शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

भारताच्या मदतीसाठी पाच देश एकवटले; चीन-पाकिस्तान तोंडावर आपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 10:19 IST

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीन-पाकिस्तान जोरदार धक्का

संयुक्‍त राष्‍ट्र: चीनच्या मदतीनं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला आहे. पाकिस्तान आणि चीनची नापाक खेळी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमनं उधळून लावली आहे. भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचा मुद्दा या पाच देशांनी उपस्थित केला. चीनची घुसखोरी उधळण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, पेंगाँग सरोवर, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर क्षेपणास्त्रेही तैनातपाकिस्ताननं याआधीही चीनच्या मदतीनं भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगरा अप्पाजी आणि गोबिंदा पटनायक या भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यात यावं, यासाठी पाकिस्तानचे चीनच्या मदतीनं प्रयत्न सुरू होते. मात्र या दोघांविरोधात पुरेसे पुरावे नसल्यानं त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ नये, अशी भूमिका सुरक्षा परिषदेच्या तीन स्थायी आणि दोन अस्थायी सदस्यांनी घेतली. तसं आवाहन त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला केलं. याआधीही पाकिस्ताननं वेनुमाधव डोंगरा आणि अजय मिस्त्री या दोन भारतीयांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. पण तो अमेरिकेनं उधळून लावला होता.भारत-चीनमध्ये तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण चर्चा, भारताने दिला ड्रॅगनला तिसरा झटकापाकिस्ताननं एकूण ४ भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान अफगाणिस्तानातील विकास कामांशी संबंधित भारतीय नागरिकांवर नजर ठेवून आहे. या नागरिकांवर बिनबुडाचे आरोप करून त्यांचा संबंध पाकिस्तानमधील दहशतवादी घटनांशी जोडण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत. मात्र पाकिस्तानचे चारही प्रस्ताव सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी रोखले. त्यामुळे पाकिस्तान तोंडावर पडला. मोदी सरकारचा मोठा निर्णय; पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदीयाआधीही पाकिस्तानला अशा प्रकारे भारतीय नागरिकांविरोधात पुरेसे पुरावे देण्यात अपयश आलं होतं. आता पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्तींनी एक ट्विट करून पाकिस्तानवर निशाणा साधला. 'दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरक्षा परिषदेनं हाणून पाडला. पाकिस्तानची नापाक खेळी रोखणाऱ्या देशांचे आम्ही आभारी आहोत,' असं त्रिमूर्तींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान