शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

भारतासोबत पुन्हा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय पाकिस्तान; दुसऱ्या देशात जाऊन काश्मीर प्रश्न उपस्थित केला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 08:27 IST

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्न उपस्थित करून पुन्हा एकदा भारताच्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर, हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर, ते विनाशकारी ठरू शकते, असे वक्तव्य पाकिस्तानच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे. जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध अजूनही तणावपूर्ण असताना, पाकिस्तानने हे वक्तव्य केले आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरचा मुद्दा देखील अतिशय ज्वलंत प्रश्न ठरत आहे. 

डॉन वृत्तपत्राचा हवाला देत पीटीआयने म्हटले की, पाकिस्तानच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे प्रमुख जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी शनिवारी संध्याकाळी सिंगापूरमध्ये आशियचा प्रमुख संरक्षण मंच शांग्री-ला डायलॉगमध्ये हे भाष्य केले. भारताने काश्मीरचा मुद्दा सातत्याने द्वीपक्षीय मुद्दा म्हणून पाहिला आहे. परंतु, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वारंवार काश्मीरचा उल्लेख केला, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'प्रादेशिक संकट-व्यवस्थापन यंत्रणा' या विषयावरील सत्रादरम्यान जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी काश्मीरचा उल्लेख वाद म्हणून केला. या मुद्द्द्यावर आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी अशा देशांचाही उल्लेख केला, जे मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, चीन, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. 

काश्मीर प्रश्न लवकर सोडवणे आवश्यक!  जनरल साहिर शमशाद मिर्झा म्हणाले की, "संघर्ष नियंत्रणापलीकडे जाऊन संघर्ष निराकरणाकडे जाणे अत्यावश्यक झाले आहे. यामुळे शांतता प्रस्थापित होईल. दक्षिण आशियातील शाश्वत शांततेसाठी, 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि लोकांच्या आकांक्षांनुसार काश्मीर प्रश्न लवकर सोडवणे आवश्यक आहे."

यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नासोबतच पाकिस्तान आणि भारत यांच्यात नुकत्याच झालेल्या लष्करी संघर्षाचाही उल्लेख केला. याविषयी बोलताना ते म्हणाले की, "जेव्हा कोणतेही संकट नसते, तेव्हा काश्मीरवर कधीच चर्चा होत नाही. पण, आम्ही नेहमी हा मुद्दा प्रत्येक स्तरावर मंडला आहे. काश्मीरच्या लोकांच्या आकांक्षा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार काश्मीर वादाचे निराकरण केल्यावरच अनेक प्रश्न सुटतील."

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानIndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओके