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. यानंतर पाकिस्तानने सीमारेषा परिसरातील चौक्यांवर रेड अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानी अधिका-यांचे दौरेही वाढले आहेत. गतवर्षी सीमेपलीकडील 138 जवानांना ठार केल्याची माहिती मिळाली होती.  सुत्रांनुसार, लष्कराने गोरिला ऑपरेशन सुरु केलं आहे अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे. पाकिस्तानी लष्कर नियंत्रण रेषेवर दबावात राहिल यासाठी आम्ही रणनीती आखत आहोत. सध्या ते फक्त प्रत्युत्तर देण्याच्या परिस्थितीत आहेत. कारवाई करण्यासाठी कमांडोना मोकळे हात दिले आहेत. कारवाई करण्याआधी पुर्ण ऑपरेशन आखलं जात आहे आणि महत्वाची पाऊलं उचलली जात आहेत. आमच्या याच कारवायांना घाबरुन दहशतवादी हल्ले करण्याचे कट आखले जात आहेत असंही अधिका-याने सांगितलं आहे.

पाक करणार कारवाईइस्लामाबाद : लष्कर-ए-तय्यबा, अल-कायदा, तालिबान अशा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना व दहशतवादी लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पाकिस्तान सरकारने दहशतवादविरोधी कायद्यात दुरुस्ती केली आहे. त्या संदर्भात काढलेल्या एका अध्यादेशावर त्या देशाचे अध्यक्ष ममनून हुसैन यांनी स्वाक्षरी केली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादIndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन