शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 08:39 IST

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला. दोन्ही देशातील सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील सैन्य अलर्ट आहेत. पाकिस्तान सैन्याकडून सलग ११ दिवस शस्त्राचे उल्लंघन केले आहेत. याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.  दरम्यान, आता पाकिस्तानने भारताची भीती घेतली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना भारताकडून हल्ल्याची भीती वाटते. ते म्हणाले की, भारत काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ कधीही लष्करी हल्ला करू शकतो. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असताना आसिफ यांचे हे विधान आले आहे. “भारत नियंत्रण रेषेजवळील कोणत्याही ठिकाणी हल्ला करू शकतो असे वृत्त आहे,” असे आसिफ यांनी सोमवारी इस्लामाबादमध्ये पत्रकारांना सांगितले. नवी दिल्लीला योग्य उत्तर दिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय फायद्यासाठी या प्रदेशाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..."

खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये नवी दिल्लीचा सहभाग असल्याचा आरोप ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा केला. 'आम्ही २०१६ आणि २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्रांना पुरावे दिले होते, यात भारत दहशतवादाला निधी देत ​​असल्याचे व्हिडीओ होते, असा दावा केला. दोन्ही प्रांतांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या दहशतवादी घटना अफगाणिस्तानातून कार्यरत असलेल्या संघटनांनी घडवून आणल्या आणि त्यांना भारताकडून पाठिंबा मिळाल्याचा आरोप आसिफ यांनी केला. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी केली चौकशीची मागणी

संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले, "यात भारत सहभागी होता की काही अंतर्गत संघटना सहभागी होत्या हे तपासातून स्पष्ट होतील. तसेच, नवी दिल्लीच्या निराधार आरोपांमागील सत्य स्पष्ट होईल. गेल्या आठवड्यात, माहिती मंत्री अत्ता तरार यांनी सांगितले होते की भारताकडून संभाव्य हल्ल्याची शक्यता असल्याने पुढील २४-३६ तास महत्त्वाचे आहेत. वेळ निघून गेला आणि भारताकडून कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी सोमवारी पुन्हा एकदा सांगितले की पाकिस्तान आपल्या राष्ट्रीय प्रतिष्ठेचे आणि आपल्या लोकांच्या समृद्धीचे रक्षण करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारत