शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्येही पंतप्रधान मोदींची क्रेझ, मोदी सरकारवर चीनी नागरीक खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 14:05 IST

भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत, चीनी सैन्याने लडाखमध्ये घुसकोरीचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यातच, भारताने 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली असून देशातील नागरिकांनीही चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं.

ठळक मुद्देसर्वेक्षणानुसार, 50 टक्के नागरिक बिजींगच्या बाजूने आपले मत नोंदवत आहेत. तर, 50 टक्के नागरिकांनी भारतातील मोदी सरकारचं कौतुक केलंय. जवळपास 70 टक्के नागरिकांना भारताच चीनविरोधी भावना तीव्र असल्याचं वाटत आहे

नवी दिल्ली - चीननेलडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घुसखोरी केली आहे. जूनमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. यानंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये घुसखोरी झाली नसल्याचे सांगितले होते. तसेच, मोदींनी लडाखमध्ये जाऊन भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलीच चर्चा झडते. आता, चीनमधील ग्लोबल टाइम्सच्या सर्वेक्षणानुसार चीन नागरिकांमध्येही मोदींची क्रेझ आहे. 

भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत, चीनी सैन्याने लडाखमध्ये घुसकोरीचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यातच, भारताने 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली असून देशातील नागरिकांनीही चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. भारताच्या या आक्रमकतेमुळे चीनी कंपन्यांच्या मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, चीन नागरिकांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ असल्याचं दिसून येतंय. 

सर्वेक्षणानुसार, 50 टक्के नागरिक बिजींगच्या बाजूने आपले मत नोंदवत आहेत. तर, 50 टक्के नागरिकांनी भारतातील मोदी सरकारचं कौतुक केलंय. जवळपास 70 टक्के नागरिकांना भारताच चीनविरोधी भावना तीव्र असल्याचं वाटत आहे. त्यातच, 30 टक्के लोकांना दोन्ही देशातील हे संबंध सुधारतील अशी आशा आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संबंधात सुधार झाला तरी, तो काही काळापुरता असेल असे 9 टक्के लोकांना वाटते. तर, 25 टक्के नागरिकांना वाटते की, दोन्ही देशांतील संबंध जास्त काळापर्यंत मजबूत राहतील. दरम्यान, चीनची कंपनी असलेल्या हुआवेईने भारतातील सर्वच प्रमुख दैनिकांत जाहिरात प्रसारीत करुन व्यवसायिक संबंधात सुधार आणण्याचा प्रयत्न केला आहे.    

लडाख सीमारेषेवर अद्यापही तणाव

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लडाखमधील परिस्थिती 1962 नंतर सर्वात गंभीर बनली असल्याचे म्हटले आहे. जयशंकर यांनी त्यांचे पुस्तक अनावरण करण्याआधी रेडिफला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी सध्या 1962 नंतर सर्वांत गंभीर परिस्थिती ओढवली असल्याचे कबूल केले आहे. गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदा एलएसीवर आमच्या सैनिकांना हौतात्म्य आले. सीमेवर दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे.  

टॅग्स :chinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीladakhलडाखIndiaभारतBorderसीमारेषा