शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व न देणे हास्यास्पद, इलॉन मस्‍क यांनी जगाला आरसा दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 11:56 IST

टेस्‍ला आणि स्‍पेसएक्‍सचे माल इलॉन मस्क म्हणाले, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्याला संयुक्‍त राष्‍ट्राचे सदस्यत्व न देणे हास्‍यास्‍पद आहे. 

वॉशिंग्टन : संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासंदर्भातील भारताच्या दावेदारीला आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त असलेल्या इलॉन मस्क यांची साथ मिळाली आहे. टेस्‍ला आणि स्‍पेसएक्‍सचे माल इलॉन मस्क म्हणाले, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्याला संयुक्‍त राष्‍ट्राचे सदस्यत्व न देणे हास्‍यास्‍पद आहे. 

खरे तर, आफ्रिकेला संयुक्‍त राष्‍ट्राचे स्‍थायी सदस्‍यत्व देण्याच्या मागणीसंदर्भात संयुक्‍त राष्‍ट्र महासचिव अँटोनियो गुटरेस यांच्या एका ट्विटवर विचारण्यात आलेल्य प्रश्नाला उत्तर देताना इलॉन मस्‍क यांनी हे विधान केले आहे. एवढेच नाही, तर आपल्याला संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये पुनरावलोकनाची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

एलन मस्‍क एक्‍सवर ट्विट करत म्हणाले, 'संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांची समीक्षाकरण्याची आवश्यकता आहे. समस्या अशी आहे की, ज्यांच्याकडे (देशांकडे) खूप जास्त ताकद आहे, त्यांची (देश) ती सोडण्याची इच्छा नाही. जगात सर्वाधिक लोकसंख्या असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व दिलेले नाही, हे हास्यास्पद आहे. आफ्रिकेलाही एकत्रितपणे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थान द्यायला हवे. यापूर्वी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी ट्विट करत म्हटले होते की, सुरक्षा परिषदेत आफ्रिकेचा एकही स्थायी सदस्य नाही, हे आम्ही कसे स्वीकारू शक करावे?

भारताच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा चीन -भारताचे परराष्ट्रमंत्री, एस जयशंकर यांनी संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेतील स्‍थायी सदस्‍यत्वासंदर्भात नुकतेच भाष्य केले होते. यानंतर इलॉन मस्क यांनीही भारताचे समर्थन केले आहे. 'जग कुठलीही गोष्ट सहजपणे देत नाही. कधी कधी मिळवावीही लागते,' असे जयशंकर यांनी म्हटले होते.

भारताच्या संयुक्‍त राष्‍ट्रातील स्थायी सदस्यत्वाच्या दावेदारीत सर्वात मोठा अडथळा चीन आहे. जर भारताला संयुक्त राष्ट्राचे स्थायी सदस्त्व मिळाले, तर आशिया खंडातील आपला प्रभाव कमी होईल, अशी भीती चीनला वाटते. यामुळे भारताला संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सदस्यत्वापासून दूर ठेवण्यासाठी तो नाना प्रकारच्या खेळी खेळत असतो.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कunited nationsसंयुक्त राष्ट्र संघchinaचीनIndiaभारत