शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धूचा 'मास्टरस्ट्रोक'; इम्रान खान यांच्यासाठी नेली खास काश्मीरची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 14:10 IST

गेली ७० वर्षं पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा आहे. इम्रान खान पंतप्रधान झाल्यानं पाकिस्तानच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. काश्मीरसाठी आतुर असलेल्या मित्रासाठी नवज्योतसिंग सिद्धू खास भेट घेऊन गेले.

इस्लामाबादः पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आज शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू उपस्थित होते. राजकारणी म्हणून नव्हे, तर मित्र म्हणून आलोय, असं सिद्धू यांनी स्पष्ट केलं. परंतु, काश्मीरसाठी आतुर असलेल्या मित्रासाठी खास काश्मिरी शाल भेट नेण्याच्या त्यांच्या खेळीला त्यांचे चाहते 'छा गए गुरू' अशी दाद देताहेत. कारण, काश्मीर आमचं आहे, ही आमच्या देशातील भेट आहे, असा सूचक संदेशही त्यांनी या भेटीतून दिल्याचं बोललं जातंय.

गेली ७० वर्षं पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा आहे. पृथ्वीवरचं हे नंदनवन त्यांना भारताकडून हिसकावून घ्यायचंय. परंतु, भारताने त्यांचे सगळे डाव उधळून लावलेत. त्यामुळे त्यांचा कायमच तीळपापड होतो. या पार्श्वभूमीवर, इम्रान खान पंतप्रधान झाल्यानं पाकिस्तानच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. कारण, त्यांनी प्रचारादरम्यान काश्मीरबाबत आक्रमक भूमिका घेतली होती, भारताला हिसका दाखवण्याची भाषा केली होती. अर्थात, निवडून आल्यानंतर त्यांचा सूर बदलला होता. पण, तरीही या नव्या 'वजीरा'वर सगळ्यांच्या नजरा आहेत. 

इम्रान खान यांनी भारताच्या तीन माजी क्रिकेटपटूंना - सुनील गावसकर, कपिल देव आणि नवज्योतसिंग या त्यांच्या तीन मित्रांना शपथविधी सोहळ्यासाठी बोलावलं होतं. त्यापैकी एकटे सिद्धू आज इस्लामाबादला पोहोचले. 

शेजाऱ्याच्या घरात आग लागली असेल तर त्याची छळ आपल्यालाही बसणार. म्हणूनच, इम्रानने पाकिस्तानला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जावं, भारत-पाकच्या मैत्रीसाठी पुढे यावं, अशी प्रार्थना मी करतो, अशी प्रतिक्रिया सिद्धू यांनी व्यक्त केली. इम्रान खानसाठी खास काश्मिरी शाल भेट म्हणून आणल्याचंही त्यांनी सांगितलं. 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्याऐवजी सिद्धू यांनी पाकिस्तानला जाणं पसंत केल्यानं अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांशी गळाभेट घेतल्यानंही त्यांच्यावर टीका होत होती. तसंच, शपथविधी सोहळ्यावेळी सिद्धू यांना पाकव्याप्त काश्मीरच्या प्रमुखांशेजारी बसवण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. परंतु, मी भारताचा सदिच्छा दूत म्हणून आलोय, असं सांगत सिद्धू यांनी सर्व विषयांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीSunil Gavaskarसुनील गावसकरKapil Devकपिल देव