शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Pakistan PM on Kashmir: ज्याच्यामुळे भिकेला लागला, तो काश्मीर काही सोडवेना; शाहबाज शरीफांनी पाकिस्तानींना केले संबोधित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 8:16 AM

इम्रान खान यांनीदेखील पंतप्रधान पदावर येण्यासाठी भारताचाच आधार घेतला होता. परंतू आता पद गेल्यावर भारताविरोधात चकार शब्दही काढत नाहीएत.

पाकिस्तान आता आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. कधीही तोल ढळू शकतो, आणि अराजकता पैदा होऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी ज्याच्यामुळे पाकिस्तान भिकेला लागला त्या काश्मीरचा राग आळवायचे काही कमी होत नाहीय. जनतेत उद्रेक वाढला की लगेचच काश्मीरवर बोलायचे आणि लोकांचे लक्ष तिकडे वळवायचे, या कित्येक वर्षांपासूनच्या सूत्रावर शाहबाज शरीफ आले आहेत. 

इम्रान खान यांनीदेखील पंतप्रधान पदावर येण्यासाठी भारताचाच आधार घेतला होता. परंतू आता पद गेल्यावर भारताविरोधात चकार शब्दही काढत नाहीएत. उलट भारताची स्तुती करत आहे. असे असताना शुक्रवारी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने आर्टिकल ३७० चा निर्णय रद्द करावा असे म्हटले आहे. 

शुक्रवारी शरीफ यांनी पाकिस्तानला संबोधित केले. यावेळी त्यांनी काश्मीरचा विषय काढलाच. आशिया खंडात जर शांतता नांदायची असेल तर ५ ऑगस्ट २०१९ मध्ये घेतलेला एकतर्फी निर्णय संपविण्याची भारताची जबाबदारी आहे. यामुळे जम्मू-काश्मीरचा प्रश्न चर्चेतून सोडविला जाऊ शकेल, असे ते म्हणाले. 

पाकिस्तानात गुरुवारी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत ३० रुपयांची वाढ करण्यात आली. पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचविण्यासाठी इंधनाच्या दरात वाढ करणे गरजेचे होते, असे शरीफ म्हणाले. या पाकिस्तानने काश्मीरवरून भारतात दहशतवाद पसरविण्यासाठी करोडो डॉलर्स दहशतवादावर खर्च केले आहेत. परदेशी मदतीतून येणारा पैसा देखील यासाठी खर्च करण्यात आला होता. आता पाकिस्तानकडे इंधनालाच नाही तर अन्न धान्य खरेदीसाठी देखील पैसा उरलेला नाही. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर