शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

अफगाणिस्तानची स्थिती सुधारण्यासाठी भारत आयोजित करणार NSA स्तरीय बैठक, पाकचा सहभागी होण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:28 IST

India NSA Level Meeting on Afghanistan: भारत (India) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पातळीवरील बैठकीचं आयोजन करणार आहे.

India NSA Level Meeting on Afghanistan: भारत (India) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पातळीवरील बैठकीचं आयोजन करणार आहे. या बैठकीसाठी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. पण त्यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. उझबेकिस्तानसोबतच्या एका सुरक्षा करारावर स्वाक्षरी करताना पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याची माहिती दिली आहे. याबाबतचं वृत्त पाकिस्तानच्या बिझनेस रेकॉर्ड या वृत्तपत्रात देखील छापून आलं आहे. 

भारतानं आयोजित केलेल्या बैठकीचं निमंत्रण पाकिस्ताननं स्वीकारलं आहे का? याबाबत युसूफ यांना विचारण्यात आलं असता त्यांनी 'मी जाणार नाही' असं उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं याआधीच भारतानं आयोजित केलेल्या बैठकीसाठी निमंत्रण आल्याची माहिती दिली होती. भारताकडून अधिकृतरित्या रशिया, इराण, चीन, पाकिस्तान, तझाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांना निमंत्रित करण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात ही उच्चस्तरिय बैठक होणार आहे. 

मॉक्सोत देखील झाली होती बैठकरशियानं याआधी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मॉक्सोत बैठकीचं आयोजन केलं होतं. यात भारत देखील सहभागी झाला होता. यात तालिबानच्या उच्चस्तरिय प्रतिनिधी मंडळानं अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारचे उप प्रधानमंत्री अब्दुल सलाम हनफी यांच्या नेतृत्त्वात उपस्थिती लावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली होती. 

भारतानं बैठकीत काय म्हटलं?मॉक्सोमध्ये झालेल्या बैठकीत भारतानं अफगाणिस्तानला व्यापक पद्धतीनं मानवीय सहाय्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अफगाणिस्तानातील स्थिती सुधारण्यासाठी भारत ठामपणे उभा आहे, असंही म्हणण्यात आलं होतं. तालिबाननं ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तानातील सरकार कोसळलं. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक भागात भूकबळीची स्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या भूकबळीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. ज्यामुळे आगामी काळात देशात खूप मोठं मानवीय संकट कोसळू शकतं. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानIndiaभारतTalibanतालिबानPakistanपाकिस्तान