शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:59 IST

हा हल्ला लष्कर ए तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. लष्कर ए तय्यबा आणि टीआरएफ यांच्यात संबंध आहेत असा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला होता. आता या घटनेवर संयुक्त राष्ट्राच्या नव्या रिपोर्टमुळे पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. द रेजिस्टेंस फ्रंट या संघटनेने दोनदा पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती आणि हल्ल्याच्या ठिकाणचे फोटोही जारी केले होते. हा हल्ला पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या टीमने म्हटलं आहे.

UNSC मध्ये आयएसआयएल, अलकायदासारख्या दहशतवादी संघटनांवर वॉच ठेवणाऱ्या टीमने ३६ वा रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, २२ एप्रिलला ५ दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटनस्थळी हल्ला केला होता. त्याचदिवशी टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि हल्ल्याचे फोटोही जारी केले होते. टीआरएफने दुसऱ्या दिवशीही हल्ल्याची जबाबदारी घेतली. मात्र २६ एप्रिलला टीआरएफने त्यांचा दावा मागे घेतला होता. त्यानंतर टीआरएफने यावर कुठलेही विधान केले नाही, ना इतर कुठल्या दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली असं सांगण्यात आले आहे.

तसेच हा हल्ला लष्कर ए तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. लष्कर ए तय्यबा आणि टीआरएफ यांच्यात संबंध आहेत. पहलगामचा हल्ला टीआरएफने केला असंही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने टीआरएफला जागतिक दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर याच महिन्यात अमेरिकेने या संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना घोषित केले आहे. पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यात २५ भारतीय पर्यटक होते तर १ नेपाळमधील होता. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले होते. 

पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

ऑपरेशन सिंदूर यावर लोकसभेत गेल्या २ दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. केंद्रात यापूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या सरकारांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याच्या चालून आलेल्या संधी गमावल्या. त्यावेळी भारताकडे पाकिस्तानच्या भूभागासह त्याचे सैनिकही ताब्यात होते. पाकिस्तानातून करण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांचा रस्ताच भारताने आता बंद केला आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील असतो. काँग्रेस पक्ष हा पाकिस्तानच्या रिमोट कंट्रोलवर चालतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ला तमाशा म्हणण्यात आले असा आरोप मोदींनी केला. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका