शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

चिंता वाढणार? ...तर तब्बल ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 10:57 IST

विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी; कामासाठी गेलेल्या भारतीयांची चिंता वाढली

ठळक मुद्देकुवेतमध्ये अप्रवासी कोटा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरीलवकरच अप्रवासी कोटा विधेयकही मंजूर होण्याची शक्यताविधेयक मंजूर झाल्यास ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागणार

नवी दिल्ली: परदेशी कामगारांशी संबंधित अप्रवासी कोटा विधेयक आणण्याची तयारी कुवेतनं सुरू केली आहे. त्यामुळे देशातील परदेशी कामगारांच्या संख्येत कपात होईल. या विधेयकाच्या मसुद्याला कुवेतच्या संसदेत मंजुरी मिळाली आहे. हा मसुदा पूर्णपणे घटनेला धरून असल्याचं विधेयक समितीनं म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच कुवेतच्या संसदेत अप्रवासी कोटा विधेयक मंजूर होण्याची दाट शक्यता आहे.अप्रवासी कोटा विधेयक आणखी एका समितीकडे जाणार आहे. मात्र यामुळे भारताची चिंता वाढली आहे. कुवेतमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची संख्या अतिशय मोठी आहे. अप्रवासी कोटा विधेयकाला मंजुरी मिळाल्यास ७ ते ८ लाख भारतीयांवर नोकरी गमावण्याची वेळ येईल. कुवेतमध्ये वास्तव्यास असलेल्या परदेशी व्यक्तींची आकडेवारी पाहिल्यास त्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. कुवेतची लोकसंख्या ४८ लाख इतकी आहे. यातील भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. अप्रवासी कोटा विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर यापैकी १५ टक्केच लोकांना कुवेतमध्ये राहता येईल. त्यामुळे ७ ते ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागेल. भारतीयांसोबतच इतर देशांमधून कुवेतमध्ये काम करण्यास गेलेल्या व्यक्तींनादेखील याचा फटका बसेल. इजिप्तमधून आलेल्या व्यक्तींची संख्या ९० टक्क्यांनी कमी करण्याची तरतूद मसुद्यात आहे. भारतीयांनंतर कुवेतमध्ये इजिप्तच्या व्यक्तींचं प्रमाण सर्वाधिक आहे.कुवेतमध्ये नोकरी करण्यासाठी गेलेले भारतीय त्यांच्या कुटुंबाना मोठ्या प्रमाणात पैसा पाठवतात. त्यामुळे देशाला परकीय चलन मिळतं. २०१८ मध्ये कुवेतमधून भारतात ४.८ बिलियन डॉलर इतकी रक्कम पाठवली गेली. त्यामुळे अप्रवासी कोटा विधेयकाला मंजुरी मिळाल्यास परकीय चलनाच्या गंगाजळीवर परिणाम होईल. कुवेतमधील परदेशी व्यक्तींची संख्या वाढल्यानं देशात मूळ कुवेती व्यक्तींची संख्याच कमी झाली आहे. त्यामुळे कुवेती त्यांच्याच देशात अल्पसंख्याक होऊ लागले आहेत. ही बाब समोर आल्यानं कुवेतनं अप्रवासी कोटा विधेयक आणण्याची तयारी सुरू केली आहे. परदेशातील कर्मचाऱ्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कुवेतनं प्रयत्न सुरू केले आहेत. कुवेतची लोकसंख्या ४३ लाख इतकी आहे. त्यामध्ये परदेशातून आलेल्या लोकांचं प्रमाण ३० लाख इतकं आहे.