शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
4
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
5
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
6
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
7
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
8
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
9
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
10
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
11
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
12
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
13
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
14
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
15
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
16
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
17
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
18
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
19
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
20
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारताची अडचण वाढवण्यासाठी पेटवलं बांगलादेश?; हिंसाचारासाठी चीन-पाकिस्ताने योजना आखल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 15:14 IST

बांगलादेशातील हिंसाचारामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि चीनचा हात असल्याचे म्हटलं जात आहे.

Bangladesh Crisis : बांगलादेशात शेख हसीना यांनी पंतप्रधान पद सोडल्यानंतर सरकार कोसळलं आहे. आरक्षणाच्या वादावरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी पायउतार व्हावे लागले. रविवारी आंदोलन चिघळल्यानंतर देशभरात हिंसाचार सुरु झाला. त्यानंतर  शेख हसीना यांनी देश सोडला. अशातच बांगलादेशमधील आंदोलन पेटण्यामागे चीन आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय  यांचा सहभाग असल्याची शंका भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशातील सरकार उलथवून टाकण्याबाबत गुप्तचर विभागाच्या अहवालातून याबाबत मोठा खुलासा झाला आहे. 

शेख हसीना यांना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यास आणि बांगलादेशात विध्वंस वाढवण्यात पाकिस्तानची आयएसआय आणि त्यांना आश्रय देणारा चीन असल्याचे म्हटलं जात आहे. पाकिस्तानने हिंसाचार भडकावण्यासाठी छात्रशिविर नावाच्या संघटनेचा वापर केला. ही विद्यार्थी शिबिर संघटना बांगलादेशातील प्रतिबंधित जमात-ए-इस्लामीचा एक भाग आहे. त्याचबरोबर जमात-ए-इस्लामीला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा पाठिंबा आहे. शेख हसीना यांनी जमात-ए-इस्लामी, स्टुडंट युनियन आणि इतर संघटनांवर बंदी घातली होती.

लंडनमध्ये आखली हिंसाचाराची योजना

बांगलादेशी अधिकाऱ्यांकडे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या कार्यवाहक प्रमुख खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान याच्या संगनमताचे पुरावेही आहेत. लंडनमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सहकार्याने बांगलादेशातील हिंसाचाराची योजना तयार करण्यात आली. ब्ल्यू प्रिंट तयार केल्यानंतर बांगलादेशात ही योजना लागू करण्यात आली. सोशल मीडिया हँडल एक्सवर शेख हसीना सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी ५०० हून अधिक पोस्ट देखील करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानी हँडल्सचाही समावेश आहे. जमात-ए-इस्लामीच्या विद्यार्थी संघटनेला बांगलादेशात हिंसाचार भडकावणे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकीय आंदोलनात रूपांतर करण्याचे काम दिलं होते.

पाकिस्तान थेट बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे म्हटलं जात असताना यामागे भारताचा विरोधी चीन असल्याचा दावा केला जातोय.चीन गेल्या काही वर्षांपासून भारताच्या शेजारी असणाऱ्या सहा देशांवर नियंत्रण ठेवत असून, भारतासमोरील अडचणी वाढवत आहे. बांगलादेशातील राजकीय परिस्थिती बिघडली भारतालाही धोका निर्माण झाल्याचे म्हटलं आहे. चीनने भारताच्या आजूबाजूच्या देशांवर नियंत्रण ठेवलं असून जे भारतविरोधी डावपेच आखत असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. भारतासोबतच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि म्यानमारवर चीनचा प्रभाव वाढत आहे. बांगलादेशात लष्कराच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाल्यास चीनशी जवळीक वाढेल आणि तेथील हिंदूंवर हल्लेही वाढतील, असे बोलले जात आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशchinaचीनPakistanपाकिस्तानIndiaभारत