शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाकिस्तानची गयावया; काश्मीर प्रश्नी बैठक घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रापुढे जोडले हात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 18:38 IST

पाकिस्ताने जम्मू-काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तात्काळ बैठक बोलविण्याची विनंती केली आहे. 

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370  केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. या निर्णयाविरोधात पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात धाव घेतली आहे. पाकिस्ताने जम्मू-काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तात्काळ बैठक बोलविण्याची विनंती केली आहे. 

वृत्तसंस्था रॉयटरने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बुधवारी जारी करण्यात आलेल्या एका पत्राच्या आधारे ही माहिती मिळाली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचे अध्यक्ष जोआना रोनेका यांना लिहिलेल्या पत्रात भारत-पाकिस्तानच्या मुद्द्यावरील बैठकीत भाग घेण्यासाठी आग्रह केला आहे. दरम्यान, याआधी कलम 370 रद्द केल्याप्रकरणी पाकिस्तानद्वारे लिहिलेल्या पत्रावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचे अध्यक्ष जोआना रोनेका यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तसेच, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनिओ गुटेरस यांनीही याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महसूद कुरैशी यांनी संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत आपल्या समर्थन मिळणार नसल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते, 'संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत आपल्याला समर्थन मिळणे कठीण आहे. आपल्याला मधमाशीच्या स्वर्गात राहायचे नाही. पाकिस्तानमधील जनतेला माहीत पाहिजे की आपल्या बाजूने कोणी नाही. तुम्हाला मेहनत करावी लागणार. भावना व्यक्त करणे सोपे आहे. हे काम डाळ्या हाताचे आहे, मला फक्त दोन मिनिटं लागतील. मात्र, या मुद्द्याला पुढे घेऊन जाणे फार कठीण असते. संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य देश आहेत. त्यामुळे कोणही विटोचा वापर करु शकतात. संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांनी भारतात अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पाकिस्तानला साथ मिळेल, याबाबत सांगणे कठीण आहे.'   

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचे कलम 370 रद्द केल्यानंतर जळफळाट करणाऱ्या पाकिस्तानला जगभरातील कोणत्याच देशाकडून समर्थन मिळत नाही. रशिया, चीन आणि अमेरिका या जगातील  तीन बलाढ्य देशांनी सुद्धा यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर