शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही धडा शिकलो, भारतासोबत मैत्री करुन द्या', शाहबाज शरीफ यांची 'या' मुस्लिम देशाला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 21:32 IST

'आम्हाला शांतता हवीये, काश्मीर वाद सोडवण्यासाठी प्रामाणिक चर्चा करण्यास तयार आहोत.'- पाकिस्तान PM शाहबाज शरीफ

इस्लामाबाद:पाकिस्तान (Pakistan) आतापर्यंतच्या सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आल्यानंतर आता पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना भारताची मैत्री आठवतीये. शरीफ यांना भारतासोबत चर्चा करायची असून, त्यासाठी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांना मध्यस्थी करण्यासाठी विनंती केली आहे. 

UAEला मध्यस्थीचे आवाहनपाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने बुधवारी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार शाहबाज शरीफ यांनी यूएईला म्हटले की, तुमचे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. तुम्ही आमचे मुस्लिम बांधव आहात, त्यामुळे आम्हाला मदत करा आणि भारतासोबत आमची चर्चा करुन देण्यास मध्यस्थी करा. या संदर्भात अल अरेबिया वृत्तवाहिनीने पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मुलाखतही दोन भागात प्रसारित केली आहे. 

चर्चा होणे महत्वाचेया मुलाखतीचा दुसरा भाग बुधवारी प्रसारित झाला, ज्यामध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. आम्हाला शांतता हवी आहे आणि त्यासाठी गंभीर चर्चा होणे गरजेचे आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज म्हणाले. आम्ही यूएईला वचन दिले आहे की, आता पाकिस्तान पूर्ण प्रामाणिकपणे चर्चा करू इच्छितो आणि चांगला परिणाम मिळवू इच्छितो. त्यांनी 12 जानेवारी रोजी अबुधाबीमध्ये शेख अल ननाहयान यांची भेट घेतली.

आम्हाला धडा मिळालाभारतासोबतच्या युद्धांची आठवण करून देताना शरीफ म्हणाले की, आम्ही चांगलाच धडा शिकलो आहोत. आता आम्हाला शांततेत जगायचे आहे, आम्हाला गरिबी संपवायची आहे, आमच्या लोकांना शिक्षण द्यायचे आहे, आरोग्य सुविधा आणि रोजगार द्यायचा आहे. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझा संदेश आहे की, आपण बसून काश्मीर वाद आणि इतर समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक चर्चा करू. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती