तालिबानने अफगाणिस्तानमध्येइंटरनेट आणि टेलिकॉम सेवा पूर्णपणे बंद केल्या आहेत. सोमवारी सरकारी आदेशानंतर, देशभरातील फायबर ऑप्टिक केबल्स कापण्यात आल्या, यामुळे सर्व सेवा विस्कळीत झाल्या. जागतिक इंटरनेट देखरेख संस्था नेटब्लॉक्सच्या मते, देशभरातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी सामान्य पातळीच्या १ टक्क्यांपेक्षा कमी राहिली आहे. यामुळे बँकिंग, व्यापार, शिक्षण, वाहतूक आणि सीमाशुल्कांवर गंभीर परिणाम झाला आहे.
इंटरनेट ब्लॅकआउट का लागू करण्यात आले?
सप्टेंबरच्या सुरुवातीलाच अफगाणिस्तानने इंटरनेट ब्लॅकआउट लागू करण्यास सुरुवात केली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात, तालिबान अधिकाऱ्यांनी अनेक शहरांमध्ये फायबर ऑप्टिक केबल्स कापण्यास सुरुवात केली. कालांतराने ही मोहीम वाढत गेली. १६ सप्टेंबर रोजी, बाल्ख प्रांताचे प्रवक्ते अत्ताउल्लाह झैद यांनी उत्तरेकडील फायबर ऑप्टिक सेवा बंद केल्या. 'अनैतिकता' रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. झैद यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील एका पोस्टमध्ये लिहिले की, "अनैतिक कृत्ये रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही देशभर व्यापक कनेक्टिव्हिटीसाठी पर्यायी पर्याय लागू करू."
तालिबान सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच ब्लॅकआउट
२०२१ मध्ये तालिबान सरकारने सत्तेत आल्यानंतर आणि देशभरात कठोर इस्लामिक कायदा लागू केल्यानंतर देशात ब्लॅकआऊट पूर्णपणे बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. संपूर्ण इंटरनेट बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
महिला शिक्षण आणि रोजगारासमोरील आव्हान
अफगाणिस्तानात, तालिबान सरकार सत्तेत आल्यानंतर महिला शिक्षण आणि रोजगार हे आधीच एक मोठे आव्हान आहे. संपूर्ण इंटरनेट बंदीमुळे अडचणींमध्ये भर पडली आहे. इंटरनेट बंदीमुळे महिला शिक्षण आणि रोजगारापासून आणखी दूर जातील.
Web Summary : Taliban blocked Afghanistan's internet, citing 'immorality'. Fiber optic cables were cut, crippling banking, education, and trade. This is the first complete blackout since Taliban rule began, severely impacting women's education and employment.
Web Summary : तालिबान ने 'अनैतिकता' का हवाला देते हुए अफ़ग़ानिस्तान में इंटरनेट बंद कर दिया। फ़ाइबर ऑप्टिक केबलें काटी गईं, जिससे बैंकिंग, शिक्षा और व्यापार ठप हो गया। तालिबान शासन के बाद यह पहला पूर्ण ब्लैकआउट है, जिससे महिलाओं की शिक्षा और रोजगार पर गंभीर प्रभाव पड़ा।