शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

चीनमध्येही पंतप्रधान मोदींची क्रेझ, मोदी सरकारवर चीनी नागरीक खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 14:05 IST

भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत, चीनी सैन्याने लडाखमध्ये घुसकोरीचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यातच, भारताने 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली असून देशातील नागरिकांनीही चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं.

ठळक मुद्देसर्वेक्षणानुसार, 50 टक्के नागरिक बिजींगच्या बाजूने आपले मत नोंदवत आहेत. तर, 50 टक्के नागरिकांनी भारतातील मोदी सरकारचं कौतुक केलंय. जवळपास 70 टक्के नागरिकांना भारताच चीनविरोधी भावना तीव्र असल्याचं वाटत आहे

नवी दिल्ली - चीननेलडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घुसखोरी केली आहे. जूनमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. यानंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये घुसखोरी झाली नसल्याचे सांगितले होते. तसेच, मोदींनी लडाखमध्ये जाऊन भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलीच चर्चा झडते. आता, चीनमधील ग्लोबल टाइम्सच्या सर्वेक्षणानुसार चीन नागरिकांमध्येही मोदींची क्रेझ आहे. 

भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत, चीनी सैन्याने लडाखमध्ये घुसकोरीचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यातच, भारताने 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली असून देशातील नागरिकांनीही चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. भारताच्या या आक्रमकतेमुळे चीनी कंपन्यांच्या मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, चीन नागरिकांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ असल्याचं दिसून येतंय. 

सर्वेक्षणानुसार, 50 टक्के नागरिक बिजींगच्या बाजूने आपले मत नोंदवत आहेत. तर, 50 टक्के नागरिकांनी भारतातील मोदी सरकारचं कौतुक केलंय. जवळपास 70 टक्के नागरिकांना भारताच चीनविरोधी भावना तीव्र असल्याचं वाटत आहे. त्यातच, 30 टक्के लोकांना दोन्ही देशातील हे संबंध सुधारतील अशी आशा आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संबंधात सुधार झाला तरी, तो काही काळापुरता असेल असे 9 टक्के लोकांना वाटते. तर, 25 टक्के नागरिकांना वाटते की, दोन्ही देशांतील संबंध जास्त काळापर्यंत मजबूत राहतील. दरम्यान, चीनची कंपनी असलेल्या हुआवेईने भारतातील सर्वच प्रमुख दैनिकांत जाहिरात प्रसारीत करुन व्यवसायिक संबंधात सुधार आणण्याचा प्रयत्न केला आहे.    

लडाख सीमारेषेवर अद्यापही तणाव

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लडाखमधील परिस्थिती 1962 नंतर सर्वात गंभीर बनली असल्याचे म्हटले आहे. जयशंकर यांनी त्यांचे पुस्तक अनावरण करण्याआधी रेडिफला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी सध्या 1962 नंतर सर्वांत गंभीर परिस्थिती ओढवली असल्याचे कबूल केले आहे. गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदा एलएसीवर आमच्या सैनिकांना हौतात्म्य आले. सीमेवर दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे.  

टॅग्स :chinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीladakhलडाखIndiaभारतBorderसीमारेषा