शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानच्या हल्ल्याने पाकिस्तान हादरलं; ख्वाजा आसिफ यांचा भारताचा उल्लेख करत थेट इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:32 IST

पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आता अफगाणिस्तानला खुल्या युद्धाचे आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, या वादात त्यांनी भारताचे नाव ओढत तालिबानवर गंभीर आरोप केले आहेत.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादाने आता अत्यंत हिंसक वळण घेतले आहे. गुरुवारी उशिरा रात्री अफगाणिस्तानने कुनार प्रांतात केलेल्या भीषण हल्ल्यात तब्बल ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा केला जात आहे. या मोठ्या जीवितहानीमुळे पाकिस्तान सरकार हादरले असून, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आता अफगाणिस्तानला खुल्या युद्धाचे आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, या वादात त्यांनी भारताचे नाव ओढत तालिबानवर गंभीर आरोप केले आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

'आमचा संयम संपलाय' - ख्वाजा आसिफ

अफगाणिस्तानकडून खैबर पख्तूनख्वा सीमेवर सतत होणाऱ्या गोळीबारावर ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, "पाकिस्तानचा संयम आता संपला आहे. पाकिस्तानचे सैन्य काही दुसऱ्या खंडातून आलेले नाही. आम्ही तुमचे शेजारी आहोत आणि तुमच्या मर्यादा आम्हाला नीट ठाऊक आहेत. आता जे होईल ते समोरासमोर आणि खुले युद्ध असेल."

तालिबानवर भारताचा एजंट असल्याचा आरोप

आपल्या संतापजनक प्रतिक्रियेत ख्वाजा आसिफ यांनी थेट भारताचा उल्लेख केला. त्यांनी दावा केला की, अफगाण तालिबान हे 'भारत समर्थक' असून ते दहशतवादाचा प्रसार करत आहेत. आसिफ यांच्या मते, नाटो सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबानने या देशाला भारतीय वसाहत बनवले आहे. तालिबान शासन आता भारताचा प्रतिनिधी म्हणून काम करत असून जगभरातील दहशतवाद्यांना एकत्र करून दहशतवादाची निर्यात करत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

दोन्ही बाजूंकडून विजयाचे मोठे दावे

या ताज्या संघर्षानंतर दोन्ही देशांकडून दावे-प्रतिदाव्यांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अफगाण सरकारने म्हटले आहे की, त्यांच्याकडे २३ पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आहेत. तसेच त्यांनी पाकिस्तानी सैन्याचे एक मुख्यालय आणि १९ चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनुसार, या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाक सैन्याने 'ऑपरेशन गजब लिल हक' सुरू केले आहे. यामध्ये ७२ अफगाण तालिबानी मारले गेल्याचा आणि १२० हून अधिक जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. ख्वाजा आसिफ यांनी भारताचे नाव घेतल्यामुळे या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Afghanistan attack shakes Pakistan; Khwaja Asif warns, mentions India.

Web Summary : Afghanistan's attack, claiming 55 Pakistani soldiers killed, escalates tensions. Pakistan's defense minister, Khwaja Asif, accuses Afghan Taliban of being pro-India, sparking an international row. Both sides claim victories in the conflict.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तान