शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

पाक मीडियाचा कर्णधार, कोचवर हल्लाबोल

By admin | Updated: March 21, 2016 02:23 IST

ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाला चौफेर टीकेला सामोरे जावे लागत असून, पाकिस्तानी मीडियाही संघाच्या कामगिरीवर चांगलेच भडकले

कराची : ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाला चौफेर टीकेला सामोरे जावे लागत असून, पाकिस्तानी मीडियाही संघाच्या कामगिरीवर चांगलेच भडकले आहे. त्यांनी कर्णधार आणि प्रशिक्षकांना या पराभवाबद्दल जबाबदार धरले आहे.पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात चार तेज गोलंदाज खेळवण्याची रणनीती चुकीची होती, असे सर्व माध्यमांनी ठासून सांगितले आहे. ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने म्हटले आहे, की खेळपट्टी ओलसर असताना असा निर्णय होतोच कसा? डावखुरा फिरकी गोलंदाज इमाद वासिमला बाहेर ठेवणे संघाला महागात पडले. सामन्याच्या पहिल्या षटकापासून चेंडू वळत होते. संघाच्या थिंक टँकने इमादला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे पाहून क्रिकेट समीक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले. संघव्यवस्थापनास खेळपट्टीचा अंदाज येत नसेल तर याला काहीच अर्थ उरत नाही.‘द नेशन’ या वृत्तपत्राने ‘क्रिकेटमध्ये मुलांपेक्षा मुलीच भारी’ अशा आशयाचे हेडिंग देऊन संघाच्या पराभवाची हेटाळणी केली आहे. ‘द डेली टाईम्स’ने पाकिस्तानी संघाच्या सातत्याने होणाऱ्या पराभवाची नोंद घेत ‘दुर्दैवाचा फेरा सुरूच’ अशा आशयाचा मथळा दिला आहे. पाकिस्तानी चाहते संतप्तकराची : ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा राग अनावर झाला. अनेकांनी याबद्दल आफ्रिदीला जबाबदार धरले तर काहींनी आपला राग टीव्ही सेटवर काढला. धोनीने विजयी धाव घेऊन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करताच निराश झालेले पाकिस्तानी चाहते संघाच्या गचाळ कामिगिरीची गटागटाने चर्चा करीत होते. काही ठिकाणी चाहते इतके भडकले होते, की त्यांनी आपले टीव्ही सेट फोडून टाकले. काही ठिकाणी संघाच्या आणि पीसीबीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. फिरकी गोलंदाज इमाद वासिमला बाहेर ठेवण्याच्या निर्णयाला चुकीचे ठरवत माजी कसोटीपटू बासित अली यांनी याबद्दल माजी कर्णधार इम्रान खान याला जबाबदार धरले. त्याने जाणीवपूर्वक संघाला चुकीचा सल्ला दिला, असे अली यांनी म्हटले आहे. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराही या निर्णयावर भडकला. तो म्हणाला, ‘‘आफ्रिदी हा फिरकी गोलंदाज नाही. संघात एक स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज हवा होता.’’ माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक म्हणाला, ‘‘खेळपट्टी ओळखण्यात आपली चूक झाली. चार तेज गोलंदाज खेळवावेत, अशी ही खेळपट्टी नव्हती. न्यूझीलंडने टीम साउदीसारख्या गोलंदाजाला बाहेर बसवून तीन फिरकी गोलंदाज खेळवले, यावरून आपण बोध घ्यायला हवा होता.’’ संघाची निवड चुकीची होती, असे मत रमीझ राजा यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘सामन्याच्या आधी एक दिवस चार तेज गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेणे चुकीचे आहे.’’