शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

लोकहो! हे कलियुग नाही, तर 'मेघालय युग'; शास्त्रज्ञांनी लावला महत्त्वपूर्ण शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 2:21 PM

पृथ्वीच्या इतिहासाबाबत शास्त्रज्ञांनी महत्वाचा शोध लावला आहे. या युगाचे नाव भारतातील एका राज्याच्या नावावरुन केले आहे.

नवी दिल्ली- पृथ्वीच्या इतिहासाचे टप्पे हा नेहमीच संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. मात्र नुकत्याच एका संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात आधुनिक टप्प्याला 'मेघालय युग' असे नाव दिले आहे.हे नाव मेघालय राज्यातील 'मॉवम्लुह' या गुहेतील' स्टॅलॅगमाईट'वरुन पडलेले आहे. ज्यावेळेस चुनखडकाच्या गुहेमध्ये पाण्याचे थेंब पडत असलेल्या ठिकाणी पाण्याचे बाष्पीभवन होऊन केवळ क्षारांचे संचयन मागे राहाते तेव्हा त्या गुहेत जमिनीवर क्षारांचे खांब तयार होतात त्यास 'स्टॅलॅगमाईट' असे म्हणतात. ही प्रक्रीया होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो. ज्यावेळेस हे थेंब थेंब पाणी पडून गुहेच्या छताला लटकणारे खांब तयार होतात तेव्हा त्यास स्टॅलॅकमाइट असं म्हटलं जातं.

मेघालय युगाचे पुरावे सर्व खंडांमध्ये सापडलेले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांनी होलोसीन युग या कालखंडाचे तीन भाग केलेले आहेत. यामध्ये सुरुवातीचा काळ ग्रीनलँडीयन एज काळ येतो. हा काळ 11, 700 वर्षे पूर्वी सुरु झाला. त्यानंतर 8300 वर्षांपूर्वी नॉर्थग्रीपीयन कालखंड सुरु होतो आणि सर्वात शेवटी 4,200 वर्षे मेघालयन एज म्हणजे मेघालय युगाची सुरुवात होते. मेघालय युगाची सुरुवात अत्यंत मोठ्या दुष्काळांनी सुरुवात झाली. हा दुष्काळ सलग 200 वर्षे राहिला. त्यानंतर हिमयुगाच्या शेवटी निर्माण झालेल्या कृषी आधारित समाजांवर हवामानातील बदलांमुळे मोठा परिणाम झाला होता. इजिप्त, युनान, सीरिया, पॅलेस्टाइन, मेसोपोटेमिया आणि सिंधु संस्कृती, यांगत्से नदीजवळील संस्कृतीवर याचा परिणाम झाला होता असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Earthपृथ्वीInternationalआंतरराष्ट्रीय