शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारताची अडचण वाढवण्यासाठी पेटवलं बांगलादेश?; हिंसाचारासाठी चीन-पाकिस्ताने योजना आखल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 15:14 IST

बांगलादेशातील हिंसाचारामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि चीनचा हात असल्याचे म्हटलं जात आहे.

Bangladesh Crisis : बांगलादेशात शेख हसीना यांनी पंतप्रधान पद सोडल्यानंतर सरकार कोसळलं आहे. आरक्षणाच्या वादावरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी पायउतार व्हावे लागले. रविवारी आंदोलन चिघळल्यानंतर देशभरात हिंसाचार सुरु झाला. त्यानंतर  शेख हसीना यांनी देश सोडला. अशातच बांगलादेशमधील आंदोलन पेटण्यामागे चीन आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय  यांचा सहभाग असल्याची शंका भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशातील सरकार उलथवून टाकण्याबाबत गुप्तचर विभागाच्या अहवालातून याबाबत मोठा खुलासा झाला आहे. 

शेख हसीना यांना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यास आणि बांगलादेशात विध्वंस वाढवण्यात पाकिस्तानची आयएसआय आणि त्यांना आश्रय देणारा चीन असल्याचे म्हटलं जात आहे. पाकिस्तानने हिंसाचार भडकावण्यासाठी छात्रशिविर नावाच्या संघटनेचा वापर केला. ही विद्यार्थी शिबिर संघटना बांगलादेशातील प्रतिबंधित जमात-ए-इस्लामीचा एक भाग आहे. त्याचबरोबर जमात-ए-इस्लामीला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा पाठिंबा आहे. शेख हसीना यांनी जमात-ए-इस्लामी, स्टुडंट युनियन आणि इतर संघटनांवर बंदी घातली होती.

लंडनमध्ये आखली हिंसाचाराची योजना

बांगलादेशी अधिकाऱ्यांकडे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या कार्यवाहक प्रमुख खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान याच्या संगनमताचे पुरावेही आहेत. लंडनमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सहकार्याने बांगलादेशातील हिंसाचाराची योजना तयार करण्यात आली. ब्ल्यू प्रिंट तयार केल्यानंतर बांगलादेशात ही योजना लागू करण्यात आली. सोशल मीडिया हँडल एक्सवर शेख हसीना सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी ५०० हून अधिक पोस्ट देखील करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानी हँडल्सचाही समावेश आहे. जमात-ए-इस्लामीच्या विद्यार्थी संघटनेला बांगलादेशात हिंसाचार भडकावणे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकीय आंदोलनात रूपांतर करण्याचे काम दिलं होते.

पाकिस्तान थेट बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे म्हटलं जात असताना यामागे भारताचा विरोधी चीन असल्याचा दावा केला जातोय.चीन गेल्या काही वर्षांपासून भारताच्या शेजारी असणाऱ्या सहा देशांवर नियंत्रण ठेवत असून, भारतासमोरील अडचणी वाढवत आहे. बांगलादेशातील राजकीय परिस्थिती बिघडली भारतालाही धोका निर्माण झाल्याचे म्हटलं आहे. चीनने भारताच्या आजूबाजूच्या देशांवर नियंत्रण ठेवलं असून जे भारतविरोधी डावपेच आखत असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. भारतासोबतच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि म्यानमारवर चीनचा प्रभाव वाढत आहे. बांगलादेशात लष्कराच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाल्यास चीनशी जवळीक वाढेल आणि तेथील हिंदूंवर हल्लेही वाढतील, असे बोलले जात आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशchinaचीनPakistanपाकिस्तानIndiaभारत