शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या मदतीसाठी पाच देश एकवटले; चीन-पाकिस्तान तोंडावर आपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 10:19 IST

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीन-पाकिस्तान जोरदार धक्का

संयुक्‍त राष्‍ट्र: चीनच्या मदतीनं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला आहे. पाकिस्तान आणि चीनची नापाक खेळी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमनं उधळून लावली आहे. भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचा मुद्दा या पाच देशांनी उपस्थित केला. चीनची घुसखोरी उधळण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, पेंगाँग सरोवर, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर क्षेपणास्त्रेही तैनातपाकिस्ताननं याआधीही चीनच्या मदतीनं भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगरा अप्पाजी आणि गोबिंदा पटनायक या भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यात यावं, यासाठी पाकिस्तानचे चीनच्या मदतीनं प्रयत्न सुरू होते. मात्र या दोघांविरोधात पुरेसे पुरावे नसल्यानं त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ नये, अशी भूमिका सुरक्षा परिषदेच्या तीन स्थायी आणि दोन अस्थायी सदस्यांनी घेतली. तसं आवाहन त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला केलं. याआधीही पाकिस्ताननं वेनुमाधव डोंगरा आणि अजय मिस्त्री या दोन भारतीयांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. पण तो अमेरिकेनं उधळून लावला होता.भारत-चीनमध्ये तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण चर्चा, भारताने दिला ड्रॅगनला तिसरा झटकापाकिस्ताननं एकूण ४ भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान अफगाणिस्तानातील विकास कामांशी संबंधित भारतीय नागरिकांवर नजर ठेवून आहे. या नागरिकांवर बिनबुडाचे आरोप करून त्यांचा संबंध पाकिस्तानमधील दहशतवादी घटनांशी जोडण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत. मात्र पाकिस्तानचे चारही प्रस्ताव सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी रोखले. त्यामुळे पाकिस्तान तोंडावर पडला. मोदी सरकारचा मोठा निर्णय; पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदीयाआधीही पाकिस्तानला अशा प्रकारे भारतीय नागरिकांविरोधात पुरेसे पुरावे देण्यात अपयश आलं होतं. आता पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्तींनी एक ट्विट करून पाकिस्तानवर निशाणा साधला. 'दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरक्षा परिषदेनं हाणून पाडला. पाकिस्तानची नापाक खेळी रोखणाऱ्या देशांचे आम्ही आभारी आहोत,' असं त्रिमूर्तींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान