शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:08 IST

अल्पसंख्याकांवरील हिंसाचारामुळे, दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्या हत्येमुळे बांगलादेशातील हिंदू नागरिक घाबरले आहेत. छळापासून वाचण्यासाठी ते भारताकडे सीमा उघडण्याची विनंती करत आहेत. रंगपूर, ढाका आणि मैमनसिंगमधील हिंदूंनी त्यांची व्यथा व्यक्त केली आहे.

बांगलादेशात मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दरम्यान, संकटात सापडलेल्या बांगलादेशात अडकलेले हिंदू नागरिक दहशतवादापासून वाचण्यासाठी भारताला त्यांच्या सीमा उघडण्याची विनंती करत आहेत.

दरम्यान, निर्वासित बांगलादेश सनातन जागरण माचा नेते निहार हलदर यांच्या मदतीने, रंगपूर, चितगाव, ढाका आणि मैमनसिंग येथे राहणाऱ्या हिंदू नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. या लोकांनी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संवाद साधला.

जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी

रंगपूर येथील एका ५२ वर्षीय रहिवासी म्हणाले की, त्यांच्या धर्मामुळे त्यांना सतत अपमान सहन करावा लागत आहे. रस्त्यावर चालताना त्यांना ऐकू येणारे टोमणे लवकरच मॉब लिंचिंगमध्ये बदलू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

अल्पसंख्याक हिंदू म्हणतात की, ते अडकले आहेत आणि त्यांना कुठेही जायचे नाही. त्यांना अपमान सहन करावा लागत आहे कारण त्यांना दीपू आणि अमृत यांच्यासारखेच मारले जाईळ याची भीती आहे.

ढाक्यातील आणखी एका हिंदू रहिवाशाने सांगितले की, दीपू दास यांच्या लिंचिंगमुळे भीती निर्माण झाली आहे, तर माजी राष्ट्रपती खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांचे बांगलादेशात परतणे त्यांना आणखी चिंतेत टाकते. जर बीएनपी सत्तेत आली तर आपल्याला आणखी छळाला सामोरे जावे लागू शकते. शेख हसीनांची अवामी लीग ही आमची एकमेव रक्षक होती.

सनातन जागरण माछाच्या एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बांगलादेशमध्ये एकूण हिंदू लोकसंख्या २५ लाख आहे. ही संख्या कमी लेखता येणार नाही. भारतातील हिंदू संघटना दिखाव्यासाठी बोलत आहेत, पण दुसरे काही नाही. आपण नरसंहाराकडे वाटचाल करत आहोत.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh Hindus Plead: Open Border, Save Us From Violence

Web Summary : Facing rising violence, Bangladeshi Hindus appeal to India to open its borders for refuge. Fearing persecution and potential mob lynching after recent killings, they express concern over political shifts and seek protection, highlighting their vulnerability and dwindling population.
टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत