शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:46 IST

Operation Sindoor: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना अमेरिकेत एका पत्रकाराने भारत मुस्लिम विरोधी अजेंडा राबवत असल्याच्या आरोपांवर तोंडघशी पाडले होते. याला काही तास उलटत नाही तोच भुट्टो यांनी पाकिस्तानला अडचणीत आणणारे वक्तव्य केले आहे. 

पाकिस्तान एक दहशतवादी राष्ट्र असल्याचे जगभरात भारत सांगत आहे. पहलगाम हल्ला व त्याला प्रत्यूत्तर म्हणून राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरवर भारताने एवढी वातावरण निर्मिती केली आहे की आता पाकिस्तान काही केल्या आपली प्रतिमा बदलू शकत नाही. अशातच भारताच्या या खेळीला प्रत्यूत्तर देण्यासाठी पाकिस्ताननेही आपली टीम पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी तसेच भारताला बदनाम करण्यासाठी पाठविली होती. परंतू, ही टीमच आता तोंडघशी पडू लागली आहे. 

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना अमेरिकेत एका पत्रकाराने भारत मुस्लिम विरोधी अजेंडा राबवत असल्याच्या आरोपांवर तोंडघशी पाडले होते. याला काही तास उलटत नाही तोच भुट्टो यांनी पाकिस्तानला अडचणीत आणणारे वक्तव्य केले आहे. 

संयुक्त राष्ट्रांत भुट्टो यांनी भारतातील दहशतवादी हल्ले केवळ आयएसआयच रोखू शकतो, यासाठी भारतीय यंत्रणांना आयएसआयशी बोलावे लागेल, असे म्हटले आहे. एकप्रकारे भुट्टो यांनी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच दहशतवादी हल्ले करवत असल्याचे कबुल केले आहे. भारताला आमच्या आयएसआयसोबत बसून चर्चा केल्याशिवाय दहशतवाद संपविण्याबाबत कोणताही पर्याय नसल्याचे ते म्हणाले आहेत. 

आयएसआयवर प्रॉक्सी दहशतवादी संघटना निर्माण करण्याचा आणि काश्मीर आणि देशाच्या इतर भागात दहशतवादी पाठवण्याचा आरोप भारत सातत्याने करत आला आहे. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या संघटनांना आयएसआयच पोसत आली आहे. भुट्टो हे पाकिस्तानी खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. यामुळे त्यांच्या या वक्तव्याला महत्व आले आहे. बिलावल सिंधू नदीच्या पाण्याच्या मुद्द्यावर जगभरातील देशांकडून मदत मागत आहेत. पाकिस्तानने आपण अमेरिकेसाठी दहशतवादी तयार केल्याचे देखील कबुल केले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादOperation Sindoorऑपरेशन सिंदूरAmericaअमेरिका