शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

अफगाणिस्तानची स्थिती सुधारण्यासाठी भारत आयोजित करणार NSA स्तरीय बैठक, पाकचा सहभागी होण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:28 IST

India NSA Level Meeting on Afghanistan: भारत (India) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पातळीवरील बैठकीचं आयोजन करणार आहे.

India NSA Level Meeting on Afghanistan: भारत (India) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पातळीवरील बैठकीचं आयोजन करणार आहे. या बैठकीसाठी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. पण त्यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. उझबेकिस्तानसोबतच्या एका सुरक्षा करारावर स्वाक्षरी करताना पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याची माहिती दिली आहे. याबाबतचं वृत्त पाकिस्तानच्या बिझनेस रेकॉर्ड या वृत्तपत्रात देखील छापून आलं आहे. 

भारतानं आयोजित केलेल्या बैठकीचं निमंत्रण पाकिस्ताननं स्वीकारलं आहे का? याबाबत युसूफ यांना विचारण्यात आलं असता त्यांनी 'मी जाणार नाही' असं उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं याआधीच भारतानं आयोजित केलेल्या बैठकीसाठी निमंत्रण आल्याची माहिती दिली होती. भारताकडून अधिकृतरित्या रशिया, इराण, चीन, पाकिस्तान, तझाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांना निमंत्रित करण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात ही उच्चस्तरिय बैठक होणार आहे. 

मॉक्सोत देखील झाली होती बैठकरशियानं याआधी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मॉक्सोत बैठकीचं आयोजन केलं होतं. यात भारत देखील सहभागी झाला होता. यात तालिबानच्या उच्चस्तरिय प्रतिनिधी मंडळानं अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारचे उप प्रधानमंत्री अब्दुल सलाम हनफी यांच्या नेतृत्त्वात उपस्थिती लावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली होती. 

भारतानं बैठकीत काय म्हटलं?मॉक्सोमध्ये झालेल्या बैठकीत भारतानं अफगाणिस्तानला व्यापक पद्धतीनं मानवीय सहाय्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अफगाणिस्तानातील स्थिती सुधारण्यासाठी भारत ठामपणे उभा आहे, असंही म्हणण्यात आलं होतं. तालिबाननं ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तानातील सरकार कोसळलं. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक भागात भूकबळीची स्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या भूकबळीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. ज्यामुळे आगामी काळात देशात खूप मोठं मानवीय संकट कोसळू शकतं. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानIndiaभारतTalibanतालिबानPakistanपाकिस्तान