शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 01:49 IST

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओली सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या मंत्र्यांनी सोशल मीडियावरील बंदी हटवण्याची मागणी केली. यावर, सरकार Gen-Z समोर झुकणार नाही, असे केपी ओली यांनी म्हटले.

नेपाळमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांसंदर्भात पंतप्रधान केपी ओली यांची प्रतिक्रिया आली आहे. सोशल मीडियावरील बंदी उठवण्यास त्यांनी नकार दिला आहेत. याच बरोबोर, त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारच्या निर्णयाचे समर्थनही केले. तसेच, या निदर्शनाला हिंसक म्हणत, याच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यासंदर्भातही भाष्य केले आहे.

संसदेत शिरले निदर्शक -नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध सोमवारी (८ सप्टेंबर २०२५) तीव्र निदर्शने झाली. मात्र या निदर्शनांनी अचानकच हिंसक वळण घेतले. एवढेच नाही, तर हे निदर्शक संसदेतही शिरले. अखेर, त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला.

सरकार Gen-Z समोर झुकणार नाही -मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओली सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या मंत्र्यांनी सोशल मीडियावरील बंदी हटवण्याची मागणी केली. यावर, सरकार Gen-Z समोर झुकणार नाही, असे केपी ओली यांनी म्हटले. ओलींच्या या निर्णयाने काँग्रसचे मंत्री नाराज झाले आणि त्यांनी बैठकीतून वॉकआउट केले. तसेच, सोशल मीडियावरील बंदी हटवली जाणार नाही, असे केपी ओली यांनी म्हटले आहे.गृहमंत्री लेखक यांचा राजीनामा -सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याने काठमांडू आणि देशाच्या इतर भागात हिंसक निदर्शने झाली. यानंतर, नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी सोमवारी (८ सप्टेंबर २०२५) राजीनामा दिला. नेपाळी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे गृहमंत्री लेखक यांनी नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा दिला आहे....म्हणून नेपाळमध्ये लोक उतरले रस्त्यावर -नेपाळमधील या आंदोलनामागचं मुख्य कारण म्हणजे, सोशल मीडियावर लादलेली बंदी. हजारो तरूण नेपाळच्या रस्त्यांवर उतरले आहेत. हे लोक भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात निदर्शने करत आहेत. नेपाळमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि स्नॅपचॅटवर बंदी घालण्यात आल्याने या तरुणांमध्ये प्रचंड संताप आहे. हे आंदोलनकर्ते हिंसक झाल्यानंतर रस्त्यावर पोलिसांसह सैन्यानेही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे आंदोलन हिंसक बनले असा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. 

टॅग्स :NepalनेपाळagitationआंदोलनSocial Mediaसोशल मीडिया