शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

'आम्ही धडा शिकलो, भारतासोबत मैत्री करुन द्या', शाहबाज शरीफ यांची 'या' मुस्लिम देशाला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 21:32 IST

'आम्हाला शांतता हवीये, काश्मीर वाद सोडवण्यासाठी प्रामाणिक चर्चा करण्यास तयार आहोत.'- पाकिस्तान PM शाहबाज शरीफ

इस्लामाबाद:पाकिस्तान (Pakistan) आतापर्यंतच्या सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आल्यानंतर आता पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना भारताची मैत्री आठवतीये. शरीफ यांना भारतासोबत चर्चा करायची असून, त्यासाठी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांना मध्यस्थी करण्यासाठी विनंती केली आहे. 

UAEला मध्यस्थीचे आवाहनपाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने बुधवारी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार शाहबाज शरीफ यांनी यूएईला म्हटले की, तुमचे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. तुम्ही आमचे मुस्लिम बांधव आहात, त्यामुळे आम्हाला मदत करा आणि भारतासोबत आमची चर्चा करुन देण्यास मध्यस्थी करा. या संदर्भात अल अरेबिया वृत्तवाहिनीने पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मुलाखतही दोन भागात प्रसारित केली आहे. 

चर्चा होणे महत्वाचेया मुलाखतीचा दुसरा भाग बुधवारी प्रसारित झाला, ज्यामध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. आम्हाला शांतता हवी आहे आणि त्यासाठी गंभीर चर्चा होणे गरजेचे आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज म्हणाले. आम्ही यूएईला वचन दिले आहे की, आता पाकिस्तान पूर्ण प्रामाणिकपणे चर्चा करू इच्छितो आणि चांगला परिणाम मिळवू इच्छितो. त्यांनी 12 जानेवारी रोजी अबुधाबीमध्ये शेख अल ननाहयान यांची भेट घेतली.

आम्हाला धडा मिळालाभारतासोबतच्या युद्धांची आठवण करून देताना शरीफ म्हणाले की, आम्ही चांगलाच धडा शिकलो आहोत. आता आम्हाला शांततेत जगायचे आहे, आम्हाला गरिबी संपवायची आहे, आमच्या लोकांना शिक्षण द्यायचे आहे, आरोग्य सुविधा आणि रोजगार द्यायचा आहे. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझा संदेश आहे की, आपण बसून काश्मीर वाद आणि इतर समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक चर्चा करू. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती