शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

“एक दिवस जागतिक स्तरावरील सगळे संघ पाकिस्तानात खेळायला येतील” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 08:00 IST

न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यानंतर एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधाने येऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे.

इस्लामाबाद: अलीकडेच सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला. त्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला असून, एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधाने येऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी तर भारतानंतर आता इंग्लंड आणि न्यूझीलंडला शत्रू असल्याचे म्हटले आहे. यातच आता पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करत, एक दिवस असा येईल, जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व देशांचे क्रिकेट संघ पाकिस्तानात सामने खेळायला येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. (pakistan sheikh rashid says that india is responsible for new zealand tour cancel) 

धक्कादायक! मोफत धान्य घेणाऱ्यांचा ‘डबल गेम’; सरकारलाच पुन्हा विकले २०० कोटींचे रेशन

न्यूझीलंडची फौज नसेल, तितकी आर्मी आम्ही न्यूझीलंड संघाच्या सुरक्षिततेसाठी तैनात केली होती. न्यूझीलंड आणि इंग्लंडने दौरा रद्द केल्यानंतर सर्वांना असे वाटले की, पाकिस्तान आता एकटा पडेल. मात्र, हा त्यांचा गैरसमज आहे, असे सांगत न्यूझीलंडने दौरा रद्द केला तेव्हाच आता इंग्लंडही खेळण्यास नकार देईल, याचा अंदाज आला होता, असा दावा पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी केला आहे. 

PM CARES भारत सरकारचा फंड नाही, तो RTI अंतर्गत येत नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

एक दिवस सर्व संघ पाकिस्तानात खेळायला येतील

एका दिवस असा येईल, जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व देशांचे क्रिकेट संघ पाकिस्तानात खेळायला येतील, असा मला विश्वास आहे. मात्र, हे सर्व प्रकरण वाढवून सांगितले जात आहे. आता हा मुद्दा इथेच थांबवला गेला पाहिजे. कारण यापेक्षा अधिक महत्त्वाचे मुद्दे पाकिस्तानकडे आहेत, जिथे लक्ष घालणे आवश्यक आहे, असे रशीद यांनी म्हटले आहे. 

TATA ची कमाल! ‘ही’ कंपनी देतेय सलग तिसऱ्या वर्षी बोनस; हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी

भारत पाकिस्तानात दहशतवाद पसरवतोय

भारत हा न्यूझीलंड क्रिकेट संघाने दौरा रद्द करावा, असा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आल्यानंतर आता गृहमंत्री रशीद यांनी भारतच पाकिस्तानात दहशतवाद पसरवतोय, असा हास्यास्पद दावा केला आहे. भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका स्वतःला सुपरपॉवर समजू लागले आहेत, असा थयथयाटही रशीद यांनी केला. 

TVS चा धमाका! Bajaj ला मात देत ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर ठरली हीट; २७२१ टक्क्यांची वाढ

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेड बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर रमीज राजा यांनी वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरू केलेली दिसत आहे. भारताने पाकिस्तानच्या रणनीतीचा वापर करुन संघ बांधला आणि त्यानंतरच भारतीय संघ उत्तम झाला, असा दावा रमीज राजा यांनी केला आहे. यापूर्वी, न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरे रद्द केल्यानंतर, आम्ही आता वर्ल्डकप स्पर्धेत या सगळ्याचा बदला घेऊ. याआधी फक्त एकच संघ आमचा शत्रु होता. पण आता त्यात न्यूझीलंड आणि इंग्लंडचाही समावेश झाला आहे. कारण तुम्ही आमच्यासोबत योग्य वागला नाहीत आणि याचा बदला आम्ही मैदानात नक्कीच घेऊ, असे रमीज राजा यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternational cricketआंतरराष्ट्रीय क्रिकेटNew Zealandन्यूझीलंडEnglandइंग्लंडIndiaभारत