शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
6
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
7
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
8
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
9
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
10
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
11
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
12
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
13
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
14
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
15
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
16
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
17
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
18
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजूने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 08:57 IST

Operation Sindoor: पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारताने खासदारांच्या टीम करून त्या जगभरात पाठविल्या आहेत. जागतिक स्तरावर भारताने एक मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांप्रतीकोलंबियाने शोक व्यक्त केला होता. याला ४८ तास होत नाहीत तोच त्यांनी कोलांटी उडी मारली आहे. हे सर्व दहशतवादीपाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी गेलेल्या शशी थरूर यांच्यामुळे शक्य झाले आहे. थरुर यांनी कोलंबियाच्या सत्ताधारी आणि विरोधकांची बैठक घेत त्यांची दहशतवादावरच शाळा घेतली, यामुळे डोळे उघडलेल्या कोलंबियाने मृत दहशतवाद्यांप्रतीची संवेदना अधिकृतरित्या माघारी घेतली आहे. 

पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारताने खासदारांच्या टीम करून त्या जगभरात पाठविल्या आहेत. जागतिक स्तरावर भारताने एक मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे. कोलंबियाला त्यांची भूमिका बदलण्यास भाग पाडण्यात आले आहे. भारतीय शिष्टमंडळाचा भाग असलेल्या शशी थरूर यांनी आक्षेप घेत कोलंबिया सरकार आणि विरोधकांच्या बैठकीत पाकिस्तानचा चेहरा उघड केला आहे. 

आज मिळालेल्या स्पष्टीकरणांच्या आधारे आणि काश्मीरमधील खरी परिस्थिती, संघर्ष आणि घडलेल्या घटनेबद्दल आमच्याकडे आता उपलब्ध झालेली सविस्तर माहिती लक्षात घेता, आम्ही संवाद सुरू ठेवू शकतो, असे कोलंबियाच्या उपपरराष्ट्र मंत्री सुश्री रोसा योलांडा व्हिलाविचेंसिओ यांनी म्हटले आहे. यावर आता थरूर यांची प्रतिक्रिया आली आहे. 

कोलंबियाने आम्हाला निराश करणारे विधान मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आता भारताचा दृष्टिकोन समजला आहे आणि ते आमच्या बाजूने जोरदार पाठिंबा देऊन एक नवीन विधान जारी करतील, असे थरूर म्हणाले आहेत. 

खासदार मिलिंद देवरा यांनी आभार मानले

दरम्यान, शिवसेनेचे खासदार मलिंद देवरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करुन कोलंबियाचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी कोलंबियाच्या माजी राष्ट्रपती @CesarGaviria_T यांचे आभारी आहे. त्यांनी कोलंबियाच्या विरोधी पक्षाच्या वतीने आणि देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष लिबरल पार्टीच्या वतीने पाकिस्तान आणि राज्य पुरस्कृत दहशतवादाचा स्पष्टपणे निषेध करण्याची माझी विनंती विनम्रपणे स्वीकारली.

कोलंबिया का महत्वाचा...

कोलंबिया हा देश फारसा शक्तीशाली नाही. परंतू, लवकरच तो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य होणार आहे. यामुळे त्यांचे काश्मीरबाबत विचार बदलणे गरजेचे होते. संयुक्त राष्ट्रांत भारताला अशा देशांची पाकिस्तानविरोधात व्यूहरचना करण्यासाठी गरज आहे. दहशतवादाने घेतलेल्या भारतातील मृतांबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्यात आला होता. ज्यावर नऊ खासदारांचे नेतृत्व करणाऱ्या थरुर यांनी आक्षेप घेतला होता. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादColombiaकोलंबिया