शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

चीनमध्येही पंतप्रधान मोदींची क्रेझ, मोदी सरकारवर चीनी नागरीक खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 14:05 IST

भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत, चीनी सैन्याने लडाखमध्ये घुसकोरीचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यातच, भारताने 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली असून देशातील नागरिकांनीही चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं.

ठळक मुद्देसर्वेक्षणानुसार, 50 टक्के नागरिक बिजींगच्या बाजूने आपले मत नोंदवत आहेत. तर, 50 टक्के नागरिकांनी भारतातील मोदी सरकारचं कौतुक केलंय. जवळपास 70 टक्के नागरिकांना भारताच चीनविरोधी भावना तीव्र असल्याचं वाटत आहे

नवी दिल्ली - चीननेलडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घुसखोरी केली आहे. जूनमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. यानंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये घुसखोरी झाली नसल्याचे सांगितले होते. तसेच, मोदींनी लडाखमध्ये जाऊन भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलीच चर्चा झडते. आता, चीनमधील ग्लोबल टाइम्सच्या सर्वेक्षणानुसार चीन नागरिकांमध्येही मोदींची क्रेझ आहे. 

भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत, चीनी सैन्याने लडाखमध्ये घुसकोरीचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यातच, भारताने 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली असून देशातील नागरिकांनीही चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. भारताच्या या आक्रमकतेमुळे चीनी कंपन्यांच्या मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, चीन नागरिकांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ असल्याचं दिसून येतंय. 

सर्वेक्षणानुसार, 50 टक्के नागरिक बिजींगच्या बाजूने आपले मत नोंदवत आहेत. तर, 50 टक्के नागरिकांनी भारतातील मोदी सरकारचं कौतुक केलंय. जवळपास 70 टक्के नागरिकांना भारताच चीनविरोधी भावना तीव्र असल्याचं वाटत आहे. त्यातच, 30 टक्के लोकांना दोन्ही देशातील हे संबंध सुधारतील अशी आशा आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संबंधात सुधार झाला तरी, तो काही काळापुरता असेल असे 9 टक्के लोकांना वाटते. तर, 25 टक्के नागरिकांना वाटते की, दोन्ही देशांतील संबंध जास्त काळापर्यंत मजबूत राहतील. दरम्यान, चीनची कंपनी असलेल्या हुआवेईने भारतातील सर्वच प्रमुख दैनिकांत जाहिरात प्रसारीत करुन व्यवसायिक संबंधात सुधार आणण्याचा प्रयत्न केला आहे.    

लडाख सीमारेषेवर अद्यापही तणाव

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लडाखमधील परिस्थिती 1962 नंतर सर्वात गंभीर बनली असल्याचे म्हटले आहे. जयशंकर यांनी त्यांचे पुस्तक अनावरण करण्याआधी रेडिफला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी सध्या 1962 नंतर सर्वांत गंभीर परिस्थिती ओढवली असल्याचे कबूल केले आहे. गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदा एलएसीवर आमच्या सैनिकांना हौतात्म्य आले. सीमेवर दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे.  

टॅग्स :chinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीladakhलडाखIndiaभारतBorderसीमारेषा