शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Locusts Attack: आफ्रिकेवर कोरोनापाठोपाठ आणखी एक मोठं संकट, कीटकनाशक फवारण्यासाठी सरकारला तैनात कराव लागलं विमान

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 25, 2021 17:16 IST

टांझानियातील जिल्हा आयुक्‍त ओनेस्‍मो बिसवेलू यांनी म्हटले आहे, की 'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे. या नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे. (Locusts Attack)

ठळक मुद्देआफ्रिकेपासून भारतापर्यंत कहर माजवणाऱ्या नाकतोड्यांच्या झुंडी (Locusts) पुन्हा एकदा सक्रिय'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे.नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे.

डोडोमा - आफ्रिकेपासून भारतापर्यंत कहर माजवणाऱ्या नाकतोड्यांच्या झुंडी (Locusts) पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. आफ्रिकन (Africa) देश असलेल्या टांझानियाच्या (Tanzania) उत्‍तरेकडील किलिमंजारो भागात नाकतोड्यांनी भीषण हाहाकार माजवला आहे. यामुळे येथील शेतकरी धास्तावले आहेत. कारण त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यातच आता या झुंडी भारतात आणि पाकिस्तानातही येतात की काय, अशी भीती वाटू लगली आहे. (Locusts Attack northern region of Tanzania Africa damage crops india pakistan crisis will increase)

टांझानियातील जिल्हा आयुक्‍त ओनेस्‍मो बिसवेलू यांनी म्हटले आहे, की 'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे. या नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे. नाकतोड्यांवर नियंत्रण मिळविण्यात आम्हाला यश आले आहे. पिकांचे अधिक नुकसान झालेले नाही.' वातावरणात झालेल्या बदलामुळे पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत या नाकतोड्यांचा हल्ला झाल्याचे मानले जात आहे.

केनियासमोर खाण्याचं संकट -यापूर्वी, केनियामध्ये नाकतोड्यांचा सर्वात मोठा हल्ला झाला होता. यावेळी केनियाचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे केनियाची परिस्थिती एवढी बिघडली होती, की त्यांच्या समोर दोनवेळच्या खाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. नाकतोड्यांच्या या टोळ धाडीने आशिया आणि आफ्रिकन देशांत गेल्या वर्षापासूनच भयानक हाहाकार माजवला आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या टिकाणी पलायन करणाऱ्या या टोळ्या - Locusta migratoia जगात सर्वाधिक पसरल्या आहेत. यांच्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. 

पाकिस्तानमार्गे भारतातही आली होती अशी टोळधाड - गेल्या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात नाकतोड्यांची टोळधाड पाकिस्तानहून राजस्थानात पोहोचली होती. राजस्थानातील 18 आणि मध्य प्रदेशातील जवळपास 12 जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान करुन ही झुंड उत्तर प्रदेशातील झांसी आणि आग्र्यापर्यंत पोहचली होती. यावेळी उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात सतर्कतेची घोषणा केली होती. या टोळधाडीने उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्यांना जाळ्यात ओढले होते. यात आग्रा, अलीगड, मथुरा, बुलंदशहर, हाथरस, एटा, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, फारुखाबाद, कानपूर, झांशी, हमीरपूर आणि ललितपूर या जिल्ह्यांचा समावेश होता. 

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाIndiaभारतPakistanपाकिस्तानairplaneविमानFarmerशेतकरी