शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 21:53 IST

Pakistan Balochistan Clash: भारताशी तणाव वाढत असताना दुसरीकडे पाकिस्तान देशांतर्गत विस्तव विझवण्याच्या प्रयत्नात

Pakistan Balochistan Clash: एकीकडे जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण बनले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तान देशांतर्गत विस्तव विझवण्याच्या प्रयत्नात व्यग्र आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तानचे लोक आधीच संतप्त आहेत आणि त्यात गेल्या काही दिवसांपासून बलोच नागरिकांचा विरोध अधिकच तीव्र होत चालला आहे. अशा परिस्थितीत, बलुचिस्तानच्या गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. १५० राजकीय कार्यकर्ते आणि अँक्टिव्हिस्ट यांची नजरकैदेतून सुटका केली आहे. पण यात पाकिस्तासाठी दिलासादायक बाब म्हणजे, बलुच चळवळीचा प्रमुख चेहरा बनलेल्या डॉ. महरंग बलोच आणि इतर ६ जणांची मात्र अजूनही तुरुंगातून सुटका करण्यात आलेली नाही.

काश्मीरमध्ये हल्ला, बलुचिस्तानात भीतीचे वातावरण!

भारतातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपले लक्ष सर्वात संवेदनशील असलेल्या बलुचिस्तान सीमेवर केंद्रित केले आहे. कारण येथील परिस्थिती आधीच स्फोटक आहे. लोक सरकारवर संतापले आहेत आणि निदर्शने अधिक तीव्र झाली आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तान सरकारने काही अंशी सौम्य भूमिका दाखवली आहे आणि बलुच यकजाहती कमिटी (BYC) आणि बलुचिस्तान नॅशनल पार्टी-मेंगलशी (BNP-M) संबंधित १५० लोकांना सोडले आहे. या सर्व कार्यकर्त्यांना २२ मार्चला सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या (MPO) कायद्याच्या कलम ३ अंतर्गत अटक करण्यात आली आणि क्वेटा जिल्हा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या कायद्यामुळे केवळ संशयाच्या आधारावर आरोप सिद्ध न होता आणि खटल्याशिवाय अटक करण्याची मुभा असते. त्यामुळे अनेकदा हा कायदा दडपशाही पद्धतीने वापरला जातो.

उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप, तरीही डॉ. महरंग अजूनही तुरुंगात

डॉ. महरंग बलोच यांचे वकील आणि इतर याचिकाकर्त्यांनी बलुचिस्तान उच्च न्यायालयात अपील केले होते. सोमवारी न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली, परंतु सरकारी वकिलांच्या विनंतीवरून सुनावणी मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. तथापि, बलुचिस्तान गृह विभागाने १५० कार्यकर्त्यांविरुद्ध जारी केलेले MPO आदेश मागे घेतले. वकिलांच्या मते, MPO-3 अंतर्गत अजूनही ताब्यात असलेल्या सात जणांमध्ये डॉ. महरंग बलोच, बिबू बलोच, गुलजादी बलोच यांचा समावेश आहे. सबघतुल्ला शाह, बेबर्ग बलोच, सनाउल्लाह बलोच, मामा गफ्फार बलोच (बीएनपी नेता आणि बिबूचे वडील) या सात जणांवर अजूनही कारवाई सुरू आहे आणि सरकार त्यांना सोडण्याच्या मनःस्थितीत नाही. पुढील सुनावणीत सरकारला या सात जणांच्या अटकेबाबत आपली बाजू मांडावी लागेल.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान