शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:59 IST

हा हल्ला लष्कर ए तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. लष्कर ए तय्यबा आणि टीआरएफ यांच्यात संबंध आहेत असा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला होता. आता या घटनेवर संयुक्त राष्ट्राच्या नव्या रिपोर्टमुळे पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. द रेजिस्टेंस फ्रंट या संघटनेने दोनदा पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती आणि हल्ल्याच्या ठिकाणचे फोटोही जारी केले होते. हा हल्ला पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या टीमने म्हटलं आहे.

UNSC मध्ये आयएसआयएल, अलकायदासारख्या दहशतवादी संघटनांवर वॉच ठेवणाऱ्या टीमने ३६ वा रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, २२ एप्रिलला ५ दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटनस्थळी हल्ला केला होता. त्याचदिवशी टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि हल्ल्याचे फोटोही जारी केले होते. टीआरएफने दुसऱ्या दिवशीही हल्ल्याची जबाबदारी घेतली. मात्र २६ एप्रिलला टीआरएफने त्यांचा दावा मागे घेतला होता. त्यानंतर टीआरएफने यावर कुठलेही विधान केले नाही, ना इतर कुठल्या दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली असं सांगण्यात आले आहे.

तसेच हा हल्ला लष्कर ए तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. लष्कर ए तय्यबा आणि टीआरएफ यांच्यात संबंध आहेत. पहलगामचा हल्ला टीआरएफने केला असंही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने टीआरएफला जागतिक दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर याच महिन्यात अमेरिकेने या संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना घोषित केले आहे. पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यात २५ भारतीय पर्यटक होते तर १ नेपाळमधील होता. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले होते. 

पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

ऑपरेशन सिंदूर यावर लोकसभेत गेल्या २ दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. केंद्रात यापूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या सरकारांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याच्या चालून आलेल्या संधी गमावल्या. त्यावेळी भारताकडे पाकिस्तानच्या भूभागासह त्याचे सैनिकही ताब्यात होते. पाकिस्तानातून करण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांचा रस्ताच भारताने आता बंद केला आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील असतो. काँग्रेस पक्ष हा पाकिस्तानच्या रिमोट कंट्रोलवर चालतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ला तमाशा म्हणण्यात आले असा आरोप मोदींनी केला. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका