शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानची स्थिती सुधारण्यासाठी भारत आयोजित करणार NSA स्तरीय बैठक, पाकचा सहभागी होण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:28 IST

India NSA Level Meeting on Afghanistan: भारत (India) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पातळीवरील बैठकीचं आयोजन करणार आहे.

India NSA Level Meeting on Afghanistan: भारत (India) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पातळीवरील बैठकीचं आयोजन करणार आहे. या बैठकीसाठी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. पण त्यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. उझबेकिस्तानसोबतच्या एका सुरक्षा करारावर स्वाक्षरी करताना पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याची माहिती दिली आहे. याबाबतचं वृत्त पाकिस्तानच्या बिझनेस रेकॉर्ड या वृत्तपत्रात देखील छापून आलं आहे. 

भारतानं आयोजित केलेल्या बैठकीचं निमंत्रण पाकिस्ताननं स्वीकारलं आहे का? याबाबत युसूफ यांना विचारण्यात आलं असता त्यांनी 'मी जाणार नाही' असं उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं याआधीच भारतानं आयोजित केलेल्या बैठकीसाठी निमंत्रण आल्याची माहिती दिली होती. भारताकडून अधिकृतरित्या रशिया, इराण, चीन, पाकिस्तान, तझाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांना निमंत्रित करण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात ही उच्चस्तरिय बैठक होणार आहे. 

मॉक्सोत देखील झाली होती बैठकरशियानं याआधी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मॉक्सोत बैठकीचं आयोजन केलं होतं. यात भारत देखील सहभागी झाला होता. यात तालिबानच्या उच्चस्तरिय प्रतिनिधी मंडळानं अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारचे उप प्रधानमंत्री अब्दुल सलाम हनफी यांच्या नेतृत्त्वात उपस्थिती लावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली होती. 

भारतानं बैठकीत काय म्हटलं?मॉक्सोमध्ये झालेल्या बैठकीत भारतानं अफगाणिस्तानला व्यापक पद्धतीनं मानवीय सहाय्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अफगाणिस्तानातील स्थिती सुधारण्यासाठी भारत ठामपणे उभा आहे, असंही म्हणण्यात आलं होतं. तालिबाननं ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तानातील सरकार कोसळलं. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक भागात भूकबळीची स्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या भूकबळीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. ज्यामुळे आगामी काळात देशात खूप मोठं मानवीय संकट कोसळू शकतं. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानIndiaभारतTalibanतालिबानPakistanपाकिस्तान