शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

चिंता वाढणार? ...तर तब्बल ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 10:57 IST

विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी; कामासाठी गेलेल्या भारतीयांची चिंता वाढली

ठळक मुद्देकुवेतमध्ये अप्रवासी कोटा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरीलवकरच अप्रवासी कोटा विधेयकही मंजूर होण्याची शक्यताविधेयक मंजूर झाल्यास ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागणार

नवी दिल्ली: परदेशी कामगारांशी संबंधित अप्रवासी कोटा विधेयक आणण्याची तयारी कुवेतनं सुरू केली आहे. त्यामुळे देशातील परदेशी कामगारांच्या संख्येत कपात होईल. या विधेयकाच्या मसुद्याला कुवेतच्या संसदेत मंजुरी मिळाली आहे. हा मसुदा पूर्णपणे घटनेला धरून असल्याचं विधेयक समितीनं म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच कुवेतच्या संसदेत अप्रवासी कोटा विधेयक मंजूर होण्याची दाट शक्यता आहे.अप्रवासी कोटा विधेयक आणखी एका समितीकडे जाणार आहे. मात्र यामुळे भारताची चिंता वाढली आहे. कुवेतमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची संख्या अतिशय मोठी आहे. अप्रवासी कोटा विधेयकाला मंजुरी मिळाल्यास ७ ते ८ लाख भारतीयांवर नोकरी गमावण्याची वेळ येईल. कुवेतमध्ये वास्तव्यास असलेल्या परदेशी व्यक्तींची आकडेवारी पाहिल्यास त्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. कुवेतची लोकसंख्या ४८ लाख इतकी आहे. यातील भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. अप्रवासी कोटा विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर यापैकी १५ टक्केच लोकांना कुवेतमध्ये राहता येईल. त्यामुळे ७ ते ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागेल. भारतीयांसोबतच इतर देशांमधून कुवेतमध्ये काम करण्यास गेलेल्या व्यक्तींनादेखील याचा फटका बसेल. इजिप्तमधून आलेल्या व्यक्तींची संख्या ९० टक्क्यांनी कमी करण्याची तरतूद मसुद्यात आहे. भारतीयांनंतर कुवेतमध्ये इजिप्तच्या व्यक्तींचं प्रमाण सर्वाधिक आहे.कुवेतमध्ये नोकरी करण्यासाठी गेलेले भारतीय त्यांच्या कुटुंबाना मोठ्या प्रमाणात पैसा पाठवतात. त्यामुळे देशाला परकीय चलन मिळतं. २०१८ मध्ये कुवेतमधून भारतात ४.८ बिलियन डॉलर इतकी रक्कम पाठवली गेली. त्यामुळे अप्रवासी कोटा विधेयकाला मंजुरी मिळाल्यास परकीय चलनाच्या गंगाजळीवर परिणाम होईल. कुवेतमधील परदेशी व्यक्तींची संख्या वाढल्यानं देशात मूळ कुवेती व्यक्तींची संख्याच कमी झाली आहे. त्यामुळे कुवेती त्यांच्याच देशात अल्पसंख्याक होऊ लागले आहेत. ही बाब समोर आल्यानं कुवेतनं अप्रवासी कोटा विधेयक आणण्याची तयारी सुरू केली आहे. परदेशातील कर्मचाऱ्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कुवेतनं प्रयत्न सुरू केले आहेत. कुवेतची लोकसंख्या ४३ लाख इतकी आहे. त्यामध्ये परदेशातून आलेल्या लोकांचं प्रमाण ३० लाख इतकं आहे.