शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 16:25 IST

ही आग एवढी भीषण होती, की भीती पोटी अनेकांनी खिडक्यांमधून खाली उड्या घेतल्या. जीव वाचविण्याच्या या प्रयत्नात अनेकांना दुखापत झाल्याचेही समजते.

आखाती देश असलेल्या कुवेतमधील दक्षिणेकडील मंगफ शहरात बुधवारी एका इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यात ५ भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे समजते. लागलेली आग एवढी भीषण हेती की, ती काही वेळातच मोठ्या प्रमाणावर पसरली. कुवेतच्या अधिकृत वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

ही आग काही वेळातच संबंधित बहुमंजली इमारतीच्या अनेक मजल्यावर पसरली. या अपघातातील मृत ५ भारतीय केरळमधील आहेत. यासंदर्भात आम्ही चौकशी करत आहोत आणि ही आग कशामुळे लागली हे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, असे कुवेतच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

ही आग स्थानिक वेळेनुसार ४ वाजण्याच्या सुमारास लागली. यावेळी बहुतांश लोक झोपलेले होते. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास उशीर झाला. औद्योगिक प्लांटमध्ये काम करणाऱ्या लोकांना राहण्यासाठी या इमारतीचा वापर केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीत मोठ्या संख्येने मल्याळम भाषिक लोक राहतात. ही आग एवढी भीषण होती, की भीती पोटी अनेकांनी खिडक्यांमधून खाली उड्या घेतल्या. जीव वाचविण्याच्या या प्रयत्नात अनेकांना दुखापत झाल्याचेही समजते. आतापर्यंत मिळालेल्या माहतीनुसार या घटनेत ४३ लोक जखमी झाले आहेत.

दुखापत झालेल्यांना फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. यातील काही लोकांना गंभीर दुखापत झाली आहे.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलDeathमृत्यूKeralaकेरळ