शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

UNHRC मध्ये पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, काश्मीरबाबत प्रस्ताव पारित करण्यात आले अपयश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 12:14 IST

भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र...

जिनिव्हा - भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काश्मिरप्रश्नावरून त्याला वारंवार नामुष्की झेलावी लागत आहे. आता संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. काश्मीरमधील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून भारताविरोधात प्रस्ताव आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. जिनेव्हा येथे सुरू असलेल्या 42 व्या मानवाधिकार सेशनमध्ये पाकिस्तानला भारताविरोधात प्रस्ताव आणण्यासाठी अन्य देशांचा आवश्यक प्रमाणात पाठिंबा मिळाला नाही. भारताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मोठा विजय आहे. दरम्यान, काश्मीरमधून कलम 370 हटवणे ही आपली अंतर्गत बाब असे भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक ठिकाणी स्पष्ट केलेले आहे.  दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर पाकिस्ताने गुरुवारी रात्री भारताविरोधात दाखल केलेल्या मानवाधिकार हननाच्या प्रस्तावाला पुरेसे समर्थन मिळू शकले नाही. अगदी मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनकडूनही पाकिस्तानला पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणि काश्मीर प्रश्न हा आपला अंतर्गत प्रश्न असल्याच्या करण्यात येत असलेल्या दाव्याचा मोठा विजय मानला जात आहे.   संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये एकूण 47 देशांनी सहभाग घेतला आहे. या परिषदेत भारतही आपली बाजू भक्कमपणे मांडत आहे. या परिषदेत भारतीय पथकाचे नेतृत्व अजय बिसारिया करत आहेत. बिसारिया यांनी पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताविरोधात प्रस्ताव आणण्यात अपयश आल्याने काश्मीर प्रश्नावरून आंतरराष्ट्रीय समुदायाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेला दावा खोटा ठरला आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ