शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 13:25 IST

अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानकडे भारताशी लढण्यासाठी दारूगोळा नसल्याचे समोर आलं आहे.

India-Pak Tension: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. भारताला इशारा देण्यासाठी पाकिस्तान क्षेपणास्त्र चाचण्या करुन त्यांचे सैन्य मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्यक्षात जर भारताबरोबर युद्ध झाल्यास चार दिवस टिकून राहण्यासाठीही पाकिस्तानकडे पुरेसा दारूगोळा शिल्लक नाही. युद्ध झाल्यास पाकिस्तान चार दिवसात भारतासमोर गुडघे टेकेल अशी परिस्थिती असल्याची माहिती एका गुप्तचर अहवालातून समोर आली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र अनेक अहवालांमध्ये असा दावा केला जातोय की जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर पाकिस्तान भारताविरुद्ध जास्त काळ टिकू शकणार नाही. विशेष म्हणजे पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीही हे मान्य केले आहे. पाकिस्तानकडे आता युद्ध लढण्यासाठी फक्त चार दिवसांचा दारूगोळा शिल्लक आहे. युक्रेन आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणात दारूगोळा पुरवल्यामुळे पाकिस्तानवर हे संकट उद्भवले आहे.

२०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने शस्त्रास्त्र निर्यातीचा मार्ग निवडला होता. पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीने लाखो तोफखाना, रॉकेट आणि लहान शस्त्रे युक्रेनला पाठवली होती. फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्येच ४२,००० बीएम-२१ रॉकेट, ६०,००० १५५ मिमी हॉवित्झर शेल आणि १,३०,००० इतर रॉकेट निर्यात करण्यात आले. यातून पाकिस्तानने सुमारे ३६४ दशलक्ष डॉलर्स कमावले, ज्याचा मोठा भाग लष्कराच्या मुख्यालयाला मिळाला होता.

पाकिस्तानी सैन्याला आता १५५ मिमी तोफखान्यांच्या तीव्र कमतरतेचा सामना करावा लागत आहे. पुरेशा दारूगोळ्याशिवाय एसएच-१५ सारख्या माउंटेड गन सिस्टीम निरुपयोगी ठरत आहेत. आर्थिक फायद्यासाठी पाकिस्तानने युक्रेन आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणात तोफखाना दारूगोळा निर्यात केला. त्यामुळे सध्याच्या साठ्यातून पाकिस्तान फक्त ४ दिवस युद्ध लढू शकेल. दुसरीकडे, आर्थिक मंदी, महागाई आणि इंधन टंचाईमुळे लष्कराला सराव थांबवावा लागला आहे.

दरम्यान, पाकिस्तान अणुहल्ल्याच्या धमक्या देत असला तरी प्रत्यक्षात त्यांची परिस्थिती खूपच वाईट असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळेच पाकिस्तान सरकार वारंवार भारताला आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तटस्थ आणि संयुक्त चौकशीसाठी तयार असल्याचे म्हणत आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत