शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 21:53 IST

Pakistan Balochistan Clash: भारताशी तणाव वाढत असताना दुसरीकडे पाकिस्तान देशांतर्गत विस्तव विझवण्याच्या प्रयत्नात

Pakistan Balochistan Clash: एकीकडे जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण बनले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तान देशांतर्गत विस्तव विझवण्याच्या प्रयत्नात व्यग्र आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तानचे लोक आधीच संतप्त आहेत आणि त्यात गेल्या काही दिवसांपासून बलोच नागरिकांचा विरोध अधिकच तीव्र होत चालला आहे. अशा परिस्थितीत, बलुचिस्तानच्या गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. १५० राजकीय कार्यकर्ते आणि अँक्टिव्हिस्ट यांची नजरकैदेतून सुटका केली आहे. पण यात पाकिस्तासाठी दिलासादायक बाब म्हणजे, बलुच चळवळीचा प्रमुख चेहरा बनलेल्या डॉ. महरंग बलोच आणि इतर ६ जणांची मात्र अजूनही तुरुंगातून सुटका करण्यात आलेली नाही.

काश्मीरमध्ये हल्ला, बलुचिस्तानात भीतीचे वातावरण!

भारतातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपले लक्ष सर्वात संवेदनशील असलेल्या बलुचिस्तान सीमेवर केंद्रित केले आहे. कारण येथील परिस्थिती आधीच स्फोटक आहे. लोक सरकारवर संतापले आहेत आणि निदर्शने अधिक तीव्र झाली आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तान सरकारने काही अंशी सौम्य भूमिका दाखवली आहे आणि बलुच यकजाहती कमिटी (BYC) आणि बलुचिस्तान नॅशनल पार्टी-मेंगलशी (BNP-M) संबंधित १५० लोकांना सोडले आहे. या सर्व कार्यकर्त्यांना २२ मार्चला सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या (MPO) कायद्याच्या कलम ३ अंतर्गत अटक करण्यात आली आणि क्वेटा जिल्हा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या कायद्यामुळे केवळ संशयाच्या आधारावर आरोप सिद्ध न होता आणि खटल्याशिवाय अटक करण्याची मुभा असते. त्यामुळे अनेकदा हा कायदा दडपशाही पद्धतीने वापरला जातो.

उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप, तरीही डॉ. महरंग अजूनही तुरुंगात

डॉ. महरंग बलोच यांचे वकील आणि इतर याचिकाकर्त्यांनी बलुचिस्तान उच्च न्यायालयात अपील केले होते. सोमवारी न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली, परंतु सरकारी वकिलांच्या विनंतीवरून सुनावणी मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. तथापि, बलुचिस्तान गृह विभागाने १५० कार्यकर्त्यांविरुद्ध जारी केलेले MPO आदेश मागे घेतले. वकिलांच्या मते, MPO-3 अंतर्गत अजूनही ताब्यात असलेल्या सात जणांमध्ये डॉ. महरंग बलोच, बिबू बलोच, गुलजादी बलोच यांचा समावेश आहे. सबघतुल्ला शाह, बेबर्ग बलोच, सनाउल्लाह बलोच, मामा गफ्फार बलोच (बीएनपी नेता आणि बिबूचे वडील) या सात जणांवर अजूनही कारवाई सुरू आहे आणि सरकार त्यांना सोडण्याच्या मनःस्थितीत नाही. पुढील सुनावणीत सरकारला या सात जणांच्या अटकेबाबत आपली बाजू मांडावी लागेल.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान