शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

भारतासोबत पुन्हा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय पाकिस्तान; दुसऱ्या देशात जाऊन काश्मीर प्रश्न उपस्थित केला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 08:27 IST

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्न उपस्थित करून पुन्हा एकदा भारताच्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर, हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर, ते विनाशकारी ठरू शकते, असे वक्तव्य पाकिस्तानच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे. जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध अजूनही तणावपूर्ण असताना, पाकिस्तानने हे वक्तव्य केले आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरचा मुद्दा देखील अतिशय ज्वलंत प्रश्न ठरत आहे. 

डॉन वृत्तपत्राचा हवाला देत पीटीआयने म्हटले की, पाकिस्तानच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे प्रमुख जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी शनिवारी संध्याकाळी सिंगापूरमध्ये आशियचा प्रमुख संरक्षण मंच शांग्री-ला डायलॉगमध्ये हे भाष्य केले. भारताने काश्मीरचा मुद्दा सातत्याने द्वीपक्षीय मुद्दा म्हणून पाहिला आहे. परंतु, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वारंवार काश्मीरचा उल्लेख केला, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'प्रादेशिक संकट-व्यवस्थापन यंत्रणा' या विषयावरील सत्रादरम्यान जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी काश्मीरचा उल्लेख वाद म्हणून केला. या मुद्द्द्यावर आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी अशा देशांचाही उल्लेख केला, जे मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, चीन, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. 

काश्मीर प्रश्न लवकर सोडवणे आवश्यक!  जनरल साहिर शमशाद मिर्झा म्हणाले की, "संघर्ष नियंत्रणापलीकडे जाऊन संघर्ष निराकरणाकडे जाणे अत्यावश्यक झाले आहे. यामुळे शांतता प्रस्थापित होईल. दक्षिण आशियातील शाश्वत शांततेसाठी, 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि लोकांच्या आकांक्षांनुसार काश्मीर प्रश्न लवकर सोडवणे आवश्यक आहे."

यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नासोबतच पाकिस्तान आणि भारत यांच्यात नुकत्याच झालेल्या लष्करी संघर्षाचाही उल्लेख केला. याविषयी बोलताना ते म्हणाले की, "जेव्हा कोणतेही संकट नसते, तेव्हा काश्मीरवर कधीच चर्चा होत नाही. पण, आम्ही नेहमी हा मुद्दा प्रत्येक स्तरावर मंडला आहे. काश्मीरच्या लोकांच्या आकांक्षा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार काश्मीर वादाचे निराकरण केल्यावरच अनेक प्रश्न सुटतील."

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानIndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओके