शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 08:39 IST

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला. दोन्ही देशातील सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील सैन्य अलर्ट आहेत. पाकिस्तान सैन्याकडून सलग ११ दिवस शस्त्राचे उल्लंघन केले आहेत. याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.  दरम्यान, आता पाकिस्तानने भारताची भीती घेतली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना भारताकडून हल्ल्याची भीती वाटते. ते म्हणाले की, भारत काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ कधीही लष्करी हल्ला करू शकतो. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असताना आसिफ यांचे हे विधान आले आहे. “भारत नियंत्रण रेषेजवळील कोणत्याही ठिकाणी हल्ला करू शकतो असे वृत्त आहे,” असे आसिफ यांनी सोमवारी इस्लामाबादमध्ये पत्रकारांना सांगितले. नवी दिल्लीला योग्य उत्तर दिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय फायद्यासाठी या प्रदेशाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..."

खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये नवी दिल्लीचा सहभाग असल्याचा आरोप ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा केला. 'आम्ही २०१६ आणि २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्रांना पुरावे दिले होते, यात भारत दहशतवादाला निधी देत ​​असल्याचे व्हिडीओ होते, असा दावा केला. दोन्ही प्रांतांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या दहशतवादी घटना अफगाणिस्तानातून कार्यरत असलेल्या संघटनांनी घडवून आणल्या आणि त्यांना भारताकडून पाठिंबा मिळाल्याचा आरोप आसिफ यांनी केला. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी केली चौकशीची मागणी

संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले, "यात भारत सहभागी होता की काही अंतर्गत संघटना सहभागी होत्या हे तपासातून स्पष्ट होतील. तसेच, नवी दिल्लीच्या निराधार आरोपांमागील सत्य स्पष्ट होईल. गेल्या आठवड्यात, माहिती मंत्री अत्ता तरार यांनी सांगितले होते की भारताकडून संभाव्य हल्ल्याची शक्यता असल्याने पुढील २४-३६ तास महत्त्वाचे आहेत. वेळ निघून गेला आणि भारताकडून कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी सोमवारी पुन्हा एकदा सांगितले की पाकिस्तान आपल्या राष्ट्रीय प्रतिष्ठेचे आणि आपल्या लोकांच्या समृद्धीचे रक्षण करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारत