शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

बांगलादेशात सत्तापालट, देशात लष्करी राजवट; अखेर सैन्य सरकार कसं चालवतं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 21:58 IST

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशात सत्तापालट झाला आहे. आता देशात लष्करी राजवट लागू झाली आहे. 

नवी दिल्ली - बांगलादेशात सध्या मोठी घडामोड घडली आहे. याठिकाणी हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. इतकेच नाही तर शेख हसीना यांनी बांगलादेशातून पलायन करत भारतात आश्रय घेतला आहे. आता बांगलादेशात सैन्य सरकार बनवणार आहे. याठिकाणी सैन्य प्रमुख जनरल वकार उज जमान यांनी देशात अंतरिम सरकार बनवलं जाईल असं स्पष्ट केले आहे. त्यामुळे बांगलादेशाची कमान आता जनरल वकार यांच्या हाती गेली आहे.

कोण आहे जनरल वकार?

वकार उज जमान बांगालादेशी सैन्यातील सर्वात मोठे अधिकारी आहेत. अलीकडेच त्यांची लष्कर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ते आधी लेफ्टनंट जनरल पदावर कार्यरत होते. २३ जून २०२४ रोजी त्यांनी आर्मी चीफ म्हणून पदभार स्वीकारला. पुढील ३ वर्ष ते या पदावर कार्यरत असतील. अखेर सैन्य सरकार कसं चालवतं, त्यात विभागवार मंत्रालयाचं वाटप होतं का की सत्ता एकाच व्यक्तीच्या म्हणजे आर्मी चीफच्या हातात असते हे जाणून घेऊ.

सैन्य शासन कसं असतं?

सैन्य शासन ही एकप्रकारे हुकुमशाही असते. ज्या देशाची सत्ता एक किंवा एकापेक्षा जास्त सैन्य अधिकाऱ्यांच्या हाती असते. आता सैन्य हुकुमशाहीचं नेतृत्व कुठलाही एक अधिकारी करू शकतो किंवा सैन्य अधिकाऱ्यांची एक परिषद मिळून देशाचं सरकार चालवू शकते. 

'या' ३ प्रकारे सेना सरकार चालवतं

लष्करी राजवट- हे लष्करी अधिकाऱ्यांच्या समितीच्या अध्यक्षतेखालील सरकार आहे. यामध्ये देशाची सत्ता सामान्यतः काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हातात केंद्रित असते ज्यांनी बंडखोरी करून सत्तेवर ताबा मिळवला होता. म्यानमार (बर्मा), अर्जेंटिना आणि ग्रीसमध्ये लष्करी राजवट सरकारे स्थापन झाली आणि देश चालवला गेला.

लष्करी हुकूमशहा- कधी कधी असं घडतं की एकच लष्करी अधिकारी सत्तापालट करतो आणि नंतर देशाचा ताबा आपल्या हातात घेतो. मग तो देशावर हुकूमशहा म्हणून राज्य करू लागतो. असे लष्करी हुकूमशहा अनेकदा स्वतःला राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांसारखी पदे बहाल करतात. दक्षिण अमेरिकन देश चिली आणि स्पेनमध्ये हे घडले आहे. चिलीमध्ये जनरल ऑगस्टो पिनोशे आणि स्पेनमध्ये जनरल फ्रान्सिस्को फ्रँको यांनी देशाची सत्ता हस्तगत केली.

तात्पुरते लष्करी सरकार- काही प्रकरणांमध्ये असे घडते की देशाची व्यवस्था सुरळीतपणे पूर्ववत होईपर्यंत तात्पुरते लष्करी सरकार स्थापन केले जाते. हे सरकार राष्ट्रहितासाठी काम करते आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर निवडणुका घेण्याचा दावा करते, जेणेकरून नवीन सरकार स्थापन करता येईल. नायजेरियात असे अनेकदा घडले आहे. लष्करी राजवटीत पुन्हा सरकार स्थापन झाले आहे.

का बनते सत्तापालटाची शक्यता?

कुठल्याही देशात सत्तापालटाची शक्यता जेव्हा देशातील सर्वसामान्य जनता सरकारच्या धोरणाविरोधात किंवा सरकार हुकुमशाह बनते, जनतेच्या हिताची काही देणंघेणं नसते, मनमानीप्रकारे कामकाज करते तेव्हा जनआक्रोश होतो. त्याशिवाय जेव्हा सैन्याला सरकारपासून धोका असल्याची जाणीव होते. अशा स्थितीत सैन्य सरकारविरोधात जाते. सत्तापालट करण्यासाठी सैन्य सरकारविरोधात उतरले. पाकिस्तानात आर्मी चीफ परवेज मुशर्रफ यांनी असेच केले होते.  

टॅग्स :Bangladeshबांगलादेश