शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा बदला घेऊ, पाक लष्करप्रमुखांनी भारताविरोधात ओकली गरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 20:04 IST

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराचा गुरुवारी (6 सप्टेंबर) रावळपिंडीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्कप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी अप्रत्यक्षरित्या भारताला धमकी दिली. दरम्यान, या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानदेखील उपस्थित होते. 

पाकिस्तानच्या सीमेवर ज्या सैनिकांनी आपलं रक्त सांडवलं आणि देशासाठी प्राण गमावले, त्यांच्या रक्ताचा हिशेब चुकता करणार, असे विधान यावेळेस  पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केले आहे. 

 ''6 सप्टेंबर 1965 हा दिवस पाकिस्तानासाठी महत्त्वाचा दिवस आहे. झालेल्या या युद्धातून आमचे सैनिक आजही प्रेरणा घेतात. 1965 आणि 71 च्या युद्धातून आम्ही खूप शिकलो'', असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जगभरात वाढलेल्या दहशतवादी कारवायांचा फटका पाकिस्तानलाही बसला. देशात दहशतवादी हल्ले झाले, देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. यात हजारो सैनिकांचे प्राण गेले आणि जखमी झाले. हे पाकिस्तान कधीच विसरु शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद