शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 08:53 IST

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी कबुली दिली आहे.

Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आला. आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठी कबुली दिली आहे.  भारताने नूरखान आणि शोरकोट हवाई तळांवर आणि इतर ठिकाणी हल्ला केल्यानंतर आम्ही युद्धबंदीला सहमती दर्शवल्याचे पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी कबूल केले आहे. युद्धबंदींच्या प्रश्नावर इशाक दार यांनी सौदी अरेबियाचे प्रिन्स फैसल यांचाही उल्लेख केला.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानातील नऊ मोठमोठे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये काही भारतीयांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानला प्रत्युत्तर देत हल्ला केला. मात्र मोठ्या प्रमाणात  नुकसान झाल्याने पाकिस्तानने संघर्ष थांबवण्याची विनंती भारताकडे केली.

ऑपरेशन सिंदूरमुळे अणुबॉम्ब हल्ल्याची धमक्या देणाऱ्या पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावे लागले आणि युद्धबंदीची विनंती करावी लागली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफपासून मुल्ला मुनीरपर्यंत सर्वांनी ते मान्य केले आहे. आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनीही युद्धबंदीची विनंती पाकिस्ताननेच केल्याची कबुली दिली. या युद्धबंदीसाठी पाकिस्तानने अमेरिकाच नाही तर सौदी अरेबियाचीही मदत घेतली होती.

"भारताने रावळपिंडीतील नूर खान आणि शोरकोट हवाई तळांवर हल्ला केला. यामुळे पाकिस्तानचा बदला घेण्याची योजना उध्वस्त झाली. भारताच्या हल्ल्याच्या ४५ मिनिटांतच सौदी राजकुमार फैसल बिन सलमान यांनी त्यांना फोन करून विचारले की, मी जयशंकर यांच्याशी बोलून पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार आहे हे सांगू का? मी लगेच यावर सहमती दर्शवली आणि हो म्हटले, कृपया जयशंकर साहेबांना फोन करा आणि त्यांना सांगा की आम्हाला युद्धबंदी हवी आहे," असं  इशाक दार यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं.

दरम्यान, भारत व पाकिस्तानमधील दोन अत्यंत बुद्धिमान नेत्यांमुळे मागील महिन्यात दोन्ही देशांतील संघर्ष थांबला, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र, ते नेते कोण हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही. संघर्ष थांबविण्यासाठी केलेल्या कामगिरीमुळेच मुनीर यांना व्हाइट हाउसमध्ये खास मेजवानी दिली, असेही ट्रम्प म्हणाले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर