शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 01:49 IST

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओली सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या मंत्र्यांनी सोशल मीडियावरील बंदी हटवण्याची मागणी केली. यावर, सरकार Gen-Z समोर झुकणार नाही, असे केपी ओली यांनी म्हटले.

नेपाळमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांसंदर्भात पंतप्रधान केपी ओली यांची प्रतिक्रिया आली आहे. सोशल मीडियावरील बंदी उठवण्यास त्यांनी नकार दिला आहेत. याच बरोबोर, त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारच्या निर्णयाचे समर्थनही केले. तसेच, या निदर्शनाला हिंसक म्हणत, याच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यासंदर्भातही भाष्य केले आहे.

संसदेत शिरले निदर्शक -नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध सोमवारी (८ सप्टेंबर २०२५) तीव्र निदर्शने झाली. मात्र या निदर्शनांनी अचानकच हिंसक वळण घेतले. एवढेच नाही, तर हे निदर्शक संसदेतही शिरले. अखेर, त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला.

सरकार Gen-Z समोर झुकणार नाही -मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओली सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या मंत्र्यांनी सोशल मीडियावरील बंदी हटवण्याची मागणी केली. यावर, सरकार Gen-Z समोर झुकणार नाही, असे केपी ओली यांनी म्हटले. ओलींच्या या निर्णयाने काँग्रसचे मंत्री नाराज झाले आणि त्यांनी बैठकीतून वॉकआउट केले. तसेच, सोशल मीडियावरील बंदी हटवली जाणार नाही, असे केपी ओली यांनी म्हटले आहे.गृहमंत्री लेखक यांचा राजीनामा -सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याने काठमांडू आणि देशाच्या इतर भागात हिंसक निदर्शने झाली. यानंतर, नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी सोमवारी (८ सप्टेंबर २०२५) राजीनामा दिला. नेपाळी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे गृहमंत्री लेखक यांनी नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा दिला आहे....म्हणून नेपाळमध्ये लोक उतरले रस्त्यावर -नेपाळमधील या आंदोलनामागचं मुख्य कारण म्हणजे, सोशल मीडियावर लादलेली बंदी. हजारो तरूण नेपाळच्या रस्त्यांवर उतरले आहेत. हे लोक भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात निदर्शने करत आहेत. नेपाळमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि स्नॅपचॅटवर बंदी घालण्यात आल्याने या तरुणांमध्ये प्रचंड संताप आहे. हे आंदोलनकर्ते हिंसक झाल्यानंतर रस्त्यावर पोलिसांसह सैन्यानेही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे आंदोलन हिंसक बनले असा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. 

टॅग्स :NepalनेपाळagitationआंदोलनSocial Mediaसोशल मीडिया