शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

“अब की बार फिर मोदी सरकार”; भारतातील लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll वर चीनची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 12:04 IST

China On India Lok Sabha Election 2024 Result Exit Poll: भारताच्या लोकशाही निवडणुकीच्या एक्झिट पोलवर चीनने प्रतिक्रिया दिली आहे.

China On India Lok Sabha Election 2024 Result Exit Poll: लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून इंडिया आघाडी आणि एनडीएचे नेते अनेक दावे-प्रतिदावे करत आहेत. भारतातील लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतात नेमके काय घडतेय, याकडे जगाची नजर आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी आलेल्या एक्झिट पोलवर थेट चीनकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून, भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार येऊ शकेल, असे म्हटले आहे. 

चीनच्या ग्लोबल टाइम्सने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. चीनमधील राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोदी सरकार देशांतर्गत नीति आणि परराष्ट्र धोरण कायम ठेवेल. भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसेच त्यात वृद्धी करण्यासाठी प्रयत्न कायम ठेवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू शकतील, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. 

भारत आणि चीनमधील मतभेद दूर होऊन संवाद कायम राहावा

चिनी तज्ज्ञांनी भारत आणि चीन यांच्यातील सहकार्यावर भर दिला. दोन्ही देशांमध्ये मतभेद दूर करण्यासाठी खुली चर्चा होईल. तसेच संवाद कायम राहील, अशी आशा ग्लोबल टाइम्सने व्यक्त केली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात काही बदल होण्याची अपेक्षा नाही. मोदी आणि त्यांचा पक्ष भाजपा तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनंतर तिसऱ्यांदा सत्तेत राहणारे ते दुसरे पंतप्रधान असतील, असेही म्हटले गेले आहे. 

दरम्यान, बीजिंगच्या सिंघुआ विद्यापीठाच्या नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटच्या संशोधन विभागाचे संचालक कियान फेंग म्हणाले की, निवडणुका जिंकल्यानंतर मोदींचे लक्ष काही वर्षांत अमेरिका आणि चीननंतर देशाला जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनविण्यावर असेल. मोदी धोरणात्मक राजकीय मुसद्देगिरीच्या माध्यमातून भारताचा जगभरातील प्रभाव वाढण्यावरही भर देण्याचा प्रयत्न करतील. चीनसोबतच्या संबंधांबाबत भारताने धोरणात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. भारताने चर्चेद्वारे मतभेद दूर करण्यासाठी चीनला सहकार्य करावे. चीन आणि भारत यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता नाही. जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांसह चीनचे अनेक देशांशी संबंध आता सुधारत आहेत, असेही या लेखात पुढे सांगितले आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतIndiaभारतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल