शहरं
Join us  
Trending Stories
1
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
4
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
5
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
6
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
7
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
8
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
9
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
10
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
11
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
12
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
13
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
14
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
15
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
16
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
17
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
18
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
19
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
20
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
Daily Top 2Weekly Top 5

Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:59 IST

भारतीय सैन्य दलाने रात्री उशीरा ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. त्यात जैश ए मोहम्मदचा गड असणाऱ्या पंजाबच्या बहावलपूर येथेही हल्ला करण्यात आला.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतानेपाकिस्तानवर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांना भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. त्यात बहावलपूर येथे असणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयालाही टार्गेट करण्यात आले. याठिकाणी जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचं कुटुंब होते. या हल्ल्यात मसूदच्या कुटुंबातील १० जण आणि त्याच्या जवळच्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मसूद अजहरने या घटनेला पुष्टी दिली आहे.

या हल्ल्यानंतर मसूद अजहरने म्हटलं की, भारतीय हल्ल्यात माझ्या कुटुंबाचे १० सदस्य आणि ४ जवळचे सहकारी मारले गेले. या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते असं त्याने सांगितले. मौलाना मसूद अजहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफ साहबचं पूर्ण कुटुंब, शहीद आणि मुफ्ती अब्दुल रऊफचे नातवंडे, बाजी सादियाचा पती आणि तिच्या मोठ्या मुलीचे ४ मुले जखमी झाले आहेत. या हल्ल्यात महिला आणि मुले मारली गेली असं जैश ए मोहम्मद संघटनेने माहिती दिली.

भारतीय सैन्य दलाने रात्री उशीरा ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. त्यात जैश ए मोहम्मदचा गड असणाऱ्या पंजाबच्या बहावलपूर येथेही हल्ला करण्यात आला. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. पहलगामच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यात अनेक महिलांना विधवा बनवले होते. धर्म विचारून हत्या केल्याचा आरोप होता. या दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. दहशतवाद्यांनी कधी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हाती घेत दहशतवाद्यांना टार्गेट केले.

कोण आहे मसूद अजहर?

मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मॉस्ट वाँटेड दहशतवादी आहे. मसूद भारतातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे. मसूद अजहरला १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या हायजॅक केल्याप्रकरणी अटक केले होते. त्यानंतर बंधक नागरिकांच्या सुटकेसाठी त्याला सोडण्यात आले. त्यानंतर तो पाकिस्तान लपून भारतात अनेक दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता. २००१ साली मसूद अजहरच्या नेतृत्वात जैश ए मोहम्मदने भारतीय संसदेवर हल्ला केला होता. २००० मध्ये जम्मू काश्मीर विधानसभा, २०१६ साली पठाणकोट एअरबेस आणि २०१९ साली पुलवामा दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता.

टॅग्स :masood azharमसूद अजहरOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद