शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

"चीनला काहीही बडबडू दे, आम्ही स्पष्टच सांगतोय अरूणाचल प्रदेश भारताचाच"; पराराष्ट्र मंत्रालयाचे सडेतोड प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 3:10 PM

भारताचे पंतप्रधान मोदी अरूणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेल्यानंतर चीनी नेत्यांनी विरोध केला होता

Arunachal Pradesh, India vs China: भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावाचे बनले आहेत. चीन सातत्याने शेजारील देशांवर आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातही चिनी घुसखोरीचा प्रयत्न होताना सतत दिसतो. पण भारत सरकार आणि भारतीय लष्कर चीनचा प्रयत्न प्रत्येक वेळी हाणून पाडते. नुकताच भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले. अरुणाचल प्रदेश हा भारताचाच हिस्सा आहे आणि तो कायम भारतातच राहिल, असे भारताने ठणकावून सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की चीनने कितीही वेळा आपल्या बेताल दाव्यांची पुनरावृत्ती केली तरी, अरुणाचल प्रदेश आमचा भाग होता, आहे आणि नेहमीच राहील ही आमची भूमिका बदलणार नाही.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सुरू ठेवल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सोमवारी चीनच्या दाव्याचा पुनरुच्चार केल्यानंतर काही दिवसांतच भारताकडून या दाव्याला प्रत्युत्तर देण्यात आले. चीनला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावर आम्ही वारंवार सांगितले आहे की, चीन आपले बिनबुडाचे दावे हवे तितक्या वेळा करू शकतो, आमचा मुद्दा बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि राहील. याआधीही भारताने एका निवेदनात म्हटले होते की, भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौऱ्याला चीनचा विरोध मूर्खपणाचा आणि निराधार आहे.

चीनने काय केला दावा?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे उत्तर चीनच्या दाव्यानंतर दिले. चीनने अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचे सांगितले होते. चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल झांग झियाओगांग यांनी १५ मार्च रोजी एक निवेदन जारी करून भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौऱ्याला विरोध केला होता. पंतप्रधान मोदींनी नुकतेच अरुणाचल प्रदेशमधील सेला बोगद्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर चीनचे हे वक्तव्य समोर आले होते. ज्यामध्ये चीनने म्हटले की, 'जिजांग (तिबेटचे चिनी नाव) हा चीनचा भाग आहे आणि चीन भारतीय नेत्यांचा तथाकथित अरुणाचल प्रदेश कधीही स्वीकारणार नाही आणि त्याचा कडक विरोध करेल.' मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला जोरदार प्रत्युत्तर देत चीनचे असे दावे फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत