शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात सत्तापालट, देशात लष्करी राजवट; अखेर सैन्य सरकार कसं चालवतं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 21:58 IST

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशात सत्तापालट झाला आहे. आता देशात लष्करी राजवट लागू झाली आहे. 

नवी दिल्ली - बांगलादेशात सध्या मोठी घडामोड घडली आहे. याठिकाणी हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. इतकेच नाही तर शेख हसीना यांनी बांगलादेशातून पलायन करत भारतात आश्रय घेतला आहे. आता बांगलादेशात सैन्य सरकार बनवणार आहे. याठिकाणी सैन्य प्रमुख जनरल वकार उज जमान यांनी देशात अंतरिम सरकार बनवलं जाईल असं स्पष्ट केले आहे. त्यामुळे बांगलादेशाची कमान आता जनरल वकार यांच्या हाती गेली आहे.

कोण आहे जनरल वकार?

वकार उज जमान बांगालादेशी सैन्यातील सर्वात मोठे अधिकारी आहेत. अलीकडेच त्यांची लष्कर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ते आधी लेफ्टनंट जनरल पदावर कार्यरत होते. २३ जून २०२४ रोजी त्यांनी आर्मी चीफ म्हणून पदभार स्वीकारला. पुढील ३ वर्ष ते या पदावर कार्यरत असतील. अखेर सैन्य सरकार कसं चालवतं, त्यात विभागवार मंत्रालयाचं वाटप होतं का की सत्ता एकाच व्यक्तीच्या म्हणजे आर्मी चीफच्या हातात असते हे जाणून घेऊ.

सैन्य शासन कसं असतं?

सैन्य शासन ही एकप्रकारे हुकुमशाही असते. ज्या देशाची सत्ता एक किंवा एकापेक्षा जास्त सैन्य अधिकाऱ्यांच्या हाती असते. आता सैन्य हुकुमशाहीचं नेतृत्व कुठलाही एक अधिकारी करू शकतो किंवा सैन्य अधिकाऱ्यांची एक परिषद मिळून देशाचं सरकार चालवू शकते. 

'या' ३ प्रकारे सेना सरकार चालवतं

लष्करी राजवट- हे लष्करी अधिकाऱ्यांच्या समितीच्या अध्यक्षतेखालील सरकार आहे. यामध्ये देशाची सत्ता सामान्यतः काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हातात केंद्रित असते ज्यांनी बंडखोरी करून सत्तेवर ताबा मिळवला होता. म्यानमार (बर्मा), अर्जेंटिना आणि ग्रीसमध्ये लष्करी राजवट सरकारे स्थापन झाली आणि देश चालवला गेला.

लष्करी हुकूमशहा- कधी कधी असं घडतं की एकच लष्करी अधिकारी सत्तापालट करतो आणि नंतर देशाचा ताबा आपल्या हातात घेतो. मग तो देशावर हुकूमशहा म्हणून राज्य करू लागतो. असे लष्करी हुकूमशहा अनेकदा स्वतःला राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांसारखी पदे बहाल करतात. दक्षिण अमेरिकन देश चिली आणि स्पेनमध्ये हे घडले आहे. चिलीमध्ये जनरल ऑगस्टो पिनोशे आणि स्पेनमध्ये जनरल फ्रान्सिस्को फ्रँको यांनी देशाची सत्ता हस्तगत केली.

तात्पुरते लष्करी सरकार- काही प्रकरणांमध्ये असे घडते की देशाची व्यवस्था सुरळीतपणे पूर्ववत होईपर्यंत तात्पुरते लष्करी सरकार स्थापन केले जाते. हे सरकार राष्ट्रहितासाठी काम करते आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर निवडणुका घेण्याचा दावा करते, जेणेकरून नवीन सरकार स्थापन करता येईल. नायजेरियात असे अनेकदा घडले आहे. लष्करी राजवटीत पुन्हा सरकार स्थापन झाले आहे.

का बनते सत्तापालटाची शक्यता?

कुठल्याही देशात सत्तापालटाची शक्यता जेव्हा देशातील सर्वसामान्य जनता सरकारच्या धोरणाविरोधात किंवा सरकार हुकुमशाह बनते, जनतेच्या हिताची काही देणंघेणं नसते, मनमानीप्रकारे कामकाज करते तेव्हा जनआक्रोश होतो. त्याशिवाय जेव्हा सैन्याला सरकारपासून धोका असल्याची जाणीव होते. अशा स्थितीत सैन्य सरकारविरोधात जाते. सत्तापालट करण्यासाठी सैन्य सरकारविरोधात उतरले. पाकिस्तानात आर्मी चीफ परवेज मुशर्रफ यांनी असेच केले होते.  

टॅग्स :Bangladeshबांगलादेश