शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

नरेंद्र मोदींबद्दल 'टोन सांभाळून' बोला; मुस्लिम राष्ट्रांचा इम्रान खानना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 17:09 IST

इम्रान खान यांना तोंडाला आवर घालण्याचा सल्ला

इस्लामाबाद: काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर भारताला थेट युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला आता मुस्लिम राष्ट्रांनीच खडे बोल सुनावले आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तोंड सांभाळून बोला, अशा सूचना मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना केल्या आहेत. दोन देशांमध्ये निर्माण झालेला तणाव चर्चेतून सोडवा, असा सल्लादेखील मुस्लिम राष्ट्रांनी खान यांना दिला. अमेरिका, चीननंतर आता मुस्लिम राष्टांनीही पाकिस्तानच्या पाठिशी न राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींवर टीका केली. यावरुन मुस्लिम देशांनी खान यांचे कान उपटले आहेत. सौदी अरेबियाचे उप परराष्ट्रमंत्री अदेल अल-जुबेर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन अल-नह्यान ३ सप्टेंबरला इस्लामाबादमध्ये होते. त्यावेळी या दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या देशांच्या प्रमुखांच्या वतीनं देण्यात आलेला संदेश इम्रान खान यांच्यापर्यंत पोहोचवला. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्र मंत्री शहा मेहमूद कुरेशी, लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा उपस्थित होते. अतिशय गुप्तपणे झालेल्या या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारीदेखील हजर होते. भारतासोबत झालेला तणाव निवळण्यासाठी चर्चा करा. राजदूतांच्या मदतीनं हा प्रश्न सोडवा, असा सल्ला सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीकडून इम्रान खान यांना देण्यात आला. आम्ही भारताला काश्मीरमधील काही निर्बंध हटवण्यास सांगू, असं आश्वासन सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांनी पाकिस्तानला दिलं. आम्ही यासंदर्भात भारताशी बोलू. मात्र त्याआधी इम्रान खान यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका थांबवावी, तोंडाला आवर घालावा, अशा शब्दांमध्ये दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी पाकिस्तानला सुनावलं. काश्मीरवरुन खान यांनी अनेकदा मोदींवर टीका केली असून थेट युद्धाची धमकीदेखील दिली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानsaudi arabiaसौदी अरेबियाUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर