शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या प्रत्युत्तरामुळे पीओकेत आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान; पाकिस्तानची कबुली

By कुणाल गवाणकर | Updated: November 14, 2020 09:46 IST

भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ११ सैनिक ठार; बंकर, लॉन्च पॅड उद्ध्वस्त

इस्‍लामाबाद: दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारतीय हद्दीत दहशतवादी घुसवण्यासाठी नियंत्रण रेषेवर बेछूट गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये पाकिस्तानचे ११ सैनिक मारले गेले. भारताच्या प्रतिहल्ल्यानं पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तान सरकारकडून हे नुकसान लपवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्यांमुळे पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लिपा आणि नीलम खोऱ्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान झाल्याची कबुली पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्यांनी दिली आहे.भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरूभारताच्या जोरदार प्रत्युत्तरानं नीलम, लिपा खोऱ्यात आणि मुझफ्फराबाद जिल्ह्यातल्या नौशेरा सेक्टरमध्ये मोठं नुकसान झाल्याची कबुली पीओकेच्या नागरी संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव सय्यद शाहिद मोहयिद्दीन कादरी यांनी दिली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'नं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 'भारताकडून गेल्या वर्षीदेखील नीलम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला होता. मात्र यंदा करण्यात आलेला गोळीबार गेल्या वर्षीच्या प्रमाणात अधिक आहे. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे,' असं कादरी म्हणाले.Video! बीएसएफने खटका ओढला! प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 7 सैनिक ठार; एलओसीपार मोठे नुकसानइम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्यांच्या रडारवरभारताकडून झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू आणि २५ हून अधिक जण जखमी झाल्याचं नीलम खोऱ्याचे उपायुक्त राजा महमूद शाहिद यांनी सांगितलं. या हल्ल्यात किमान १५ घरं उद्ध्वस्त झाल्याचा दावा त्यांनी केला. भारतीय सैन्याच्या धडाकेबाज प्रत्युत्तरानंतर पीओकेचे कथित पंतप्रधान राजा फारूक हैदर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला. सीमावर्ती भागातील पाकिस्तानी नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची? इथल्या नागरिकांना केव्हापर्यंत अशा हल्ल्यांचा सामना करावा लागणार? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.पाकिस्तान बिथरला; भारतीय राजदूतांना समन्सपाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. केरन, पुंछ आणि उरीमध्ये गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्च पॅड भारतानं उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईनं पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या राजदूतांना पाकिस्तान सरकारनं समन्स बजावलं आहे. याशिवाय काल रात्रभर सीमावर्ती भागात बेछूट गोळीबार सुरू आहे.दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी या आठवड्यात पाकिस्तान सैन्यानं दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. याआधी ७-८ नोव्हेंबरलादेखील पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. या दरम्यान तीन दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या तिन्ही दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला.

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान