शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पाकिस्तानची गयावया; काश्मीर प्रश्नी बैठक घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रापुढे जोडले हात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 18:38 IST

पाकिस्ताने जम्मू-काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तात्काळ बैठक बोलविण्याची विनंती केली आहे. 

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370  केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. या निर्णयाविरोधात पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात धाव घेतली आहे. पाकिस्ताने जम्मू-काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तात्काळ बैठक बोलविण्याची विनंती केली आहे. 

वृत्तसंस्था रॉयटरने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बुधवारी जारी करण्यात आलेल्या एका पत्राच्या आधारे ही माहिती मिळाली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचे अध्यक्ष जोआना रोनेका यांना लिहिलेल्या पत्रात भारत-पाकिस्तानच्या मुद्द्यावरील बैठकीत भाग घेण्यासाठी आग्रह केला आहे. दरम्यान, याआधी कलम 370 रद्द केल्याप्रकरणी पाकिस्तानद्वारे लिहिलेल्या पत्रावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचे अध्यक्ष जोआना रोनेका यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तसेच, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनिओ गुटेरस यांनीही याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महसूद कुरैशी यांनी संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत आपल्या समर्थन मिळणार नसल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते, 'संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत आपल्याला समर्थन मिळणे कठीण आहे. आपल्याला मधमाशीच्या स्वर्गात राहायचे नाही. पाकिस्तानमधील जनतेला माहीत पाहिजे की आपल्या बाजूने कोणी नाही. तुम्हाला मेहनत करावी लागणार. भावना व्यक्त करणे सोपे आहे. हे काम डाळ्या हाताचे आहे, मला फक्त दोन मिनिटं लागतील. मात्र, या मुद्द्याला पुढे घेऊन जाणे फार कठीण असते. संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य देश आहेत. त्यामुळे कोणही विटोचा वापर करु शकतात. संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांनी भारतात अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पाकिस्तानला साथ मिळेल, याबाबत सांगणे कठीण आहे.'   

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचे कलम 370 रद्द केल्यानंतर जळफळाट करणाऱ्या पाकिस्तानला जगभरातील कोणत्याच देशाकडून समर्थन मिळत नाही. रशिया, चीन आणि अमेरिका या जगातील  तीन बलाढ्य देशांनी सुद्धा यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर